शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावमधील पावसामुळे नागासाक्या धरण ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:20 IST

नाशिक : गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तळाला पोहोचलेले नागासाक्या धरण आता ओव्हरफ्लो झाले असल्याने धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांच्या पाण्याचा ...

नाशिक : गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तळाला पोहोचलेले नागासाक्या धरण आता ओव्हरफ्लो झाले असल्याने धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांच्या पाण्याचा आणि सिंचनाचाही प्रश्न मिटला आहे. नांदगाव आणि मालेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील लहान-मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. माणिकपुंज आणि हरणबारी देखील शंभर टक्के भरले आहे.

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव आणि मालेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी धरणातील पाणीपातळीत मोठी वाढ झाल्यामुळे समाधान देखील व्यक्त होत आहे. अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून सुमारे २६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक लहान-मोठे बंधारे फुटल्याने शेती आणि रस्तेही वाहून गेले. पशुधनाचे देखील मेाठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या पावसामुळे तालुक्यांमधील लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये मात्र पाण्याची आवक झाल्याने पाण्याचा प्रश्न मिटला आहे. नागासाक्या धरण शंभर टक्के भरून वाहत असून गुरुवार सकाळपासून ६३६ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जात आहे. धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या ४२ खेडी पाणीपुरवठा योजनेला देखील यामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. हरणबारी धरणही शंभर टक्के भरल्याने या प्रकल्पातून २५१ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. चणकापूर धरणही शंभर टक्केच्या दिशेने निघाले आहे. सध्या या प्रकल्पात ९३ टक्के इतका जलसाठा असला तरी पावसाचा जोर कायम असल्याने ८८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे केळझर ९४ तर पुनद प्रकल्पात ९५ टक्के इतका जलसाठा झाला आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये असलेल्या लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये पाण्याचा साठा वाढला असल्याने तूर्तास पाण्याची चिंता मिटली आहे.

संपूर्ण नाशिक जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असतानाही पावसाने हुलकावणी दिली असली तरी, नांदगाव आणि मालेगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. तालुक्यांना पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. वाहतूक शेतातील पिकांचे नुकसान झाले तर, दळण-वळणावरही परिणाम झाला. रेल्वेस्थानक आणि बसस्थानकांवर देखील पाणी साठल्याने प्रवाशांचेही हाल झाले. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे गुरुवारी जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली.