शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

नांदूरमधमेश्वर : १६ गाव पाणीपुरवठा योजना बंद

By admin | Updated: May 25, 2016 22:35 IST

पाणीसाठा संपुष्टात

लासलगाव : १६ गाव पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूरमधमेश्वर धरणातील मृत पाणीसाठा संपुष्टात आल्याने दारणा धरणातून त्वरित पाणी सोडावे तसेच संभाव्य पाणीटंचाई दूर करण्यासाठी वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी तातडीने लासलगाव परिसराची पाहणी करून पाण्याचे टँकर्स सुरू करावेत, अशी मागणी १६ गाव पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष व लासलगावचे उपसरपंच जयदत्त होळकर, सरपंच संगीता शेजवळ यांनी केली आहे.लासलगावसह या योजनेवर अवलंबून असणाऱ्या १६ गावांमध्ये होणारा पाणीपुरवठा धरणातील पाण्याचा साठा संपुष्टात आल्याने बंद पडला आहे. पाणीटंचाई टाळण्यासाठी दारणा धरणातून तातडीने नांदूरमधमेश्वर धरणात पाणी सोडावे, अशी मागणी १६ गाव पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष व लासलगावचे उपसरपंच जयदत्त होळकर व पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी राधाकृष्णन व नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग नाशिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या योजनेत लासलगाव व विंचूर या मोठ्या लोकसंख्येच्या गावांचा समावेश असून, त्यात बाजारपेठेमुळे शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे गावातील नागरिकांव्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याचा अतिरिक्त बोजा पाणीपुरवठ्यावर कायम पडत असतो. पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्याचा परिणाम व्यापारावरही होऊ शकतो. या गावांना नांदूरमधमेश्वर धरणातील पाण्याशिवाय दुसरा कोणताही पिण्याच्या पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही. (वार्ताहर)