शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव शहर अंधाराच्या वाटेकडे

By admin | Updated: May 24, 2014 12:10 IST

संजीव धामणे ल्ल नाांदगाव सहा महिन्यांच्या भारनियमनमुक्त कालावधीनंतर वीज वितरण कंपनीने नांदगाव शहरात ऐन उन्हाळ्यात साडेसहा तासांचे भारनियमन सुुरू केले आहे.

संजीव धामणे ल्ल नाांदगाव सहा महिन्यांच्या भारनियमनमुक्त कालावधीनंतर वीज वितरण कंपनीने नांदगाव शहरात ऐन उन्हाळ्यात साडेसहा तासांचे भारनियमन सुुरू केले आहे. भारनियमन काळात दुपारच्या कडक उन्हाच्या झळा नांदगावकरांच्या सहनशक्तीचा अंत बघू लागल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. भारनियमनामुळे वीजपुरवठ्यावर अवलंबून असलेली पाणी व्यवस्था कोलमडली असून १० ते १२ दिवसांनी येणार्‍या पाण्याचे आवर्तन अधिक लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालयांकचीं विजबिलांची थकबाकी आणि वितरण कंपनीची कार्यपद्धती या बाबी भारनियमन मुक्ततेच्या मार्गातील मोठे अडसर ठरू पाहात आहेत. भारनियमनासंदर्भात वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता जयंत गेटमे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वीजबिलाची वसुली कमी झाली असून, गळतीचे प्रमाण वाढल्याने भारनियमन सुरू झाल्याचे सांगितले . शहरात दोन फिडर आहेत. एक नंबर फिडरची वसुली यापूर्वी ९४ टक्के होती. तर गळती २५ टक्के होती. या महिन्यात वसुली ९१ टक्केव गळती ३८ टक्क्यांवर गेली असल्याचा दावा गेटमे यांनी केला आहे. फिडर नंबर दोनची वसुली ८५ टक्के असून, गळती ४७ टक्केअसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नं. १ वर ४३०० ग्राहक असून, मागणी सुमारे २० लाख रुपये आहे तर नं. २ वर २३०० ग्राहक असून, बिल मागणी १० लाख रुपये आहे. फिडर नं. २ च्या कक्षेत गेल्या महिन्यात चार ग्राहकांवर वीजचोरीबद्दल कारवाई करण्यात आली. परंतु फिडर नं. १ मध्ये एकही कारवाई झालेली नाही. तरीही कंपनीच्या नोेंदीत अचानक वीजगळती का वाढली? याचे ठोस कारण गेटमे यांना देता आले नाही. त्यामुळे वीजबिलाची रक्कम ग्राहकांनी मुदतीत न भरल्याने, तसेच वारंवार वीजचोरीचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी भारनियमनाचे समर्थन करण्याचाच प्रयत्न केला. फिडर नं. १ ची ९० टक्क्यांपेक्षा अधिक वसुली असताना काहीतरी खुसपट काढून भारनियमन लादण्याचा हा डाव तर नाही ना. ‘अच्छे दिन आनेवाले है’ ते हेच का, असा संशय सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होऊ लागला आहे. फिडर नं. २ च्या कक्षेत तहसील, पंचायत समिती, बाजार समिती, ग्रामीण रुग्णालय, पाणीपुरवठा योजना अशी शासकीय व निमशासकीय कार्यालये येतात. त्यांच्या प्रतिमाह बिलांची सरासरी रक्कम एक लाख रुपये येते. लाल फित तत्त्वानुसार काम करणार्‍या या कार्यालयांचे बिल वेळेत अदा करण्यात येत नाही. त्यामुळे दोन नं. चा फिडर थकबाकीत जातो. ही थकबाकी सुमारे १० टक्केएवढी आहे. त्याचा भुर्दंड मात्र भारनियमनाच्या रूपाने सामान्य वीज ग्राहकांना बसतो. गळती रोखण्यासाठी व वसुली वाढविण्यासाठी नजीकच्या काळात प्रामाणिक प्रयत्न करून नांदगाव शहर भारनियमनमुक्त करण्याची ग्वाही सहाय्यक अभियंता यांनी दिली.