शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

आणखी ४०० व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला

By admin | Updated: December 5, 2014 01:32 IST

आणखी ४०० व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला

नाशिक : एलबीटीचा भरणा न करणे आणि मुदतीत विवरणपत्र दाखल न करणाऱ्या आणखी ४०० व्यापाऱ्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून, त्यांची बॅँक खाती सील केली आहेत. यापुढे ही कारवाई अधिक व्यापक करण्यात येणार असून, अखेरचा पर्याय जप्ती अथवा झडतीसत्र हाच असेल, अशी माहिती कर विभागाचे उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी दिली.एलबीटी थकविणाऱ्या आणि विवरणपत्र सादर न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध महापालिकेने कारवाई तीव्र केली आहे. महापालिकेने यापूर्वी १८० व्यापाऱ्यांची बॅँक खाती सील केली होती. आता गुरुवारी महापालिकेने शहरातील आणखी ४०० व्यापाऱ्यांची बॅँक खाती सील करण्याचा निर्णय घेतला असून, त्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. मनपाने एलबीटीचा भरणा करण्याबाबत वारंवार व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या; परंतु तरीही भरणा होत नसल्याने पालिकेने व्यापाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक वर्ष संपल्यानंतर व्यापाऱ्यांना पुढील तीन महिने मार्च ते जून या कालावधीत विवरणपत्र सादर करण्याची मुदत दिली जाते. सदर मुदत संपल्यानंतर दाखल विवरणपत्रांची छाननी केली जाते आणि ज्यांनी विवरणपत्र दाखल केले नसतील त्यांना नोटिसा बजावण्यात येतात. चालू आर्थिक वर्षात अशा १६ हजार व्यापाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या नोटिसांनंतर पुन्हा १५ दिवसांची मुदत दिली जाते. त्यातही व्यापाऱ्यांनी विवरणपत्र दाखल न केल्यास पुन्हा नोटिसा बजावून पाच हजार रुपये दंड कायम केला जातो. त्यासाठी पुन्हा १५ दिवसांची मुदत दिली जाते. पुन्हा एकदा छाननी होऊन प्रत्येकाला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली जाते. त्यानंतरही भरणा व विवरणपत्र दाखल न केल्यास बॅँक खाती सील करण्याची कार्यवाही होत असल्याचे फडोळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)