शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

संमेलनात उत्तर महाराष्ट्राच्या साहित्याचे प्रतिबिंब उमटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:13 IST

साहित्याचे प्रतिबिंब उमटणार लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या मराठी साहित्य संमेलनामध्ये उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ-श्रेष्ठ साहित्यिकांच्या ...

साहित्याचे प्रतिबिंब उमटणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या मराठी साहित्य संमेलनामध्ये उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ-श्रेष्ठ साहित्यिकांच्या योगदानाचे आणि त्यांच्या साहित्याचे प्रतिबिंब उमटेल, अशीच त्याची मांडणी करण्याचा प्रयास आयोजकांच्यावतीने केला जाणार आहे. पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि निफाडचे भूमिपुत्र न्या. महादेव गोविंद रानडे ते प्रख्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर ते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आणि लक्ष्मीबाई टिळक ते वसंत कानेटकर अशा उत्तुंग साहित्यिकांच्या साहित्याचा रसास्वाद रसिकांना घेण्याची संधी संमेलनातून मिळणार आहे.

साहित्य संमेलनाच्या नियोजनाला नाशिकमध्ये वेग देण्यात आला आहे. संमेलनात कोणत्या विषयांवर परिसंवाद व्हावेत, कोणत्या विषयांना प्राधान्य देण्यात यावे, संमेलनातून नव्या पिढीला कशी प्रेरणा देता येईल, नाशिकच्या संमेलनाने साहित्य क्षेत्राला कशी नवी दिशा देता येईल, या सर्व बाबींवर लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल यांच्यासह नाशिकमधील अन्य संपादकांच्या उपस्थितीत विचार विनिमय करण्यात आला. यावेळी लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त आणि साहित्यिक हेमंत टकले, अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, विश्वस्त दिलीप साळवेकर, सचिव सुभाष पाटील, संजय करंजकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या संमेलनात उत्तर महाराष्ट्रातील साहित्यिकांसह या भागातील बोलीभाषेचा आस्वाददेखील थोड्या प्रमाणात तरी रसिकांना घेता यावा अशीच आखणी करण्यात येणार आहे. त्याशिवाय २७ फेब्रुवारीच्या कुसुमाग्रज जयंती अर्थात मराठी राजभाषा दिनापासूनच्या उपक्रमांमधूनच साहित्य संमेलनाचे ब्रॅन्डींग करण्यास प्रारंभ करण्याचा विचार असल्याचेही आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले. तसेच लवकरच संमेलनाची वेबसाईट तयार करुन त्याव्दारे नागरिकांना माहिती देण्यासह त्यांच्याकडून काही चांगले सल्ले आल्यास त्यांचादेखील विचार करण्यात येणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. तसेच संमेलनाच्यावेळी लागणाऱ्या प्रकाशकांच्या स्टॉलबरोबरच संमेलनापूर्वी पहिलेच पुस्तक प्रसिद्ध झालेल्या साहित्यिकांना रसिकांशी थेट संवाद साधता येईल, अशी काही रचना करण्याबाबतच्या सल्ल्याचेदेखील आयोजकांनी स्वागत केले. तसेच संमेलनाच्या ठरावात जे वास्तवात शक्य होतील, असेच ठराव करण्याचादेखील मानस व्यक्त करण्यात आला. सर्व संपादकांनी यावेळी गोखले एज्युकेशन सोसायटीमधील साहित्य संमेलनाचा संपूर्ण परिसर तसेच तेथील नियोजनाची पाहणी करुन मौलिक सूचना केल्या.

इन्फो

निसर्गाच्या सानिध्यात रंगणार कविसंमेलन

यंदाच्या साहित्य संमेलनात नवसाहित्यिकांसह ब्लॉगर्सनादेखील स्थान देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच सर्वाधिक वेगळेपण म्हणजे यावेळी रंगणारे कविसंमेलन हे निसर्गाच्याच सानिध्यात खुल्या रंगमंचावर साकारले जाणार आहे. त्यामुळे साहित्य संमेलनात निसर्गाच्या सानिध्यात होणाऱ्या या कविसंमेलनाने एक अनोखी वातावरण निर्मिती करण्याचादेखील आयोजकांचा प्रयास राहणार आहे.