शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

सप्टेंबरमध्ये सर्वाधिक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 01:44 IST

नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोरोना रु ग्ण सापडण्यास प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंतच्या रूग्ण वाढीने प्रचंड मोठा टप्पा गाठला. मात्र जिल्ह्यात नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण प्रारंभीचे तीन महिने अत्यल्प तर त्यानंतरच्या दोन महिन्यांत बऱ्यापैकी वाढले. परंतु, सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभापासून वाढत गेलेल्या जिल्ह्यातील मृत्यू संख्येने तब्बल ४९८ चा आकडा पार करून सर्व यंत्रणेला हादरून सोडले होते.

ठळक मुद्देकोरोनाचा कहर : एकाच महिन्यात मृतांचा आकडा पाचशेवर

नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोरोना रु ग्ण सापडण्यास प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंतच्या रूग्ण वाढीने प्रचंड मोठा टप्पा गाठला. मात्र जिल्ह्यात नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण प्रारंभीचे तीन महिने अत्यल्प तर त्यानंतरच्या दोन महिन्यांत बऱ्यापैकी वाढले. परंतु, सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभापासून वाढत गेलेल्या जिल्ह्यातील मृत्यू संख्येने तब्बल ४९८ चा आकडा पार करून सर्व यंत्रणेला हादरून सोडले होते. नाशिक जिल्ह्यात पहिला रु ग्ण मार्च महिन्यामध्ये आढळला मात्र पहिला रु ग्ण सापडल्यानंतर तो १४ दिवसांनी खडखडीत बरा होऊन घरी गेला. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पूर्वार्धात जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद झाली नव्हती. मात्र उत्तरार्धात कोरोना बाधित बारा जणांचा बळी गेला तर मे महिन्यात त्यात दोनने वाढ होऊन चौदा नागरिक मृत्युमुखी पडले. जून महिन्यात प्रथमच मृतांच्या संख्येने तीन आकडी संख्या ओलांडत १६६ चा आकडा काढला. जुलै महिन्यात तब्बल २६१ नागरिक मृत्युमुखी पडले तर आॅगस्टमध्ये त्यात पुन्हा शंभराहून अधिक बळींची भर पडत हा आकडा ३७३ वर पोहोचला सप्टेंबर महिन्यात तर कोरोनाने जवळपास पाचशेची मजल मारली होती. महिन्याला पाचशे बळींचे प्रमाण कुणाही नागरिकाला भितीदायकच वाटू लागले होते.त्यानंतर आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडयÞापासून रु ग्णवाढीचे तसेच मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या घटत असल्याचे दिसून आले.अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्येतही घटसप्टेंबरमध्ये अ‍ॅक्टीव्ह अर्थात उपचारार्थी रु ग्णांची संख्या दहा हजाराच्या उंबरठयÞावर जाऊन पोहोचली होती. तीदेखील हळूहळू कमी होत ८ आॅक्टोबरला ९ हजाराच्या खाली आल्याने या प्रमाणातही काहीशी घट येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रशासकीय स्तरावरून देखील कोरोना चा कहर आता हळूहळू कमी होऊ लागल्याचे अधिकृत रित्या सांगितले जात असल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे .उपचाराला उशीर बेततो जीवावर !सहा महिन्यांपासून सातत्याने कोरोनाच्या लक्षणांबाबतचा प्रचार होत असूनही काही नागरिक आपल्याला व्हायरल फिव्हर असेल, अशी मनाची समजूत करु न घेत घरगुती उपचार किंवा स्वत:च मेडीकलमधून गोळया आणून उपचार करतात. मग आठ-दहा दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर त्रास खूप वाढल्यावर मग कोरोनावरील उपचारांसाठी धावाधाव करतात. शरीरातील आॅक्सिजनची पातळी तोर्पयत खालावली असल्यास मग संबंधित रु ग्णाच्या जीवावर बेतण्याचे प्रकार घडत असून वेळीच वैद्यकीय सल्ला न घेणाऱ्यांच्याच मृत्युचे प्रमाणदेखील मोठे असल्याचे निदर्शनास येत आहे.फोटो- १२ कोरोना ग्राफ

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल