शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

अक्राळे एमआयडीसी नावालाच,ना शेतजमीन राहिली, ना उद्योग आले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:19 IST

नाशिक- नवीन उद्योगांसाठी जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे औद्याेगिक वसाहत साकारण्यात आली असली तरी त्याठिकाणी थंड प्रतिसाद लाभल्याने अद्याप ...

नाशिक- नवीन उद्योगांसाठी जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे औद्याेगिक वसाहत साकारण्यात आली असली तरी त्याठिकाणी थंड प्रतिसाद लाभल्याने अद्याप अपेक्षित उद्योग साकारलेले नाही. त्यामुळे उद्योग येतील या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात जागा देणाऱ्यांवर मात्र नामुष्की ओढावली आहे. शेतजमीन राहिली नाही आणि उद्योग आले नसल्याने रोजगारही मिळाला नाही अशी दिंडोरी तालुक्यातील गावांची अवस्था आहे.

सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील जागा संपुष्टात आल्याने उद्योजकांच्या संघटनांनी वेळोवेळी नव्या एमआयडीसीची मागणी केली होती. विशेषत: सध्याच्या सातपूर अंबड मार्गालगत विल्होळी असो किंवा अंबड लगत पांजरापोळला दिलेली जागा असो याठिकाणी अतिरिक्त एमआयडीसी साकारण्याची मागणी होत होती. परंतु एमआयडीसीने दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथील जागा निवडली. याठिकाणी ३७२ हेक्टर जमिनीपैकी २०६ हेक्टर जमीन ताब्यात आहेत. याठिकाणी पुरेशा पायाभूत सुविधा नाही. त्यातच भूखंडांचे दर अवाजवी असल्याचे सांगून उद्येाजकांनी त्याकडे पाठ फिरवली. शासनाने दर कमी केले परंतु तेही विशिष्ट मुदतीसाठीच. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळालेला नाही. उद्योगच येत नसल्याने परिसरातील युवकांचे रोजगाराचे स्वप्नही भंगले आहे.

इन्फो..

घोडे कुठे अडले?

- मुंबई आग्रा रोडलगत उद्योजकांना जागा हवी आहे. मात्र, ही वसाहत दिंडोरी तालुक्यात असल्याने महामार्गापासून दूर आहे.

- भूखंडाचे दर ३ हजार रूपये चौरस मीटर इतके होते, ते कमी करून २७०० रूपये चौरस मीटर इतके ठेवण्यात आले. मात्र, तेही जास्त आहेत.

- भूखंडाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा नाही अनेक प्रकारच्या समस्या या ठिकाणी कायम असल्याने उद्योजकांनी प्रतिसाद दिलेला नाही.

- परिसरात खूप गावे नसल्याने अनेकांना मनुष्यबळाचा देखील प्रश्न भेडसावत आहे. बाहेरून मनुष्यबळ मिळणे शक्य होत नाही.

इन्फो...

एकही उद्येाग सुरू नाही

- सुमारे दहा वर्षे उलटून गेली तरी या ठिकाणी उद्योजक जाण्यास तयार नाही. केवळ चौकशी करतात.

- काही उद्योजकांचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे एमआयडीसीचे म्हणणे आहे. मात्र, ते निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाही.

- लघु उद्योजक तेथे जाण्यास तयार आहेत, मात्र याठिकाणी एखादा मोठा उद्योग आल्यास पूरक उद्योग येण्यास तयार नाहीत.

इन्फो....

रोजगार मिळेल हे स्वप्नच!

कोट

रोजगार मिळेल म्हणून परिसरातील ग्रामस्थांनी अक्राळे तळेगाव येेथील जमिनी दिल्या. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या, त्यातील अनेकांचा मोबदला बाकी आहे. एमआयडीसीने येथे उद्योग सुरू करून कोणत्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध करून दिलेला नाही. शेतकऱ्यांची घरे, विहिरी गेल्या. त्याचाही आर्थिक मोबदला मिळालेला नाही. लोकप्रतिनिधीही त्याची दखल घेत नाहीत.

- सुनील गाडे पाटील, ग्रामस्थ (छायाचित्र आर फोटोवर)

कोट...

शासनाच्या दिरंगाईमुळे पाच ते सहा वर्षांचा कालावधी उलटूनही तळेगाव- अक्राळे परिसरातही एकही उद्याेग सुरू झाला नाही. त्यामुळे जमीन गमावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना बेराेजगारीला तोंड द्यावे लागत आहे. शासनाने एमआयडीसी सुरू करण्याची घोषणा केली तेव्हा याच उद्योगात रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, ते भंगले आहे.

- समाधान तांबडे, तळेगाव (छायाचित्र आर फोटोवर)

कोट...

शेतजमिनी देताना याठिकाणी मोठमोठे उद्योग येतील आणि ग्रामस्थांना रोजगार मिळेल असे सांगण्यात येत होते. मात्र, अजून उद्योग सुरू झालेले नाही. शासनाने याची दखल घेऊन तातडीने उद्योग सुरू करावेत आणि रोजगार उपलब्ध करून द्यावेत.

- संदीप शांताराम केंदळे,(छायाचित्र आर फोटोवर)

-------------

इन्फो..

तळेगाव अक्राळे एमआयडीसी

३७२

जमीन अधिग्रहित

२०१४

वर्ष

०२

उद्योजकांना भूखंड वाटप

-----

दोन छायाचित्रे १५ एमआयडीसी, १५एमआयडीसी १ यानावाने आर फोटेावर सेव्ह आहे.