शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

प्रदूषण थांबविण्यासाठी निरीने दिलेल्या सूचनांना महापालिकेने धाब्यावर बसविल्या

By admin | Updated: February 4, 2015 01:48 IST

प्रदूषण थांबविण्यासाठी निरीने दिलेल्या सूचनांना महापालिकेने धाब्यावर बसविल्या

नाशिक : कुंभमेळा अवघ्या पाच महिन्यांवर आला असताना गोदावरीचे प्रदूषण थांबलेले, तर नाहीच उलट पाणवेलीमुळे नदीपात्र हिरवेगार दिसत आहेत. त्यामुळे प्रदूषणाची तीव्रता स्पष्ट झाली आहे. प्रदूषण थांबविण्यासाठी निरीने दिलेल्या सूचनांना महापालिकेने धाब्यावर बसविल्यानेच हा प्रकार घडल्याचा आरोप गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाने केला आहे. न्यायालयाचाच एक प्रकारे अवमान करण्यात आला असून, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे.गोदावरी नदीत होणारे प्रदूषण हे पालिकेच्या चुकीमुळे होत असल्याने यासंदर्भात पर्यावरण प्रेमींनी आंदोलन केले. त्यावेळी गोदावरी प्रदूषण थांबवू, असे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नसल्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. उच्च न्यायालयाने प्रदूषण थांबविण्यासाठी निरी या संस्थेला समन्वयक म्हणून नियुक्त केले. या संस्थेने प्रदूषण थांबविण्यासाठी विविध सूचना केल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने कार्यवाही करणे अपेक्षित आहे. परंतु ती केली जात नाही त्यामुळे गोदावरी नदीत अद्यापही सांडपाणी मिसळत असून, त्याचा दुष्परिणाम म्हणूनच पाणवेली झाल्याचे दिसत आहे, असे मंचचे निशिकांत पगारे यांनी सांगितले.उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या संस्थेच्या सूचनांचे पालनही महापालिका करीत नसेल तर ही बाब गंभीर आहे. आंदोलन तीव्र केले जाईलच शिवाय न्यायालयाच्याही हे निदर्शनास आणून दिले जाईल, असे मंचने स्पष्ट केले आहे.