शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
3
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
4
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
5
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
6
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
7
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
8
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
9
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
10
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
11
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
12
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
13
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
14
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
15
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
16
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
17
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
18
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
19
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

नांदगावमधील पावसामुळे नागासाक्या धरण ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:20 IST

नाशिक : गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तळाला पोहोचलेले नागासाक्या धरण आता ओव्हरफ्लो झाले असल्याने धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांच्या पाण्याचा ...

नाशिक : गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तळाला पोहोचलेले नागासाक्या धरण आता ओव्हरफ्लो झाले असल्याने धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांच्या पाण्याचा आणि सिंचनाचाही प्रश्न मिटला आहे. नांदगाव आणि मालेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील लहान-मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. माणिकपुंज आणि हरणबारी देखील शंभर टक्के भरले आहे.

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव आणि मालेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी धरणातील पाणीपातळीत मोठी वाढ झाल्यामुळे समाधान देखील व्यक्त होत आहे. अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून सुमारे २६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक लहान-मोठे बंधारे फुटल्याने शेती आणि रस्तेही वाहून गेले. पशुधनाचे देखील मेाठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या पावसामुळे तालुक्यांमधील लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये मात्र पाण्याची आवक झाल्याने पाण्याचा प्रश्न मिटला आहे. नागासाक्या धरण शंभर टक्के भरून वाहत असून गुरुवार सकाळपासून ६३६ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जात आहे. धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या ४२ खेडी पाणीपुरवठा योजनेला देखील यामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. हरणबारी धरणही शंभर टक्के भरल्याने या प्रकल्पातून २५१ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. चणकापूर धरणही शंभर टक्केच्या दिशेने निघाले आहे. सध्या या प्रकल्पात ९३ टक्के इतका जलसाठा असला तरी पावसाचा जोर कायम असल्याने ८८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे केळझर ९४ तर पुनद प्रकल्पात ९५ टक्के इतका जलसाठा झाला आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये असलेल्या लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये पाण्याचा साठा वाढला असल्याने तूर्तास पाण्याची चिंता मिटली आहे.

संपूर्ण नाशिक जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असतानाही पावसाने हुलकावणी दिली असली तरी, नांदगाव आणि मालेगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. तालुक्यांना पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. वाहतूक शेतातील पिकांचे नुकसान झाले तर, दळण-वळणावरही परिणाम झाला. रेल्वेस्थानक आणि बसस्थानकांवर देखील पाणी साठल्याने प्रवाशांचेही हाल झाले. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे गुरुवारी जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली.