शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

घटनेचे गूढ कायम : जिल्हा प्रशासन अनभिज्ञ

By admin | Updated: January 14, 2015 00:03 IST

‘त्या’कामगारांच्या मृत्यूची चौकशी नाहीच

नाशिक : सोमेश्वर कॉलनीनजीक महापालिका गटारीचे चेंबर साफ करताना मृत्यूमुखी पडलेल्या तिघा कामगारांच्या घटनेची तटस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची महापालिका आयुक्तांची घोषणा हवेतच विरली असून, या संदर्भात चौकशी अधिकाऱ्याची अद्यापही नेमणूक न करण्यात आल्याने सदरची घटना नेमकी कशी घडली याबाबतचे गूढ कायम आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडील तिघे कामगार तुंबलेल्या महापालिकेची गटार साफ करण्यासाठी चेंबरमध्ये उतरले असता, एकापाठोपाठ एक अशा तिघांचे विषारी वायुने गुदमरून मृत्यू झाल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर जनक्षोभ उसळल्याने संंबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, तर घटनेविषयी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून दिल्या जात असलेल्या उलट-सुलट माहितीवरून अधिकच संभ्रम निर्माण झाल्याने महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांनी तटस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले होते. जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना याची माहिती देताना नाशिकच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकरवी ही चौकशी केली जाईल, असे जाहीर केले. ज्या गटारीत तिघा कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला ती भूमिगत की पावसाळी गटार याचा उलगडा अद्यापही झालेला नाही, तटस्थ यंत्रणेमार्फत चौकशी झाली असती तर गटारीचे रहस्य व त्यापाठोपाठ कामगारांच्या मृत्यूची कारणेही स्पष्ट होण्यास मदत झाली असते, परंतु या संदर्भातील चौकशी व चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक या दोन्ही गोष्टी प्रशासनाच्या कागदोपत्रीच ठरल्या असून, घटनेचे गूढ कायम आहे.