शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

चुका घडल्या वारंवार; म्हणून तर यादीत नावे दुबार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:19 IST

प्रशासकीय कामकाज करताना काही चुका होऊ शकतात, असे आपण मान्य केले तरीही इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदारयादीत दुबार नावे ...

प्रशासकीय कामकाज करताना काही चुका होऊ शकतात, असे आपण मान्य केले तरीही इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदारयादीत दुबार नावे आढळणे सोपी चूक म्हणता येणार नाही. त्यामध्ये यंत्रणेची विश्वासार्हता पणाला लागली आहे, हेही विसरता येणार नाही. चूक सुधारावी लागणार आहेच; त्याचबरोबर असे का घडून आले, याची उजळणी होणे क्रमप्राप्त ठरते. खरेतर भारत निवडणूक आयोगानेच जिल्हा निवडणूक शाखेला दुबार नावांची यादी देऊन नावे वगळण्याची सूचना केली होती. त्यावर पुरेसे काम झाले का, याबाबतही दुबार विचार करण्याची गरज आहे. शुद्ध मतदारयादी असणे हे भक्कम लोकशाहीचे लक्षण आहे. यादीच शुद्ध नसेल तर राजकीय, सामाजिक मोठा प्रश्न उभा राहू शकतो. तसा तो राहू नये, याचसाठी निवडणूक आयोगाने मोठी यंत्रणा उभारली आहे. त्यासाठीचा फंडदेखील कमी पडू दिला जात नाही. असे असतानाही आपण कुठे कमी पडलो, याची पडताळणी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

मुळात निवडणूक विभागावर नियंत्रण असणे आणि वचक निर्माण करणे, यात मूलभूत फरक आहे. अधिकाऱ्यांना कामाची स्वायतत्ता नसेल तर तेही खालच्या कर्मचाऱ्यांकडून कामे कसे करवून घेणार, याचाही विचार यानिमित्ताने करावा लागणार आहे. दोन वर्षात चार उपजिल्हा निवडणूक अधिकारी बदलले असतील आणि तरीही कामकाज सुरळीत सुरू होते, असे कशाच्या भरवशावर म्हणता येईल? गेल्या दोन वर्षात बीएलओच्या बैठका झाल्या असत्या किंवा कामकाजाचा आढावा घेतला असता तरी कदाचित दुबार नावांमुळे राज्यात झालेली नाशिकची नाचक्की थांबवता आली असती. पण हे सारे बिनबोभाट घडून गेले आणि आता उत्तरे देण्याची वेळ आली. यादी जाहीर होण्यापूर्वी या विभागाच्या बैठका झाल्याच नाही का? असेही म्हणता येणार नाही. कारण ज्या बैठका झाल्या त्यामध्ये खर्चाचा विषयच अधिक गाजला. इतर चर्चा खर्चाच्या हिशेबात दबल्या गेल्या असतील तर सांगता येत नाही.

कामकाज करताना आरोप - प्रत्यारोप, जर - तर, शंका - कुशंका या निर्माण होतच राहतील. त्याही सकारात्मक घेऊन यंत्रणेचे चुकले कुठे? याचे उत्तर शोधावे लागणार आहे. लोकप्रतिनिधी अधिनियम १९५०नुसार मतदारयादी तयार करण्याची व ती सुस्थितीत ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांची आहे. दुबार मतदारांची नावे ही केवळ प्रशासकीय चूक समजून त्याकडे पाहता येणार नाही, तर ‘जबाबदारी’ची हमीदेखील घेता आली पाहिजे. अन्यथा काट्याचा नायटा होण्यास वेळ लागणार नाही. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी आणि निवडणूक निकालानंतरही राजकीय, सामाजिक प्रश्न गंभीर वळणावर पाेहोचू शकतो, अशी भीती राजकीय नेत्यांना आणि पोलिसांनाही वाटत असेल तर ही चूक सोपी समजू नये.

-संदीप भालेराव, (जिल्हाधिकारी कार्यालयातून)