शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

भारत विकासात चीनच्या पुढे, हा गैरसमज

By admin | Updated: April 11, 2015 00:30 IST

नरेंद्र जाधव : क. का. वाघ स्मृती व्याख्यानात केले प्रतिपादन

नाशिक : भारताने आर्थिक विकासात चीनला मागे टाकल्याची वृत्ते मूर्खपणाची असून, चीनचे दरडोई उत्पन्न भारताच्या पाचपट आहे. आपण या वर्षी केवळ चीनएवढा विकासदर गाठला असून, चीनला मागे टाकण्यासाठी कित्येक वर्ष लागणार असल्याचे वास्तव ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी मांडले. कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षणसंस्थेच्या वतीने कर्मवीर वाघ स्मृती व्याख्यानमालेचे बारावे पुष्प शंकराचार्य संकुलात गुंफण्यात आले. पुणे विद्यापीठ उपविभागीय केंद्राचे समन्वयक प्रा. रावसाहेब शिंदे अध्यक्षस्थानी होते. डॉ. जाधव यांनी ‘भारताच्या आर्थिक धोरणाचे प्रतिबिंब : सन २०२० पर्यंत’ या विषयावर विवेचन केले. भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल, बदल व आव्हाने अशा तीन टप्प्यांत मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, सन १९४७ पर्यंत भारताचा विकासदर शून्य टक्के होता. १९५१ पासून भारताने नियोजनबद्ध विकासाला सुरुवात केली.१९९१ पर्यंतच्या चाळीस वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेची पायाभरणी झाली; मात्र १९७० ते ८० या काळात देशात परमीट राज बोकाळले. त्यामुळे उद्योगांच्या विकासाला खीळ बसली. परकीय गंगाजळी आटून देश प्रचंड आर्थिक संकटात सापडला. १९९१ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांनी परमीट राज बंद करून मुक्त अर्थव्यवस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे साडेतीन टक्क्यांवर अडून बसलेला देशाचा विकासदर ९ टक्क्यांवर पोहोचला. २००१ मध्ये भारत व चीन हे दोन देश प्रथमच जगाच्या अर्थव्यवस्थेवर उमटले; मात्र भारताने चीनवर मात केली, असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल. तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश कडवे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. पी. एस. भंडारी यांनी परिचय करून दिला. वाघ शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जे. जी. सुलक्षणे व एन. एस. रंधवे यांनी सूत्रसंचालन केले. वाय. डी. जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)