शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

संवादातील दरी बिघडवते मानसिक स्वास्थ्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:17 IST

नाशिक : मानव जमात हा समाजशील प्राणी मानला जातो. मात्र, कोरोनाच्या काळात जिथे घराबाहेर पडणेदेखील धोक्याचे मानले जात होते. ...

नाशिक : मानव जमात हा समाजशील प्राणी मानला जातो. मात्र, कोरोनाच्या काळात जिथे घराबाहेर पडणेदेखील धोक्याचे मानले जात होते. त्यामुळे अनेकांचा बाहेरच्या विश्वाशी प्रत्यक्ष संपर्कच तुटला. विशेषत्वे एकटे राहणाऱ्यांना तर या काळात संवाद साधणेही मुश्कील झाले. तर काही नागरिकांना कुटुंबातच असलेल्या विसंवादाने मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

मानसिक त्रास किंवा आजार हा बहुतांशी वेळा विविध कौटुंबिक, सामाजिक तणाव आणि आर्थिक अस्थिरता तसेच गरिबी, भेदभाव या कारणांमुळे होतो. मानसिक त्रास असलेल्या व्यक्तीस सामाजिक, कौटुंबिक आधाराची, कामाची आणि आर्थिक स्थिरतेची आवश्यकता असते, नुसत्या गोळ्या घेऊन मानसिक आजार बरा होत नाही. त्यामुळेच ज्याच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधता येईल, असे काही जिवलग कुटुंबात किंवा कुटुंबासह घराबाहेर असणे आवश्यक आहे. देशभर पसरत गेलेली कोविड-१९ ची महामारी आणि घालण्यात आलेले निर्बंध, त्यामुळे विस्कटलेली आर्थिक आणि सामाजिक घडी या सगळ्यांचाच मानसिक स्वास्थ्यावर गंभीर आणि खोलवर परिणाम झाला आहे. म्हणूनच प्रत्येकाने आपापल्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

या महामारीमुळे भीती, निराशा, हतबलता, अनिश्चितता, अविश्वास अशा सर्वच भावना वाढल्या आहेत. त्यातूनच प्रसारमाध्यमातून मिळणारी अतिमाहिती, गैरमाहिती, अफवा यामुळे मानसिक ताणतणाव अधिकच वाढत चालले आहेत. गेल्या ७ ते ८ महिन्यात- भीती, चिंता, निराशा, झोप न येणे, आरोग्याची अति काळजी वाटणे, भूक कमी होणे, थकवा येणे, वैफल्यग्रस्त वाटणे, कोरोना होईल अशी काळजी वाटत राहणे, आणि आत्महत्येचे विचार येणे अशा प्रकारची मानसिक त्रासाची लक्षणे दिसत आहेत. कोरोनाबाधित व्यक्तीलाही नैराश्य आणि भीती, बेचैनीचा त्रास होत आहे, क्वारंटाईन राहिल्यामुळे किंवा राहायला लागेल या भीतीनेदेखील मानसिक त्रास वाढलेले दिसत आहेत.

इन्फो

ताणतणाव टाळण्याचे उपाय

अति ताणतणावाची लक्षणे असल्यास कोणाशी तरी बोलणे आणि मदत घेणे गरजेचे आहे.

आपल्या जीवनशैलीत आहार, काम, व्यायाम, झोप, आणि मित्रांशी व नातेवाईकांशी संपर्क ठेवणे या गोष्टी संतुलितरीत्या आणि शिस्तबद्ध रीतीने कराव्यात.

कोरोनाविषयक शंका असेल तर सरकारी माहिती आणि आरोग्य सेवा देणाऱ्या व्यक्ती, मानसोपचारतज्ज्ञांवरच विश्वास ठेवा.

प्रत्येकाने भूतकाळात ज्या कौशल्यांमुळे ताणतणाव हाताळण्यात मदत झाली आहे ते लक्षात ठेवून त्या कौशल्यांचा वापर करावा.

कामकाजाचे, ॲक्टिव्हिटीचे वेळापत्रक तयार करा आणि ते अमलात आणा.

कोट

महिनाभरानंतरही ताणतणाव आणि त्याची लक्षणे कमी होत नसल्यास, झोप आणि भूक खूप बिघडली असल्यास, काही शारीरिक त्रास, डोकेदुखी होत असल्यास, गंभीर मानसिक आजाराची लक्षणे, अतिसंशय, भास होत असल्यास जवळ उपलब्ध असलेल्या मानसोपचारतज्ज्ञाकडे संपर्क साधणे आवश्यक आहे. -डॉ. हेमंत सोननीस

.