शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

‘मनसे’ आता कारभार करणार ‘दिलसे...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:20 IST

पक्षाच्या स्थापनेपासूनच मनसेत गटबाजी हेाती. काही नेत्यांच्या हाती पक्षाची सूत्रे गेल्याने अंतर्गत खदखद हाेती यातील बहुतांश नेते आता पक्षात ...

पक्षाच्या स्थापनेपासूनच मनसेत गटबाजी हेाती. काही नेत्यांच्या हाती पक्षाची सूत्रे गेल्याने अंतर्गत खदखद हाेती यातील बहुतांश नेते आता पक्षात नसले तरी पक्षातील बेदीली थांबलेली नाही. मोजक्याच नेत्यांच्या हाती सूत्रे असल्याने गटबाजी वाढत आहे, निष्ठेने पक्षासाठी काम करणाऱ्यांना देखील कामे- आंदाेलने करू दिली जात नाही तसेच एकमेकांना विश्वासात न घेताच बैठका आंदाेलने तसेच अन्य अन्य उपक्रम राबवले जात असल्याने त्याबाबत वरिष्ठ पातळीपर्यंत तक्रारी गेल्या आहेत. राज ठाकरे यांनी गेल्या दोन महिन्यांपासून मिशन नाशिक महापालिका हाती घेतल्यानंतर ते स्वत: नाशिकमध्ये दाखल झालेच परंतु अमित ठाकरे तसेच संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, अमेय खोपकर अशा नेत्यांना नाशिकमध्ये पाठवून त्यांनी कार्यकर्त्यांची मते भावना आणि तक्रारी जाणून घेतल्या आहेत. आता पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी राज यांनी त्यांची गंभीर दखल घेण्याच्या आत आणि २१ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर धावपळ सुरू झाली आहे. बुधवारी (दि.१५) राजगडावर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी राज यांना अपेक्षीत असलेली कामगिरी करण्यासाठी यापूढे कटिबद्ध राहणार असल्याचे सांगण्यात आले.

या बैठकीत माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी आगामी निवडणुकीसाठी एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांनी शाखाध्यक्ष नियुक्तींसदर्भातील मेळावा आयोजित करण्याचे नियोजन सांगितले तर शहराध्यक्ष अंकुश पवार यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याची माहिती दिली. विभाग अध्यक्षांच्या माध्यमातून मेळावे आयोजित करण्याबाबत रतनकुमार इचम यांनी माहिती दिली.

यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, माजी नगरसेविका सुजाता डेरे, प्रभाग सभापती योगेश शेवरे, नितीन साळवे, सत्यम खंडाळे, महिला आघाडीच्या कामिनी दोंदे, अर्चना जाधव, स्वागता उपासनी, अरुणा पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

इन्फो...

नाशिक शहरात फलक बाजांवर कारवाईसाठी आता पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय सरसावले आहेत. त्यांनी फलकबाजांवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली असल्याने मनसेने आताच काळजी घेत राज ठाकरे यांच्या स्वागताचे सर्व फलक परवानगी घेऊनच लावण्याचे आवाहन बैठकीत केेले आहे.