शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

पावसाचा अंदाज चुकल्याने खरिपाचे वेळापत्रक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:10 IST

सटाणा (नितीन बोरसे) : सर्वत्र पावसाने थैमान घातले असताना बागलाण तालुका मात्र आजही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत दिसून येत आहे. ...

सटाणा (नितीन बोरसे) : सर्वत्र पावसाने थैमान घातले असताना बागलाण तालुका मात्र आजही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत दिसून येत आहे. वरुणराजाने हवामान खात्याचे अंदाज अक्षरशः चुकीचे ठरविल्याने यंदा बागलाणच्या बळीराजाचे खरीप हंगामाचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

दोन दिवसांच्या रिपरिपमुळे तब्बल दीड महिन्यांपासून खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला असला तरी हरणबारी, केळझर या मध्यम प्रकल्पांच्या जल साठ्यात वाढ होताना दिसत आहे. मात्र, बहुतांश लघु प्रकल्प अद्याप कोरडेठाक असल्याने यंदा पावसाअभावी दुष्काळाचे संकट अधिकच गहिरे होत चालले आहे.

यंदा मार्च महिन्यातच विविध वेध शाळांनी चांगला पावसाळा असल्याबरोबरच वेळेवर मान्सून दाखल होणार असल्याचे भाकीत केले होते. हवामान खात्याच्या या अंदाजामुळे बळीराजा पावसाळ्यापूर्वीच सुखावला आणि त्याने बँका कर्ज देत नसताना सावकारांकडून पैसे जमा करून खरिपाचे नियोजन केले. वेळेत मान्सून दाखल होणार म्हणून बी-बियाणे, खते खरेदी केली. मात्र, दीड महिना उलटूनही पाऊस नसल्यामुळे बागलाण तालुक्यातील बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. तालुक्याचा पश्चिम भाग वगळता पावसाअभावी पाण्याचे मोठे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. तालुक्याचा ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जाणारा मोसम, आरम, करंजाडी, कान्हेरी, हत्ती हा परिसर सलग तीन ते चार वर्षांपासून कमी पावसामुळे उजाड होण्याच्या मार्गावर आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या रिपरिपमुळे खोळंबलेल्या पेरण्यांना गती आली खर; परंतु दमदार पाऊस नसल्यामुळे विहिरींनी अक्षरशः तळ गाठले आहेत. येत्या पंधरा-वीस दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास आधीच दीड पावणेदोन महिन्याने उशिरा पेरा झालेली पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे.

-----------------------------

भात व नागलीची अल्प लागवड, सूर्यफूल, तिळाचा शून्य पेरा

बागलाण तालुक्यात यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात काही भागांत झालेल्या पावसामुळे ८ जुलैअखेरपर्यंत फक्त तीस टक्के क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला होता. गेल्या तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे खरिपाच्या एकूण ६७ हजार ८६० हेक्टर क्षेत्रापैकी ५३ हजार ४५४ हेक्टर वर म्हणजे ७८.७७ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, यंदा कमी आणि उशिरा झाल्यामुळे पश्चिम पट्ट्यातील प्रमुख पीक भात व नागली लागवड ठप्प झाली आहे. भाताच्या सरासरी २०३१.६० हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ४५५ हेक्टर क्षेत्रावर भाताची तर नागली १५५५.६० हेक्टरपैकी केवळ २५५ हेक्टरवर लागवड झाली आहे. तर तीळ, सूर्यफुलाच्या सव्वा तीनशे हेक्टर क्षेत्रावर यंदा शून्य टक्के पेरा झाला असून या क्षेत्राची जागा आता सोयाबीन पिकाने घेतली आहे. सोयाबीन पिकाकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत असून तब्बल १५७२.३० हेक्टरवर पेरा झाला आहे. ज्वारीचा देखील शून्य पेरा झाला आहे.

------------

पीक सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र

भात 2031.60 455

बाजरी 19851 11530.70

मका 34859 36692

नागली 1555.60 255

ज्वारी 6.40 79.80

तूर 809 513.80

मूग 4076 700.70

उडीद 567 326.60

भुईमूग 2176 1065.10

सूर्यफूल 11 00

तीळ 5 00

खुरासणी 198 23.50

सोयाबीन 1194 1572.30

कापूस 78 103

-----------------

पाण्याचे संकट अधिकच गहिरे .......

बागलाण तालुक्यात आजअखेर ४८.३० मिलीमीटर इतका सरासरी पाऊस झाला आहे. पश्चिम पट्ट्यात रिपरिप सुरू असल्यामुळे हरणबारी, केळझर या मध्यम प्रकल्पासह पठावे, दसाणे या लघु प्रकल्पांनी पाणीसाठ्याच्या टक्केवारीत संथगतीने वाढ होताना दिसत आहे. मात्र, उत्तर, पूर्व बागलाणमध्ये अद्यापही दमदार पाऊस नसल्यामुळे या भागाची तहान भागविणारे दोधेश्वर, जाखोड, शेमळी, तळवाडे, रातीर, चिराई, चौगाव, बिलपुरी, बोढरी, भीमाशंकर हे लघु प्रकल्प अद्याप कोरडेच असल्याने भीषण पाणी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. गिरणेला पूर पाणी गेल्यामुळे सटाणा शहराचा पाणी प्रश्न काहीअंशी सुटला असला तरी मोसम, आरम, हत्ती, कान्हेरी आणि करंजाडी या नद्यांना अद्याप पाणी न गेल्यामुळे या नद्यांवरील पाणी योजना एन पावसाळ्यात कोलमडल्याचे भयावह चित्र बघायला मिळत आहे.