शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
5
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
6
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
7
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
8
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
9
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
10
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
11
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
12
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
13
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
14
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
15
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
16
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
17
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
18
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
19
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
20
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा

चुका घडल्या वारंवार; म्हणून तर यादीत नावे दुबार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:19 IST

प्रशासकीय कामकाज करताना काही चुका होऊ शकतात, असे आपण मान्य केले तरीही इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदारयादीत दुबार नावे ...

प्रशासकीय कामकाज करताना काही चुका होऊ शकतात, असे आपण मान्य केले तरीही इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदारयादीत दुबार नावे आढळणे सोपी चूक म्हणता येणार नाही. त्यामध्ये यंत्रणेची विश्वासार्हता पणाला लागली आहे, हेही विसरता येणार नाही. चूक सुधारावी लागणार आहेच; त्याचबरोबर असे का घडून आले, याची उजळणी होणे क्रमप्राप्त ठरते. खरेतर भारत निवडणूक आयोगानेच जिल्हा निवडणूक शाखेला दुबार नावांची यादी देऊन नावे वगळण्याची सूचना केली होती. त्यावर पुरेसे काम झाले का, याबाबतही दुबार विचार करण्याची गरज आहे. शुद्ध मतदारयादी असणे हे भक्कम लोकशाहीचे लक्षण आहे. यादीच शुद्ध नसेल तर राजकीय, सामाजिक मोठा प्रश्न उभा राहू शकतो. तसा तो राहू नये, याचसाठी निवडणूक आयोगाने मोठी यंत्रणा उभारली आहे. त्यासाठीचा फंडदेखील कमी पडू दिला जात नाही. असे असतानाही आपण कुठे कमी पडलो, याची पडताळणी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

मुळात निवडणूक विभागावर नियंत्रण असणे आणि वचक निर्माण करणे, यात मूलभूत फरक आहे. अधिकाऱ्यांना कामाची स्वायतत्ता नसेल तर तेही खालच्या कर्मचाऱ्यांकडून कामे कसे करवून घेणार, याचाही विचार यानिमित्ताने करावा लागणार आहे. दोन वर्षात चार उपजिल्हा निवडणूक अधिकारी बदलले असतील आणि तरीही कामकाज सुरळीत सुरू होते, असे कशाच्या भरवशावर म्हणता येईल? गेल्या दोन वर्षात बीएलओच्या बैठका झाल्या असत्या किंवा कामकाजाचा आढावा घेतला असता तरी कदाचित दुबार नावांमुळे राज्यात झालेली नाशिकची नाचक्की थांबवता आली असती. पण हे सारे बिनबोभाट घडून गेले आणि आता उत्तरे देण्याची वेळ आली. यादी जाहीर होण्यापूर्वी या विभागाच्या बैठका झाल्याच नाही का? असेही म्हणता येणार नाही. कारण ज्या बैठका झाल्या त्यामध्ये खर्चाचा विषयच अधिक गाजला. इतर चर्चा खर्चाच्या हिशेबात दबल्या गेल्या असतील तर सांगता येत नाही.

कामकाज करताना आरोप - प्रत्यारोप, जर - तर, शंका - कुशंका या निर्माण होतच राहतील. त्याही सकारात्मक घेऊन यंत्रणेचे चुकले कुठे? याचे उत्तर शोधावे लागणार आहे. लोकप्रतिनिधी अधिनियम १९५०नुसार मतदारयादी तयार करण्याची व ती सुस्थितीत ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांची आहे. दुबार मतदारांची नावे ही केवळ प्रशासकीय चूक समजून त्याकडे पाहता येणार नाही, तर ‘जबाबदारी’ची हमीदेखील घेता आली पाहिजे. अन्यथा काट्याचा नायटा होण्यास वेळ लागणार नाही. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी आणि निवडणूक निकालानंतरही राजकीय, सामाजिक प्रश्न गंभीर वळणावर पाेहोचू शकतो, अशी भीती राजकीय नेत्यांना आणि पोलिसांनाही वाटत असेल तर ही चूक सोपी समजू नये.

-संदीप भालेराव, (जिल्हाधिकारी कार्यालयातून)