शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

महाराष्ट्राला कंगाल करण्याचा मोदींचा डाव

By admin | Updated: August 13, 2014 00:43 IST

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांचा आरोप

नाशिक : एकेकाळी गुजरातचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान राहिलेल्या मोरारजी देसाई यांनी मुंबई गुजरातला जोडण्याचा प्रयत्न केला होता. आताही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई गुजरातला जोडून महाराष्ट्राला कंगाल करण्याचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष आमदार विद्या चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केला.आमदार चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्हा व शहर महिला पदाधिकाऱ्यांची बैठक राष्ट्रवादी कॉँग्रेस भवनात आयोजित करण्यात आली होती. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसने नेमकी काय भूमिका घ्यावी, पक्षाच्या योजना घराघरांत कशा पोहोचवाव्यात याबाबत मार्गदर्शन व माहिती या आढावा बैठकीत आमदार चव्हाण व प्रभारी उषाताई दराडे यांनी दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार चव्हाण यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली. महिलांना लोकसभा व विधानसभेमध्ये ५० टक्के आरक्षण देण्याबाबत आमचा पक्ष आग्रही आहे. केंद्रात मुलायमसिंह व लालूप्रसाद यादव यांनी विरोध केल्यामुळे महिलांना संसदेत ५० टक्के आरक्षणाचा कायदा कॉँग्रेसप्रणीत आघाडी सरकारला संमत करता आला नाही. आता मात्र मोदी सरकारकडे बहुमत असल्याने त्यांनी हा कायदा तातडीने संमत करून घ्यावा, असा टोमणाही त्यांनी मारला. त्याचप्रमाणे अच्छे दिन आयेंगे म्हणत लोकांना स्वप्ने दाखविणाऱ्या नरेंद्र मोदी यांची लाट ओसरली असून, जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. मुंबईतील सर्व व्यापार गुजरातला जोडून महाराष्ट्राला कंगाल करण्याचा नरेंद्र मोदींचा डाव असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आठ-दहा वर्षांपासून ब्लू प्रिंटच्या नावाखाली लोकांना वेड्यात काढणाऱ्या आणि फिल्मी डायलॉग म्हणणाऱ्या पक्षाच्या नेत्यांनाही जनता घरीच बसवणार आहे. कारण मुंबईत काय आणि नाशिकला काय, सेना-मनसेला सत्ता देऊन जनता कंटाळली आहे, असे आमदार विद्या चव्हाण यांनी सांगितले. यावेळी रेखाताई फष्टे, शुभांगी जगताप, शोभा मगर, जि. प. सभापती अलका जाधव, सदस्य डॉ. भारती पवार, कविता कर्डक, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष अर्जुन टिळे, छबू नागरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)इन्फो.. दहीहंडीला विरोधचन्यायालयाने बाल गोविंदांना आणि १८ वर्षांच्या आतील मुलांना गोविंदा पथकात सामील करण्यास बंदी घातली असून, महिला राष्ट्रवादी कॉँग्रेस या निर्णयाचा आदरच करते. बाल गोविंदांना दहीहंडी पथकात सामील करता कामा नये, असेही आमदार विद्या चव्हाण यांनी सांगितले.