शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

बाजार समितीचे आठवडाभरात २५ लाख रुपये उत्पन्न घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:14 IST

पंचवटी : नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सलग १२ दिवस लॉकडाऊन केल्याने जीवनावश्यक वस्तू ...

पंचवटी : नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सलग १२ दिवस लॉकडाऊन केल्याने जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व आस्थापना व बाजारसमितीदेखील बंद करण्याचे आदेश दिल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे, तर बाजार समिती उत्पन्नात दैनंदिन साडेतीन ते चार लाख रुपये घट आल्याने आठवडाभरात जवळपास २५ लाखांनी उत्पन्न घटले आहे, अशी माहिती बाजार समिती सचिव अरुण काळे यांनी दिली आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दैनंदिन जिल्हाभरातील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणतात. भाजीपाला खरेदी-विक्रीच्या माध्यमातून दिवसभरात सहा ते सात कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरेाना त्यातच भाजीपाला आवक घटल्याने बाजार समितीच्या उत्पन्नात घट झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून जिल्हा प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बाजार समिती बंद केल्याने दैनंदिन कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. शिवाय बाजार समितीला मिळणारे उत्पन्नदेखील बुडत आहे. खरेदी-विक्रीच्या माध्यमातून बाजार समितीला बाजार शुल्कातून सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपये उत्पन्न रोज अपेक्षित असते. मात्र, आठवडाभरापासून बाजार समिती बंद असल्याने साधारणपणे पंचवीस लाख रुपयांपर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

--इन्फो -

शेतकऱ्यांना आर्थिक फटका

जिल्हा प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठी थेट बाजार समिती बंद केल्या आहेत, त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. कोरोना नियम पालन करीत नाशिक बाजार समिती सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाला साकडे घातले होते. मात्र, परवानगी मिळाली नाही. त्यामुळे बाजार समिती बंद ठेवली आहे, तर बाजार समिती बंदमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शिवाय शेतमाल खराब होत असल्याने तो फेकून देण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे बाजार समिती बंद असल्याने बाजार समितीचे दैनंदिन तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न बुडत आहे.