मनमाड : रेल्वेस्थानकावरून सुटणाऱ्या इगतपुरी शटलला निघण्यास तब्बल अडीच तास विलंब झाला. तांत्रिक कामकाजामुळे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी याबाबत प्रवाशांना कुठलीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. उशीर झाल्याने इगतपुरी शटल प्रवाशांअभावी रिकामीच गेली असल्याचे समजते.आज मनमाड ते समिट रेल्वेस्थानकादरम्यान तांत्रिक काम करण्यासाठी वाहतूक काही वेळासाठी बंद करण्यात आली होती. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या उशिराने सोडण्यात आल्या. दुपारच्या शटलसाठी प्रवाशांनी स्थानक गाठले. मात्र बराच कालावधी उलटूनही शटल न निघाल्याने प्रवाशांनी काढता पाय घेतला. अडीच तासाच्या विलंबानंतर शटल रवाना झाली असली तरी प्रवासी संख्या अगदी तुरळक होती.प्रशासनाने तांत्रिक कामकाज करण्याची पूर्वसूचना प्रवाशांना देणे आवश्यक असताना याबाबत कुठलीही उद्घोषणा करण्यात आली नसल्याने प्रवाशांना हकनाक मनस्ताप सहन करावा लागला. (वार्ताहर)
मनमाड-इगतपुरी शटल गेली रिकामी
By admin | Updated: September 4, 2014 00:07 IST