शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

विभागात नंदुरबार अव्वल; नाशिकची तिसऱ्या स्थानी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:12 IST

नाशिक : राज्य माध्यमिक शालांत परीक्षेचा (दहावी) निकाल शुक्रवारी (दि. १६) ऑनलाइन जाहीर झाला असून, यावर्षीच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत ...

नाशिक : राज्य माध्यमिक शालांत परीक्षेचा (दहावी) निकाल शुक्रवारी (दि. १६) ऑनलाइन जाहीर झाला असून, यावर्षीच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत पहिल्या स्थानावर असलेल्या नाशिक जिल्ह्याची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली असून, गतवर्षी चौथ्या स्थानी असलेल्या नंदुरबार जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

कोरोनामुळे दहावीची लेखी परीक्षा होऊ न शकल्याने यावर्षी शासन निर्णयानुसार मूल्यमापन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच विभागांतील निकालाची टक्केवारी थेट ९९ पार पोहोचली असून, नाशिक जिल्ह्यातून ४९ हजार ४२७ मुले व ४३ हजार ७८३ मुलींसह ९२ हजार २१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर विभागातून २ लाख ९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागात नंदुरबार जिल्ह्याचा सर्वाधिक ९९.९९ टक्के निकाल लागला आहे. यात ११ हजार ३२५ मुले व ९७८४ मुलींचा समावेश आहे. धुळ्यात १६ हजार ११४ मुले व १२ हजार ४४७ मुलींसह ९९.९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जळगावचा ९९.९४ टक्के निकाल लागला असून, यात ३३ हजार ४७८ मुले व २४ हजार ७७१ मुलींचा समावेश आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २९ एप्रिल ते २० मे २०२१ दरम्यान दहावीची परीक्षा आयोजित करण्यात आली होती; परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता १५ एप्रिलच्या निर्णयानुसार परीक्षा पुढे ढकलण्यात आली. मात्र, कोरोना आटोक्यात येत नसल्याने १२ मे रोजी परीक्षा रद्द करून मूल्यमापन पद्धतीनुसार निकाल जाहीर करण्याचे ठरविण्यात आले. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर झाला. लवकरच विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वाटप करण्यात येणार असल्याचे शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आले.

इन्फो-

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ची दहावीची नियोजित परीक्षा रद्द करावी लागली होती. त्यामुळे राज्य शासनाच्या निर्णयानुसार मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार निकाल जाहीर करण्यात आला. यात नववीचा अंतिम निकाल, दहावीचे वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापन व अंतिम तोंडी/प्रात्यक्षिकांच्या आधारे शाळांमार्फत विद्यार्थांना विषयनिहाय गुण देण्यात आले. त्यामुळे दहावीचा यंदाचा निकाल माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतिहासातील सर्वाेच्च निकाल ठरला आहे.

------

विभागात मुलींची बाजी

जिल्हा - टक्केवारी - मुले -मुली

नाशिक - ९९.९७ - ९९.९६ - ९९.९७

धुळे - ९९.९८ - ९९.९८ - ९९. ९८

जळगाव -९९.९४ -९९.९५ - ९९.९३

नंदुरबार -९९.९९ - ९९.९८ - १००

विभाग -९९.९६ - ९९.९६ -९९.९६

-------