शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

‘नाम फाउण्डेशन’ ही माणुसकीसाठीची चळवळ

By admin | Updated: May 11, 2017 02:23 IST

नाशिक : नाम फाउण्डेशन माणसाने माणुसकीसाठी उभी केलेली चळवळ आहे, या उपक्रमाला पाटेकरांमुळे लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले असे प्रतिपादन अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : नाम फाउण्डेशन ही माणसाने माणुसकीसाठी उभी केलेली चळवळ आहे आणि या उपक्रमाला नाना पाटेकरांमुळे लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले असे प्रतिपादन अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी बुधवारी (दि. १०) ‘नाम फाउण्डेशन आणि सामाजिक भान’ या विषयावर बोलताना व्यक्त केले.देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगण येथे वसंत व्याख्यानमाला अंतर्गत दहावे पुष्प गुंफताना मकरंद अनासपुरे यांनी नाम फाउण्डेशन या लोकचळवळीचे विविध पैलू उलगडून सांगितले. यावेळी अनासपुरे यांनी विचार माणसाला बदलत असल्याने विचारांचा प्रवास सगळ्यांपर्यंत पोहोचवायला हवा असे आवाहन केले. जीवनात एकमेकांशी सुसंवाद राखणे महत्त्वाचे आहे हे सांगताना अनासपुरे यांनी मालक म्हणून जीवनात वावरणे चुक ीचे ठरेल आणि अशा वागण्यामुळे लोभ वाढत जातो आणि जीवनात आपण काहीतरी करायला आलोय ही भावना मनात ठेवून आपण जीवनात आलो हा हेलपाटा होता कामा नये, असेही अनासपुरे यांनी यावेळी सांगितले.लोकचळवळ किंवा समाजोपयोगी काम कुणीही केले असले तरी त्याची फलश्रुती महत्त्वाची आहे तसेच पाणीबचत आणि अधिकाधिक झाडे लावण्यासंबंधी नागरिकांनी गंभीर होणे आवश्यक आहे याकडेहीअनासपुरे यांनी लक्ष वेधले. यावेळी शेतकऱ्यांना आपण ‘बिझिनेस मन’चा दर्जा केव्हा देणार असा सवाल उपस्थित करताना हुंडा घेणे हे नामर्दपणाचे लक्षण आहे तसेच प्रत्येकाने आपल्यातला रिअल हिरो शोधायला हवा आणि खरे वागण्याचा प्रयत्न करायला हवा, असे आवाहन अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले. गोदाघाटावर आयोजित या व्याख्यानास प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी अनासपुरे यांनी गोदावरी नदी प्लॅस्टिक मुक्त करण्याचे आणि दर रविवारी गोदा परिसर स्वच्छ राखण्यासाठी युवकांनी पुढे यायला हवे, असे आवाहन केले.यावेळी व्यासपीठावर सत्यजित मेणे, मनाली मेणे, शोभना मेणे, संगीता बाफणा, अरुण शेंदुर्णीकर, सावळीराम तिदमे, सचिन शिंदे, श्रीकांत बेणी तसेच चंद्रशेखर शहा, धर्माजी बोडके, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.