शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरमधमेश्वर : १६ गाव पाणीपुरवठा योजना बंद

By admin | Updated: May 25, 2016 22:35 IST

पाणीसाठा संपुष्टात

लासलगाव : १६ गाव पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूरमधमेश्वर धरणातील मृत पाणीसाठा संपुष्टात आल्याने दारणा धरणातून त्वरित पाणी सोडावे तसेच संभाव्य पाणीटंचाई दूर करण्यासाठी वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी तातडीने लासलगाव परिसराची पाहणी करून पाण्याचे टँकर्स सुरू करावेत, अशी मागणी १६ गाव पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष व लासलगावचे उपसरपंच जयदत्त होळकर, सरपंच संगीता शेजवळ यांनी केली आहे.लासलगावसह या योजनेवर अवलंबून असणाऱ्या १६ गावांमध्ये होणारा पाणीपुरवठा धरणातील पाण्याचा साठा संपुष्टात आल्याने बंद पडला आहे. पाणीटंचाई टाळण्यासाठी दारणा धरणातून तातडीने नांदूरमधमेश्वर धरणात पाणी सोडावे, अशी मागणी १६ गाव पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष व लासलगावचे उपसरपंच जयदत्त होळकर व पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी राधाकृष्णन व नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग नाशिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या योजनेत लासलगाव व विंचूर या मोठ्या लोकसंख्येच्या गावांचा समावेश असून, त्यात बाजारपेठेमुळे शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे गावातील नागरिकांव्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याचा अतिरिक्त बोजा पाणीपुरवठ्यावर कायम पडत असतो. पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्याचा परिणाम व्यापारावरही होऊ शकतो. या गावांना नांदूरमधमेश्वर धरणातील पाण्याशिवाय दुसरा कोणताही पिण्याच्या पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही. (वार्ताहर)