शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

मनधरणी : शिक्षकाऐवजी ग्रामसेवक, तलाठी नेमणार

By admin | Updated: May 16, 2015 23:32 IST

शिक्षकांच्या असहकार्याने मतदार मोहीम धोक्यात

नाशिक : राष्ट्रीय मतदार याद्यांच्या अद्यावतीकरण करण्याचा भाग म्हणून मतदारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेवर शिक्षकांनी बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतल्याने या संदर्भात निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी जिल्हा परिषद व निवडणूक शाखेला शिक्षकांची मनधरणी करावी लागली. केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ म्हणून शिक्षकांना नेमण्याऐवजी अन्य शासकीय घटकांचीही याकामी नेमणूक करावी या मागणीवर अडून बसलेल्या शिक्षकांची समजूत घालण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविकांना बीएलओचे काम देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले, मात्र ऐनवेळी या आश्वासनाची पूर्तता होणे कठीण असल्याने मोहिमेचे भवितव्य धोक्यात आले आहे. मतदार याद्यांच्या अद्यावतीकरणात प्रत्येक मतदारांचे आधारक्रमांक घेण्यात येणार असून, त्यासाठी थेट मतदान केंद्रांवर सोय करण्यात आली आहे. रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेवर राज्य प्राथमिक शिक्षक समितीने यापूर्वीच बहिष्कार टाकून बीएलओ या कामात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले होते. या मोहिमेसाठी सुमारे सहा हजारांहून अधिक शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे व त्यांच्यामार्फतच मतदार याद्यांचे अद्यावतीकरण करण्यात येणार आहे, परंतु बहिष्कारामुळे रविवारच्या मोहिमेविषयी साशंकता व्यक्त केली जात असतानाच शनिवारी दुपारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गीतांजली बाविस्कर यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेत शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शिक्षकांनी मतदार याद्यांच्या अद्यावतीकरणाच्या राष्ट्रीय कामात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले, परंतु शिक्षक संघटनांनी शिक्षकांवर लादण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांबाबात तक्रार केली. या कामासाठी इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी यावर संघटना ठाम असल्याने अखेर निम्मे शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांना हे काम देण्याचे मान्य करण्यात आले. त्यामुळे शिक्षक संघटनेने काहीसे सकारात्मकता दर्शविली असली तरी, शिक्षकांऐवजी अन्य कर्मचाऱ्यांना हे काम देण्याबाबतचे आदेश कधी व कसे निघणार या विषयी संभ्रम आहे. या बैठकीस शिक्षक संघटनेचे काळूजी बोरसे पाटील, अंबादास वाजे, दादाजी सावंत, आर. के. खैरनार, मोठाभाऊ साळुंके, केदू देशमाने आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)