शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

गोदेच्या सन्मानासाठी चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:05 IST

नाशिककरांची जीवनदायिनी असलेल्या गोदावरी नदीच्या सन्मानासाठी नमामि गोदा ही समाजाची चळवळ आता समाजातूनच सुरू होत आहे. त्यासाठी स्थापन झालेल्या फाउंडेशनचा औपचारिक शुभारंभ शनिवारी (दि. १९) विख्यात जलतज्ज्ञ राजेंद्रसिंग यांच्या हस्ते होणार आहेत. यावेळी गोदारक्षक व गोदासेवकांची नियुक्ती होणार आहे. तर रविवारी त्र्यंबकेश्वर म्हणजे गोदावरीच्या उगमस्थानापासूनच वारी गोदावरी उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.

नाशिक : नाशिककरांची जीवनदायिनी असलेल्या गोदावरी नदीच्या सन्मानासाठी नमामि गोदा ही समाजाची चळवळ आता समाजातूनच सुरू होत आहे. त्यासाठी स्थापन झालेल्या फाउंडेशनचा औपचारिक शुभारंभ शनिवारी (दि. १९) विख्यात जलतज्ज्ञ राजेंद्रसिंग यांच्या हस्ते होणार आहेत. यावेळी गोदारक्षक व गोदासेवकांची नियुक्ती होणार आहे. तर रविवारी त्र्यंबकेश्वर म्हणजे गोदावरीच्या उगमस्थानापासूनच वारी गोदावरी उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.देशभरातील प्रमुख मोठ्या नद्यांना सन्मान देऊन निर्मळ करण्यासाठी राष्टÑीय स्तरावर उपक्रम राबविण्यात येत आहे. नमामि गंगा, नमामि नर्मदा हा त्यातीलच एक भाग होय. परंतु गोदावरीसाठी शासनाऐवजी समाजातून चळवळ उभी करण्याचा प्रयत्न आहे. गोदावरीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी सजग समाजाची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातूनच चळवळ उभी करण्यात येणार आहे. गोदावरीप्रेमी म्हणून यापूर्वीही उपक्रम राबविणारे राजेश पंडित तसेच अभिनेते चिन्मय उदगीरकर, धनश्री क्षीरसागर, किरण भालेराव, मिलिंद दंडे, अ‍ॅड. शिरीष दंदणे व डॉ. प्राजक्ता बस्ते यांनी एकत्र येऊन नमामि गोदा फाउंडेशनची स्थापना केली आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी (दि. १९) दुपारी तीन वाजता उपनगर येथील इच्छामणी मंगल कार्यालयात करण्यात येणार आहे. विख्यात जलतज्ज्ञ राजेंद्रसिंग यांच्या प्रेरणेतूनच ही चळवळ उभी राहत असल्याने त्यांच्या हस्तेच नमामि गोदाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. फाउंडेशनने भावी पिढी असलेल्या शाळा, महाविद्यालयातील मुलांना या चळवळीत सहभागी करून घेण्यासाठी तीस शैक्षणिक संस्थांशी संपर्क साधून त्यांना गोदावरी संदर्भात विविध स्पर्धा आणि अन्य प्रकल्प सादर करण्याचा उपक्रम राबविण्याची संधी दिली होती. त्या माध्यमातून गोदावरी चळवळीत योगदान देऊ इच्छिणारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक अशा पाचशे जणांना गोदावरी रक्षक आणि गोदावरी सेवक या रचनेत सामावून घेतले जाणार आहे. त्याची घोषणादेखील याच कार्यक्रमात करण्यात येईल. यानंतर रविवारी दुपारी गोदावरीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी येथून गोदावरीची वारी सुरू करण्यात येणार आहे. वारी ही सेवा धर्म म्हणून केली जाते. गोदावरीची सेवा करण्याचे कार्य नागरिकांमधून आणि विशेषत: गोदावरी नदीकाठी असलेली गावे आणि शहरातील नागरिकांकडून व्हावे यादृष्टीने त्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. रविवारी (दि. २०) त्र्यंबकेश्वर येथे मोहिमेचा शुभारंभ होईल आणि सोमवारी सायंकाळी पाच वाजता रामकुंडावर समारोप होणार आहे, अशी माहिती राजेश पंडित यांनी दिली.