शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भारत विकासात चीनच्या पुढे, हा गैरसमज

By admin | Updated: April 11, 2015 00:30 IST

नरेंद्र जाधव : क. का. वाघ स्मृती व्याख्यानात केले प्रतिपादन

नाशिक : भारताने आर्थिक विकासात चीनला मागे टाकल्याची वृत्ते मूर्खपणाची असून, चीनचे दरडोई उत्पन्न भारताच्या पाचपट आहे. आपण या वर्षी केवळ चीनएवढा विकासदर गाठला असून, चीनला मागे टाकण्यासाठी कित्येक वर्ष लागणार असल्याचे वास्तव ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी मांडले. कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षणसंस्थेच्या वतीने कर्मवीर वाघ स्मृती व्याख्यानमालेचे बारावे पुष्प शंकराचार्य संकुलात गुंफण्यात आले. पुणे विद्यापीठ उपविभागीय केंद्राचे समन्वयक प्रा. रावसाहेब शिंदे अध्यक्षस्थानी होते. डॉ. जाधव यांनी ‘भारताच्या आर्थिक धोरणाचे प्रतिबिंब : सन २०२० पर्यंत’ या विषयावर विवेचन केले. भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल, बदल व आव्हाने अशा तीन टप्प्यांत मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, सन १९४७ पर्यंत भारताचा विकासदर शून्य टक्के होता. १९५१ पासून भारताने नियोजनबद्ध विकासाला सुरुवात केली.१९९१ पर्यंतच्या चाळीस वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेची पायाभरणी झाली; मात्र १९७० ते ८० या काळात देशात परमीट राज बोकाळले. त्यामुळे उद्योगांच्या विकासाला खीळ बसली. परकीय गंगाजळी आटून देश प्रचंड आर्थिक संकटात सापडला. १९९१ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांनी परमीट राज बंद करून मुक्त अर्थव्यवस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे साडेतीन टक्क्यांवर अडून बसलेला देशाचा विकासदर ९ टक्क्यांवर पोहोचला. २००१ मध्ये भारत व चीन हे दोन देश प्रथमच जगाच्या अर्थव्यवस्थेवर उमटले; मात्र भारताने चीनवर मात केली, असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल. तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश कडवे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. पी. एस. भंडारी यांनी परिचय करून दिला. वाघ शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जे. जी. सुलक्षणे व एन. एस. रंधवे यांनी सूत्रसंचालन केले. वाय. डी. जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)