शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

एसटी महामंडळाच्या नफ्यांच्या मार्गावर महापालिकेचा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:19 IST

पाच ते सहा वेळा फेटाळलेला शहर बससेवेचा प्रस्ताव अखेरीस महापालिकेच्या गळ्यात मारण्यात राज्य परिवहन महामंडळ आणि राज्यातील या पूर्वीचे ...

पाच ते सहा वेळा फेटाळलेला शहर बससेवेचा प्रस्ताव अखेरीस महापालिकेच्या गळ्यात मारण्यात राज्य परिवहन महामंडळ आणि राज्यातील या पूर्वीचे फडणवीस सरकार यशस्वी झाल्यानंतर, आता जुलै महिन्यापासून ही सेवा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. वर्षाकाठी सुमारे ३५ काेटी रुपयांचे नुकसान होणार असल्याने, महापालिकेने आत्तापासून या संदर्भात खबरदारी घेण्यास प्रारंभ केला आहे. केवळ महापालिका क्षेत्रात ही सेवा चालवून फायदेशीर ठरणार नसल्याने, महापालिका हद्दीबाहेरील क्षेत्रात २० किलोमीटर परिघातही सेवा देण्यात येणार आहे. महापालिकेने ओझर, त्र्यंबक, देवळाली कॅम्प अशा मार्गांवर बससेवेचा प्रस्ताव अगोदरच घोषित केला आहे. मात्र, त्याचबराेबर शुक्रवारी (दि.११) झालेल्या बैठकीत ही सेवा कसाऱ्यापर्यंत नेण्याचीही तयारी केली आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना यामुळे काहीसा धक्का बसला आहे.

त्र्यंबकेश्वर हे धार्मिक स्थळ असून, त्या ठिकाणी महामंडळाची सेवा फायदेशीर आहे. पंचवीस ते तीस बस त्या ठिकाणी धावतात. नाशिक कसारा हाही महामंडळाचा अत्यंत फायद्याचा मार्ग आहे. त्यावरही निरंतर बस सुरू असतात. मात्र, हे देान्ही मार्ग ताब्यातून गेल्यास महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे. त्यामुळे हे मार्ग देण्यास महामंडळ उत्सुक नाही. जुलैपासून महापालिकेने बससेवा सुरू केल्यानंतर, या मार्गांवर सेवा सुरू केल्यास महामंडळ, त्यावर आक्षेप घेण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

इन्फो...

दोन्ही ठिकाणची सेवा नियमबाह्य

त्र्यंबकेश्वर आणि कसारा या मार्गावर बससेवा सुरू करण्याचा मानस असला, तरी सध्या केवळ वीस किलोमीटर अंतरासाठीच महापालिकेला परवानगी आहे. नाशिक-त्र्यंबक हे अंतर २८ किलोमीटर अंतर आहे, तर नाशिक-कसारा हे अंतर ६५ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे हे दोन्ही मार्ग महापालिकेच्या अखत्यारित येत नसल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.