शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

गोदेच्या सन्मानासाठी चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:05 IST

नाशिककरांची जीवनदायिनी असलेल्या गोदावरी नदीच्या सन्मानासाठी नमामि गोदा ही समाजाची चळवळ आता समाजातूनच सुरू होत आहे. त्यासाठी स्थापन झालेल्या फाउंडेशनचा औपचारिक शुभारंभ शनिवारी (दि. १९) विख्यात जलतज्ज्ञ राजेंद्रसिंग यांच्या हस्ते होणार आहेत. यावेळी गोदारक्षक व गोदासेवकांची नियुक्ती होणार आहे. तर रविवारी त्र्यंबकेश्वर म्हणजे गोदावरीच्या उगमस्थानापासूनच वारी गोदावरी उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.

नाशिक : नाशिककरांची जीवनदायिनी असलेल्या गोदावरी नदीच्या सन्मानासाठी नमामि गोदा ही समाजाची चळवळ आता समाजातूनच सुरू होत आहे. त्यासाठी स्थापन झालेल्या फाउंडेशनचा औपचारिक शुभारंभ शनिवारी (दि. १९) विख्यात जलतज्ज्ञ राजेंद्रसिंग यांच्या हस्ते होणार आहेत. यावेळी गोदारक्षक व गोदासेवकांची नियुक्ती होणार आहे. तर रविवारी त्र्यंबकेश्वर म्हणजे गोदावरीच्या उगमस्थानापासूनच वारी गोदावरी उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.देशभरातील प्रमुख मोठ्या नद्यांना सन्मान देऊन निर्मळ करण्यासाठी राष्टÑीय स्तरावर उपक्रम राबविण्यात येत आहे. नमामि गंगा, नमामि नर्मदा हा त्यातीलच एक भाग होय. परंतु गोदावरीसाठी शासनाऐवजी समाजातून चळवळ उभी करण्याचा प्रयत्न आहे. गोदावरीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी सजग समाजाची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातूनच चळवळ उभी करण्यात येणार आहे. गोदावरीप्रेमी म्हणून यापूर्वीही उपक्रम राबविणारे राजेश पंडित तसेच अभिनेते चिन्मय उदगीरकर, धनश्री क्षीरसागर, किरण भालेराव, मिलिंद दंडे, अ‍ॅड. शिरीष दंदणे व डॉ. प्राजक्ता बस्ते यांनी एकत्र येऊन नमामि गोदा फाउंडेशनची स्थापना केली आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी (दि. १९) दुपारी तीन वाजता उपनगर येथील इच्छामणी मंगल कार्यालयात करण्यात येणार आहे. विख्यात जलतज्ज्ञ राजेंद्रसिंग यांच्या प्रेरणेतूनच ही चळवळ उभी राहत असल्याने त्यांच्या हस्तेच नमामि गोदाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. फाउंडेशनने भावी पिढी असलेल्या शाळा, महाविद्यालयातील मुलांना या चळवळीत सहभागी करून घेण्यासाठी तीस शैक्षणिक संस्थांशी संपर्क साधून त्यांना गोदावरी संदर्भात विविध स्पर्धा आणि अन्य प्रकल्प सादर करण्याचा उपक्रम राबविण्याची संधी दिली होती. त्या माध्यमातून गोदावरी चळवळीत योगदान देऊ इच्छिणारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक अशा पाचशे जणांना गोदावरी रक्षक आणि गोदावरी सेवक या रचनेत सामावून घेतले जाणार आहे. त्याची घोषणादेखील याच कार्यक्रमात करण्यात येईल. यानंतर रविवारी दुपारी गोदावरीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी येथून गोदावरीची वारी सुरू करण्यात येणार आहे. वारी ही सेवा धर्म म्हणून केली जाते. गोदावरीची सेवा करण्याचे कार्य नागरिकांमधून आणि विशेषत: गोदावरी नदीकाठी असलेली गावे आणि शहरातील नागरिकांकडून व्हावे यादृष्टीने त्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. रविवारी (दि. २०) त्र्यंबकेश्वर येथे मोहिमेचा शुभारंभ होईल आणि सोमवारी सायंकाळी पाच वाजता रामकुंडावर समारोप होणार आहे, अशी माहिती राजेश पंडित यांनी दिली.