शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

नाशकात पावसाची दिवसभर विश्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:02 IST

नाशिक : गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारी दिवसभर विश्रांती घेतली असून, धरण क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरल्याने धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात कपात करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारी दिवसभर विश्रांती घेतली असून, धरण क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरल्याने धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात कपात करण्यात आली आहे. पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांनाही हायसे वाटले आहे. सोमवारी तुरळक हजेरी लावलेल्या पावसाने मंगळवारी पूर्ण विश्रांती घेऊन नागरिकांना सूर्यदर्शन घडविल्याने सर्वत्र आल्हाददायक वातावरण तयार झाले. त्यामुळे जनजीवनही सुरळीत पार पडले. गेल्या चार दिवसांपासून पावसाने संततधार लावल्यामुळे नद्या, नाल्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली तसेच धरणांच्या पाणी साठ्यातही कमालीची वाढ झाल्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी धरणातून नदीपात्रात पाणी सोडावे लागले. जिल्ह्यातील धरणांमध्ये ६१ टक्के पाणी साठा असून, त्यातील गंगापूर, दारणा, कादवा, वालदेवी, आळंदी या धरणांतून पाणी सोडण्याची वेळ आली होती. परंतु पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे मंगळवारी मोठ्या प्रमाणात पाण्यात कपात करण्यात आली. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्णात फक्त १८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत फक्त जेमतेम २६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यात भात लावणीला वेग आला असून, अतिवृष्टी व पावसाच्या संततधारेमुळे दुबार पेरणीचे संकट कोसळते की काय, अशी भीती बाळगणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गंगापूरचे पाणी थांबवलेसोमवार दुपारनंतर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्यामुळे गंगापूर धरणातून सोडण्यात येणारे पाणी मंगळवारी रात्री ८ वाजता बंद करण्यात आले आहे. सध्या गंगापूर ७५ टक्के इतका पाणीसाठा असून, संपूर्ण धरण समूहात ८१ टक्के पाणी साठले आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पाणी बंद करण्यात येत असल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे.