शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

पावसाचा अंदाज चुकल्याने खरिपाचे वेळापत्रक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:10 IST

सटाणा (नितीन बोरसे) : सर्वत्र पावसाने थैमान घातले असताना बागलाण तालुका मात्र आजही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत दिसून येत आहे. ...

सटाणा (नितीन बोरसे) : सर्वत्र पावसाने थैमान घातले असताना बागलाण तालुका मात्र आजही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत दिसून येत आहे. वरुणराजाने हवामान खात्याचे अंदाज अक्षरशः चुकीचे ठरविल्याने यंदा बागलाणच्या बळीराजाचे खरीप हंगामाचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

दोन दिवसांच्या रिपरिपमुळे तब्बल दीड महिन्यांपासून खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला असला तरी हरणबारी, केळझर या मध्यम प्रकल्पांच्या जल साठ्यात वाढ होताना दिसत आहे. मात्र, बहुतांश लघु प्रकल्प अद्याप कोरडेठाक असल्याने यंदा पावसाअभावी दुष्काळाचे संकट अधिकच गहिरे होत चालले आहे.

यंदा मार्च महिन्यातच विविध वेध शाळांनी चांगला पावसाळा असल्याबरोबरच वेळेवर मान्सून दाखल होणार असल्याचे भाकीत केले होते. हवामान खात्याच्या या अंदाजामुळे बळीराजा पावसाळ्यापूर्वीच सुखावला आणि त्याने बँका कर्ज देत नसताना सावकारांकडून पैसे जमा करून खरिपाचे नियोजन केले. वेळेत मान्सून दाखल होणार म्हणून बी-बियाणे, खते खरेदी केली. मात्र, दीड महिना उलटूनही पाऊस नसल्यामुळे बागलाण तालुक्यातील बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. तालुक्याचा पश्चिम भाग वगळता पावसाअभावी पाण्याचे मोठे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. तालुक्याचा ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जाणारा मोसम, आरम, करंजाडी, कान्हेरी, हत्ती हा परिसर सलग तीन ते चार वर्षांपासून कमी पावसामुळे उजाड होण्याच्या मार्गावर आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या रिपरिपमुळे खोळंबलेल्या पेरण्यांना गती आली खर; परंतु दमदार पाऊस नसल्यामुळे विहिरींनी अक्षरशः तळ गाठले आहेत. येत्या पंधरा-वीस दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास आधीच दीड पावणेदोन महिन्याने उशिरा पेरा झालेली पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे.

-----------------------------

भात व नागलीची अल्प लागवड, सूर्यफूल, तिळाचा शून्य पेरा

बागलाण तालुक्यात यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात काही भागांत झालेल्या पावसामुळे ८ जुलैअखेरपर्यंत फक्त तीस टक्के क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला होता. गेल्या तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे खरिपाच्या एकूण ६७ हजार ८६० हेक्टर क्षेत्रापैकी ५३ हजार ४५४ हेक्टर वर म्हणजे ७८.७७ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, यंदा कमी आणि उशिरा झाल्यामुळे पश्चिम पट्ट्यातील प्रमुख पीक भात व नागली लागवड ठप्प झाली आहे. भाताच्या सरासरी २०३१.६० हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ४५५ हेक्टर क्षेत्रावर भाताची तर नागली १५५५.६० हेक्टरपैकी केवळ २५५ हेक्टरवर लागवड झाली आहे. तर तीळ, सूर्यफुलाच्या सव्वा तीनशे हेक्टर क्षेत्रावर यंदा शून्य टक्के पेरा झाला असून या क्षेत्राची जागा आता सोयाबीन पिकाने घेतली आहे. सोयाबीन पिकाकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत असून तब्बल १५७२.३० हेक्टरवर पेरा झाला आहे. ज्वारीचा देखील शून्य पेरा झाला आहे.

------------

पीक सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र

भात 2031.60 455

बाजरी 19851 11530.70

मका 34859 36692

नागली 1555.60 255

ज्वारी 6.40 79.80

तूर 809 513.80

मूग 4076 700.70

उडीद 567 326.60

भुईमूग 2176 1065.10

सूर्यफूल 11 00

तीळ 5 00

खुरासणी 198 23.50

सोयाबीन 1194 1572.30

कापूस 78 103

-----------------

पाण्याचे संकट अधिकच गहिरे .......

बागलाण तालुक्यात आजअखेर ४८.३० मिलीमीटर इतका सरासरी पाऊस झाला आहे. पश्चिम पट्ट्यात रिपरिप सुरू असल्यामुळे हरणबारी, केळझर या मध्यम प्रकल्पासह पठावे, दसाणे या लघु प्रकल्पांनी पाणीसाठ्याच्या टक्केवारीत संथगतीने वाढ होताना दिसत आहे. मात्र, उत्तर, पूर्व बागलाणमध्ये अद्यापही दमदार पाऊस नसल्यामुळे या भागाची तहान भागविणारे दोधेश्वर, जाखोड, शेमळी, तळवाडे, रातीर, चिराई, चौगाव, बिलपुरी, बोढरी, भीमाशंकर हे लघु प्रकल्प अद्याप कोरडेच असल्याने भीषण पाणी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. गिरणेला पूर पाणी गेल्यामुळे सटाणा शहराचा पाणी प्रश्न काहीअंशी सुटला असला तरी मोसम, आरम, हत्ती, कान्हेरी आणि करंजाडी या नद्यांना अद्याप पाणी न गेल्यामुळे या नद्यांवरील पाणी योजना एन पावसाळ्यात कोलमडल्याचे भयावह चित्र बघायला मिळत आहे.