मालेगाव : राज्यातील अजून किती शेतकऱ्यांचा बळी घेतल्यानंतर हे शासन कर्जमाफी करणार असा संतप्त सवाल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केला. मालेगाव येथील मनमाड चौफुलीवर संघर्ष यात्रा आल्यानंतर झालेल्या सभेत पवार बोलत होते.यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील, माजीमंत्री बाळासाहेब थोरात,शोभा बच्छाव, जितेन्द्र आव्हाड, रोहिदास पाटील,जोगेंद्र कवाडे आदींसह आमदार,खासदार,पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.