शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कोविड चाचणीबाबत बाजार समिती, शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:13 IST

नाशिक : मागील बारा दिवसांपासून बंद असलेले बाजार समित्यांचे कामकाज सोमवारपासून पूर्ववत होत असले, तरी बाजार समित्यांमध्ये किरकोळ व्यवहार ...

नाशिक : मागील बारा दिवसांपासून बंद असलेले बाजार समित्यांचे कामकाज सोमवारपासून पूर्ववत होत असले, तरी बाजार समित्यांमध्ये किरकोळ व्यवहार पूर्णपणे बंद राहणार असून, सर्वच बाजार समित्यांना दिवसभरात केवळ ५०० वाहनांमधील शेतमालाचा लिलाव करता येणार आहे. यासाठीची तयारी बाजार समित्यांनी पूर्ण केली असली, तरी कोविड चाचणीबाबत अद्यापही बाजार समिती व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने १२ मेपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर केले होते. यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. अनेक शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागली तर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली होती. बारा दिवसांनंतर सोमवारपासून बाजार समित्यांचे कामकाज सुरु करण्यास जिल्हा व्यवस्थापनाने परवानगी दिली असून, यासाठी बाजार समित्यांना मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार बाजार समित्यांमध्ये प्रत्येक आवारात ५०० वाहनांमधील शेतमालाचा लिलाव होणार असून, त्यासाठी शेतकऱ्यांना आगाऊ नोंदणी करावी लागणार आहे. बाजार समिती व्यवस्थापनातील सर्व घटकांची कोविड चाचणी आवश्यक राहणार आहे. जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समित्यांना दिलेल्या पत्रासोबतच या अटी, शर्ती मान्य असल्याचे प्रमाणपत्र बाजार समिती सचिवांना जिल्हा उपनिबंधकांना द्यावे लागणार आहे.

चौकट-

कोविड चाचणीबाबत संभ्रम

बाजार आवारात शेतमाल घेऊन येणाऱ्या व्यक्तीला सात दिवसांपूर्वीचा कोविड चाचणी अहवाल सक्तीचा करावा, असे जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समित्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. तर आस्थापनेमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर अथवा आएटी चाचणी १५ दिवसांच्या आत करुन घेणे सबंधित आस्थापनेवर बंधनकारक राहील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिध्द केलेल्या परिशिष्ट ‘ब’मध्ये म्हटले आहे. यामुळे चाचणी नेमकी किती दिवसांनी करायची, याबाबत शेतकरी आणि बाजार समित्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. काही समाजमाध्यमांवर शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये येताना दर आठ दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार आहे, अशी खोडसाळ माहिती पसरवली जात असून, अधिकृत अधिसूचनेत अशी कोणतीही अट घालण्यात आलेली नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

चौकट-

लासलगाव बाजार समितीने केली ९८४ व्यक्तींची चाचणी

सोमवारपासून बाजार समित्या सुरु करण्याची तयारी जिल्ह्यातील बाजार समित्यांनी केली असून, यासाठी शेतकऱ्यांची आगाऊ नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र मोबाईल नंबर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, त्यांच्याच मालाचा लिलाव होणार आहे. लासलगाव बाजार समितीने संबंधित ९८४ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली असून, बाजार समितीतील व्यापाऱ्यांचीही चाचणी करण्यात आल्याची माहिती सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली. जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांनीही आपापल्यापरिने तयारी पूर्ण केली आहे.