शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनात उत्तर महाराष्ट्राच्या साहित्याचे प्रतिबिंब उमटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:13 IST

साहित्याचे प्रतिबिंब उमटणार लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या मराठी साहित्य संमेलनामध्ये उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ-श्रेष्ठ साहित्यिकांच्या ...

साहित्याचे प्रतिबिंब उमटणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या मराठी साहित्य संमेलनामध्ये उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ-श्रेष्ठ साहित्यिकांच्या योगदानाचे आणि त्यांच्या साहित्याचे प्रतिबिंब उमटेल, अशीच त्याची मांडणी करण्याचा प्रयास आयोजकांच्यावतीने केला जाणार आहे. पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि निफाडचे भूमिपुत्र न्या. महादेव गोविंद रानडे ते प्रख्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर ते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आणि लक्ष्मीबाई टिळक ते वसंत कानेटकर अशा उत्तुंग साहित्यिकांच्या साहित्याचा रसास्वाद रसिकांना घेण्याची संधी संमेलनातून मिळणार आहे.

साहित्य संमेलनाच्या नियोजनाला नाशिकमध्ये वेग देण्यात आला आहे. संमेलनात कोणत्या विषयांवर परिसंवाद व्हावेत, कोणत्या विषयांना प्राधान्य देण्यात यावे, संमेलनातून नव्या पिढीला कशी प्रेरणा देता येईल, नाशिकच्या संमेलनाने साहित्य क्षेत्राला कशी नवी दिशा देता येईल, या सर्व बाबींवर लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल यांच्यासह नाशिकमधील अन्य संपादकांच्या उपस्थितीत विचार विनिमय करण्यात आला. यावेळी लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त आणि साहित्यिक हेमंत टकले, अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, विश्वस्त दिलीप साळवेकर, सचिव सुभाष पाटील, संजय करंजकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या संमेलनात उत्तर महाराष्ट्रातील साहित्यिकांसह या भागातील बोलीभाषेचा आस्वाददेखील थोड्या प्रमाणात तरी रसिकांना घेता यावा अशीच आखणी करण्यात येणार आहे. त्याशिवाय २७ फेब्रुवारीच्या कुसुमाग्रज जयंती अर्थात मराठी राजभाषा दिनापासूनच्या उपक्रमांमधूनच साहित्य संमेलनाचे ब्रॅन्डींग करण्यास प्रारंभ करण्याचा विचार असल्याचेही आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले. तसेच लवकरच संमेलनाची वेबसाईट तयार करुन त्याव्दारे नागरिकांना माहिती देण्यासह त्यांच्याकडून काही चांगले सल्ले आल्यास त्यांचादेखील विचार करण्यात येणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. तसेच संमेलनाच्यावेळी लागणाऱ्या प्रकाशकांच्या स्टॉलबरोबरच संमेलनापूर्वी पहिलेच पुस्तक प्रसिद्ध झालेल्या साहित्यिकांना रसिकांशी थेट संवाद साधता येईल, अशी काही रचना करण्याबाबतच्या सल्ल्याचेदेखील आयोजकांनी स्वागत केले. तसेच संमेलनाच्या ठरावात जे वास्तवात शक्य होतील, असेच ठराव करण्याचादेखील मानस व्यक्त करण्यात आला. सर्व संपादकांनी यावेळी गोखले एज्युकेशन सोसायटीमधील साहित्य संमेलनाचा संपूर्ण परिसर तसेच तेथील नियोजनाची पाहणी करुन मौलिक सूचना केल्या.

इन्फो

निसर्गाच्या सानिध्यात रंगणार कविसंमेलन

यंदाच्या साहित्य संमेलनात नवसाहित्यिकांसह ब्लॉगर्सनादेखील स्थान देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच सर्वाधिक वेगळेपण म्हणजे यावेळी रंगणारे कविसंमेलन हे निसर्गाच्याच सानिध्यात खुल्या रंगमंचावर साकारले जाणार आहे. त्यामुळे साहित्य संमेलनात निसर्गाच्या सानिध्यात होणाऱ्या या कविसंमेलनाने एक अनोखी वातावरण निर्मिती करण्याचादेखील आयोजकांचा प्रयास राहणार आहे.