शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

प्रदूषण थांबविण्यासाठी निरीने दिलेल्या सूचनांना महापालिकेने धाब्यावर बसविल्या

By admin | Updated: February 4, 2015 01:48 IST

प्रदूषण थांबविण्यासाठी निरीने दिलेल्या सूचनांना महापालिकेने धाब्यावर बसविल्या

नाशिक : कुंभमेळा अवघ्या पाच महिन्यांवर आला असताना गोदावरीचे प्रदूषण थांबलेले, तर नाहीच उलट पाणवेलीमुळे नदीपात्र हिरवेगार दिसत आहेत. त्यामुळे प्रदूषणाची तीव्रता स्पष्ट झाली आहे. प्रदूषण थांबविण्यासाठी निरीने दिलेल्या सूचनांना महापालिकेने धाब्यावर बसविल्यानेच हा प्रकार घडल्याचा आरोप गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाने केला आहे. न्यायालयाचाच एक प्रकारे अवमान करण्यात आला असून, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे.गोदावरी नदीत होणारे प्रदूषण हे पालिकेच्या चुकीमुळे होत असल्याने यासंदर्भात पर्यावरण प्रेमींनी आंदोलन केले. त्यावेळी गोदावरी प्रदूषण थांबवू, असे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नसल्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. उच्च न्यायालयाने प्रदूषण थांबविण्यासाठी निरी या संस्थेला समन्वयक म्हणून नियुक्त केले. या संस्थेने प्रदूषण थांबविण्यासाठी विविध सूचना केल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने कार्यवाही करणे अपेक्षित आहे. परंतु ती केली जात नाही त्यामुळे गोदावरी नदीत अद्यापही सांडपाणी मिसळत असून, त्याचा दुष्परिणाम म्हणूनच पाणवेली झाल्याचे दिसत आहे, असे मंचचे निशिकांत पगारे यांनी सांगितले.उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या संस्थेच्या सूचनांचे पालनही महापालिका करीत नसेल तर ही बाब गंभीर आहे. आंदोलन तीव्र केले जाईलच शिवाय न्यायालयाच्याही हे निदर्शनास आणून दिले जाईल, असे मंचने स्पष्ट केले आहे.