शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
3
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
4
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
5
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
6
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
7
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
8
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
9
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
10
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
11
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
12
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
13
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
14
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
15
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
16
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
17
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
18
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
19
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
20
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका

नाशकात पावसाची दिवसभर विश्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:02 IST

नाशिक : गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारी दिवसभर विश्रांती घेतली असून, धरण क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरल्याने धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात कपात करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारी दिवसभर विश्रांती घेतली असून, धरण क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरल्याने धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात कपात करण्यात आली आहे. पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांनाही हायसे वाटले आहे. सोमवारी तुरळक हजेरी लावलेल्या पावसाने मंगळवारी पूर्ण विश्रांती घेऊन नागरिकांना सूर्यदर्शन घडविल्याने सर्वत्र आल्हाददायक वातावरण तयार झाले. त्यामुळे जनजीवनही सुरळीत पार पडले. गेल्या चार दिवसांपासून पावसाने संततधार लावल्यामुळे नद्या, नाल्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली तसेच धरणांच्या पाणी साठ्यातही कमालीची वाढ झाल्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी धरणातून नदीपात्रात पाणी सोडावे लागले. जिल्ह्यातील धरणांमध्ये ६१ टक्के पाणी साठा असून, त्यातील गंगापूर, दारणा, कादवा, वालदेवी, आळंदी या धरणांतून पाणी सोडण्याची वेळ आली होती. परंतु पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे मंगळवारी मोठ्या प्रमाणात पाण्यात कपात करण्यात आली. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्णात फक्त १८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत फक्त जेमतेम २६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यात भात लावणीला वेग आला असून, अतिवृष्टी व पावसाच्या संततधारेमुळे दुबार पेरणीचे संकट कोसळते की काय, अशी भीती बाळगणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गंगापूरचे पाणी थांबवलेसोमवार दुपारनंतर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्यामुळे गंगापूर धरणातून सोडण्यात येणारे पाणी मंगळवारी रात्री ८ वाजता बंद करण्यात आले आहे. सध्या गंगापूर ७५ टक्के इतका पाणीसाठा असून, संपूर्ण धरण समूहात ८१ टक्के पाणी साठले आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पाणी बंद करण्यात येत असल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे.