शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

चुका घडल्या वारंवार; म्हणून तर यादीत नावे दुबार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:19 IST

प्रशासकीय कामकाज करताना काही चुका होऊ शकतात, असे आपण मान्य केले तरीही इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदारयादीत दुबार नावे ...

प्रशासकीय कामकाज करताना काही चुका होऊ शकतात, असे आपण मान्य केले तरीही इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदारयादीत दुबार नावे आढळणे सोपी चूक म्हणता येणार नाही. त्यामध्ये यंत्रणेची विश्वासार्हता पणाला लागली आहे, हेही विसरता येणार नाही. चूक सुधारावी लागणार आहेच; त्याचबरोबर असे का घडून आले, याची उजळणी होणे क्रमप्राप्त ठरते. खरेतर भारत निवडणूक आयोगानेच जिल्हा निवडणूक शाखेला दुबार नावांची यादी देऊन नावे वगळण्याची सूचना केली होती. त्यावर पुरेसे काम झाले का, याबाबतही दुबार विचार करण्याची गरज आहे. शुद्ध मतदारयादी असणे हे भक्कम लोकशाहीचे लक्षण आहे. यादीच शुद्ध नसेल तर राजकीय, सामाजिक मोठा प्रश्न उभा राहू शकतो. तसा तो राहू नये, याचसाठी निवडणूक आयोगाने मोठी यंत्रणा उभारली आहे. त्यासाठीचा फंडदेखील कमी पडू दिला जात नाही. असे असतानाही आपण कुठे कमी पडलो, याची पडताळणी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

मुळात निवडणूक विभागावर नियंत्रण असणे आणि वचक निर्माण करणे, यात मूलभूत फरक आहे. अधिकाऱ्यांना कामाची स्वायतत्ता नसेल तर तेही खालच्या कर्मचाऱ्यांकडून कामे कसे करवून घेणार, याचाही विचार यानिमित्ताने करावा लागणार आहे. दोन वर्षात चार उपजिल्हा निवडणूक अधिकारी बदलले असतील आणि तरीही कामकाज सुरळीत सुरू होते, असे कशाच्या भरवशावर म्हणता येईल? गेल्या दोन वर्षात बीएलओच्या बैठका झाल्या असत्या किंवा कामकाजाचा आढावा घेतला असता तरी कदाचित दुबार नावांमुळे राज्यात झालेली नाशिकची नाचक्की थांबवता आली असती. पण हे सारे बिनबोभाट घडून गेले आणि आता उत्तरे देण्याची वेळ आली. यादी जाहीर होण्यापूर्वी या विभागाच्या बैठका झाल्याच नाही का? असेही म्हणता येणार नाही. कारण ज्या बैठका झाल्या त्यामध्ये खर्चाचा विषयच अधिक गाजला. इतर चर्चा खर्चाच्या हिशेबात दबल्या गेल्या असतील तर सांगता येत नाही.

कामकाज करताना आरोप - प्रत्यारोप, जर - तर, शंका - कुशंका या निर्माण होतच राहतील. त्याही सकारात्मक घेऊन यंत्रणेचे चुकले कुठे? याचे उत्तर शोधावे लागणार आहे. लोकप्रतिनिधी अधिनियम १९५०नुसार मतदारयादी तयार करण्याची व ती सुस्थितीत ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांची आहे. दुबार मतदारांची नावे ही केवळ प्रशासकीय चूक समजून त्याकडे पाहता येणार नाही, तर ‘जबाबदारी’ची हमीदेखील घेता आली पाहिजे. अन्यथा काट्याचा नायटा होण्यास वेळ लागणार नाही. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी आणि निवडणूक निकालानंतरही राजकीय, सामाजिक प्रश्न गंभीर वळणावर पाेहोचू शकतो, अशी भीती राजकीय नेत्यांना आणि पोलिसांनाही वाटत असेल तर ही चूक सोपी समजू नये.

-संदीप भालेराव, (जिल्हाधिकारी कार्यालयातून)