शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

गिरणा, पुनंद नदीवर बंधारे बांधून सिंचन क्षमतेत वाढ करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:16 IST

कळवण : गिरणा आणि पुनंद नदीवर गेटेड बंधारे बांधून सिंचन क्षमतेत वाढ करणार असून, आवर्तन हे कायम राहणार ...

कळवण : गिरणा आणि पुनंद नदीवर गेटेड बंधारे बांधून सिंचन क्षमतेत वाढ करणार असून, आवर्तन हे कायम राहणार आहे. त्यामुळे दिशाभूल करणाऱ्यांना भीक घालू नका, असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी गोसराणे, बार्डे, पाळे बु., पाळे खुर्द, एकलहरे येथे आयोजित गाव संवाद दौऱ्यात नागरिकांना केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय पवार, देविदास पवार, कौतिक पगार, महेंद्र हिरे, राजेंद्र भामरे, हेमंत पाटील, संतोष देशमुख उपस्थित होते. आमदार पवार पुढे म्हणाले की, चणकापूर धरण वा गिरणा नदीपात्र कोरडेठाक होईल, अशा विरोधकांच्या अफवांना भीक घालू नका. सन २०१४ ते २०१९ या काळात चणकापूर धरण कोरडे ठाक केले, चणकापूर धरणाचे आवर्तन ९० दिवसांचे केले. त्यावेळी गिरणा काठचे तथाकथित नेते मूग गिळून बसले होते. तेव्हा त्यांना शेतकऱ्यांचे हित जोपासता आले नाही. आता शेतकरी हिताच्या गप्पा मारून विरोधाला विरोध करून विकासकामांना खीळ घातली जात आहे. चणकापूरचे आवर्तन ९० दिवसांवरून ४५ दिवसांवर केले असून, हे आवर्तन कायम राहील, असा विश्वास आमदार नितीन पवार यांनी नागरिकांना दिला. चणकापूरमधील २८७ दशलक्ष घनफूट गाळ काढण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पाण्याच्या क्षमतेमध्ये वाढ होणार असल्याचे यावेळी आमदार नितीन पवार यांनी सांगितले.

यावेळी रामदास पाटील, बापू पाटील, भगवान पाटील, भाई दादाजी पाटील, विश्वास मोरे, पंडित वाघ, आबा वाघ, गिरीश देवरे, उत्तम पाटील, बाळू पाटील, दिलीप पाटील, शशिकांत पाटील, मनोज कामळस्कर, कळमथे येथील बाळासाहेब शिरसाठ दत्तात्रेय शिरसाठ, प्रकाश वाघ, केशव वाघ, देविदास पवार, नारायण वाघ, विजय वाघ, अरुण वार्डे, अरुण शिरसाठ राजेंद्र देशमुख, अविनाश देशमुख, दिलीप डेर्ले आदींसह शेतकरी उपस्थित होते.

------------------------

पाळे खुर्द येथील संवाद सभेत भाग घेताना आमदार नितीन पवार व मान्यवर. (२१ कळवण पवार)

210921\21nsk_16_21092021_13.jpg

२१ कळवण पवार