नाशिक : गेल्या चार दिवसांपासून नाशिकचे कमाल तपमान ४०.३ अंशावर असून उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे शहरात उष्म्याने कहर केला आहे. यामुळे नागरिकांच्या जीवाची लाही लाही होत आहे. एक दशकानंतर नाशिककर पुन्हा मार्चमध्ये एवढा प्रचंड उन्हाचा तडाखा अनुभवत आहे.गेल्या बुधवारपासून तपमानाचा पारा ३८च्या घरात होता; मात्र रविवारी पाऱ्याने चाळीशी गाठल्याने तपमानाची नोंद ४०.१ इतकी करण्यात आली. रविवारपासून सातत्याने तपमानाचा पारा चढता राहत असून पारा ४०.३वर स्थिरावत असल्याने वातावरणात उष्मा कायम आहे. बुधवारी (दि.२९) ४०.३ अंश इतक्या कमाल तपमानाची नोंद हवामान खात्याकडून करण्यात आली.
पारा ४०.३ अंशावर : चार दिवसांपासून नाशकात उष्णतेचा कहर
By admin | Updated: March 29, 2017 18:16 IST