शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

रुचकर, पौष्टिक पदार्थांवर गृहिणींचा अधिक भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:20 IST

कच्च्या भाज्या, कडधान्ये, फळांचा ज्यूस अनेक स्वयंपाक घरात आता सकाळच्या चहाची जागा फळांचा ज्यूस किंवा हेल्दी काढ्याने घेतली आहे. ...

कच्च्या भाज्या, कडधान्ये, फळांचा ज्यूस

अनेक स्वयंपाक घरात आता सकाळच्या चहाची जागा फळांचा ज्यूस किंवा हेल्दी काढ्याने घेतली आहे. हिरव्या भाज्यांचाही अधिकाधिक वापर होऊ लागला असून, सकाळी नाष्ट्यासाठी मोड आलेले मूग, मटकी, उकडलेले चणे, दूध यांचा वापर होऊ लागला आहे.

चौकट-

भाकरीत वापरा सोयाबीन पीठ

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रोजच्या जेवणात किमान एक वळ तरी बाजरी किंवा ज्वारीची भाकरी असावी. या भाकरीच्या पिठात प्रोसेस केलेले सोयाबीन पीठ मिसळले तर त्यापासून अधिक प्रोटिन्स मिळू शकतात. याशिवाय व्हिटॅमिन आणि प्रोटिन्स देणाऱ्या वेगवेगळ्या डाळींचा रोजच्या जेवणात वापर करावा. दिवसांतून किमान एकदा मोसंबी, संत्रा, टरबूज यांचा ज्यूस घ्यावा, नारळपाणी घ्यावे, असा सल्ला आहारतज्ज्ञ मीनल बाकरे यांनी दिला आहे.

चौकट-बाहेरचे चमचमीत पदार्थ बंद

सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक घरांमधून बाहेरचे चमचमीत पदार्थ मागविणे बंद करण्यात आले आहे. याशिवाय पिझ्झा, बर्गरसारख्या पदार्थांवर जवळपास बंदीच घालण्यात आली आहे. ब्रेड, पावसारख्या मैद्याच्या पदार्थांनाही टाळले जात असून, चायनीज, चिप्स, फरसाण यांसारख्या पदार्थांनाही गृहिणींनी किचनपासून दूर ठेवण्यास सुरुवात केली आहे.

कोट-

कोरोनाने घरातील बहुतेकांच्या खाण्याच्या सवयी बदलल्या आहेत. आता सकाळी नाष्ट्यासाठी बहुतेकवेळा थालीपीठ किंवा इतर पदार्थांची मागणी करतो. याशिवाय चहाचे प्रमाण खूपच कमी झाले असून, फळांच्या ज्युसवर भर दिला जात असून, जेवणातही केवळ भाजीपोळी न घेता त्यात इतरही हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आम्ही करतो.

- मनीषा मोरे, गृहिणी

कोट-

पूर्वी आमच्या मुलाला केवळ चपातीच आवडत असे, पण आता तोही ज्वारी, बाजरीची भाकरी आवडीने खातो. याशिवाय स्वयंपाकघरात दररोज लिंबू असतात लिंबूपाणी पिण्याकडेही घरातील सदस्यांचा कल वाढला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून आमच्या घरात पिझ्झा मागविला गेला नाही. किंबहुना कुणालाही त्याची आठवणसुद्धा येत नाही.

- मंगला पवार, गृहिणी

कोट-

आमच्या घरी दुपारच्या जेवणात ताक घेण्यास सुरुवात झाली आहे. दिवसातून किमान एकदातरी भाकरी केली जाते. सायंकाळी लागणारा स्नॅक्सही घरातच तयार होतो. त्यात पौष्टिक पदार्थांचा समावेश असतो. कधी कधी तर नुसते मोड आलेली मटकी परतवून त्यात कांदा, टमाटा टाकून खाल्ली जाते.

- वनिता जगताप