शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

नांदगावमधील पावसामुळे नागासाक्या धरण ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:20 IST

नाशिक : गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तळाला पोहोचलेले नागासाक्या धरण आता ओव्हरफ्लो झाले असल्याने धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांच्या पाण्याचा ...

नाशिक : गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तळाला पोहोचलेले नागासाक्या धरण आता ओव्हरफ्लो झाले असल्याने धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांच्या पाण्याचा आणि सिंचनाचाही प्रश्न मिटला आहे. नांदगाव आणि मालेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील लहान-मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. माणिकपुंज आणि हरणबारी देखील शंभर टक्के भरले आहे.

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव आणि मालेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी धरणातील पाणीपातळीत मोठी वाढ झाल्यामुळे समाधान देखील व्यक्त होत आहे. अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून सुमारे २६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक लहान-मोठे बंधारे फुटल्याने शेती आणि रस्तेही वाहून गेले. पशुधनाचे देखील मेाठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या पावसामुळे तालुक्यांमधील लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये मात्र पाण्याची आवक झाल्याने पाण्याचा प्रश्न मिटला आहे. नागासाक्या धरण शंभर टक्के भरून वाहत असून गुरुवार सकाळपासून ६३६ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जात आहे. धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या ४२ खेडी पाणीपुरवठा योजनेला देखील यामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. हरणबारी धरणही शंभर टक्के भरल्याने या प्रकल्पातून २५१ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. चणकापूर धरणही शंभर टक्केच्या दिशेने निघाले आहे. सध्या या प्रकल्पात ९३ टक्के इतका जलसाठा असला तरी पावसाचा जोर कायम असल्याने ८८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे केळझर ९४ तर पुनद प्रकल्पात ९५ टक्के इतका जलसाठा झाला आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये असलेल्या लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये पाण्याचा साठा वाढला असल्याने तूर्तास पाण्याची चिंता मिटली आहे.

संपूर्ण नाशिक जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असतानाही पावसाने हुलकावणी दिली असली तरी, नांदगाव आणि मालेगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. तालुक्यांना पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. वाहतूक शेतातील पिकांचे नुकसान झाले तर, दळण-वळणावरही परिणाम झाला. रेल्वेस्थानक आणि बसस्थानकांवर देखील पाणी साठल्याने प्रवाशांचेही हाल झाले. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे गुरुवारी जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली.