शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

लग्नाहून परतणाऱ्यांना मारहाण

By admin | Updated: May 11, 2017 01:57 IST

नाशिकरोड : लग्न आटोपून पुण्याला जाणाऱ्या एका कुटुंबाला शिंदे गाव येथे गाडी ओव्हरटेक का केली? या कारणावरून एका टोळक्याने मारहाण करून गाडीच्या काचा फोडल्या

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : नातेवाइकांचे लग्न आटोपून पुन्हा पुण्याला जाणाऱ्या एका कुटुंबाला शिंदे गाव येथे गाडी ओव्हरटेक का केली? या कारणावरून एका टोळक्याने बेदम मारहाण करून गाडीच्या काचा फोडल्या. यावेळी झालेल्या झटापटीत १६ तोळे वजनाची सोनसाखळी व रुद्राक्षाची माळ कुठेतरी पडून गहाळ झाली. पुणे रहाटणी येथील सागर विलास पालवे व त्यांचे नातेवाईक सोमवारी निफाड तालुक्यातील पिंपळस येथे लग्नाला आले होते. लग्नकार्य आटोपून पालवे व त्यांचे नातेवाईक इनोव्हा गाडी (एमएच १४ बीसी २७८९) व दुसरी गाडी मारुती एसएक्स-४ (एमएच १४ बीएफ ८०००) या दोन गाड्यांमधून पुन्हा पुण्याला जाण्यास निघाले. नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे गाव चौफुली येथे रात्री ११ वाजेच्या सुमारास वाहतुकीची कोंडी झालेली असताना इनोव्हा कारने एका पांढऱ्या मारुती कारला ओव्हरटेक केले. त्याचा राग आल्याने इंडिका गाडीतील चालक व त्याचा एक सहकारी हे शिवीगाळ करू लागले. सागर पालवे हा गाडीतून उतरून ईरटीका कार चालकास समजाविण्यास गेला असता त्या कारमधील दोघांनी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान याचवेळी पाठीमागून कोणीतरी दगडाने ईरटीका गाडीची काच फोडून सागरच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. सागरचे काका शैलेशकुमार, भाऊ कुणाल हे सोडवासोडवी करण्यास आले असता तेथे जमलेल्या ५-६ जणांनी सर्वांना मारहाण केली. काकू नीता पालवे यांच्या तोंडावर फाईट मारून जखमी केले. त्या ६ - ७ इसमांनी काका शैलेशकुमार यांना घेरून बेदम मारहाण केली. यावेळी त्यांच्या गळ्यातील सोन्याची १० तोळ्याची चैन व ६ तोळे वजनाची रुद्राक्षात घडवलेली माळ तुटून गहाळ झाली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.