शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मालेगाव : सत्तेचा पाठशिवणीचा खेळ सुरू राहणार का?

By admin | Updated: November 1, 2014 22:05 IST

मालेगावकरांना यंदा मंत्रिपदाची आशा

संगमेश्वर : सत्तेच्या पाठशिवणीचा खेळ यंदा तरी संपणार का? याकडे मालेगाव बाह्यमधील समस्त कार्यकर्ते व सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.पूर्वाश्रमीचा दाभाडी मतदारसंघाचे आता मालेगाव बाह्यमध्ये रूपांतर झाले आहे. पूर्वाश्रमीच्या दाभाडी मतदारसंघाने कायम सत्तेच्या बाजूने कौल दिल्याने त्याचे फळ म्हणून नेहमी मंत्रिपदे या मतदारसंघाला मिळाली आहेत. भाऊसाहेब हिरे, व्यंकटराव हिरे, डॉ. बळीराम हिरे, पुष्पाताई हिरे, प्रशांत हिरे यांनी या मतदारसंघातून वेळोवेळी विजय मिळवत राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविले होते. सत्ताधारी पक्षाची पाठराखण झाल्यामुळे विकासकामांना गती मिळते. नवनवीन प्रकल्प मंजूर करून घेणे सोपे जाते, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र २००४ व २००९ च्या निवडणुकीत मालेगाव बाह्य मतदारसंघाने शिवसेनेला विजयी केले. राज्यात कॉँग्रेस आघाडीची सत्ता तर मालेगाव बाह्यमध्ये त्यांचा विरोधक असलेल्या शिवसेनेला प्रतिनिधीत्व असे चित्र होते. विरोधी पक्षाचा आमदार झाल्याने दहा वर्षांपासून राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करण्याची परंपरा खंडित झाली.यंदा २०१४च्या निवडणुकीत दादा भुसे यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली. यावेळी कॉँग्रेस आघाडीला पराभवास जावे लागल्याने राज्यात भाजपा मित्रपक्षांचे सरकार आले आहे. यावेळी तरी भाजपा शिवसेना यांचे सरकार येऊन सत्तेच्या पाठशिवणीचा खेळ संपेल व मालेगाव बाह्यचे आमदार भुसे यांना मंत्रिपदाची संधी मिळेल. त्यायोगे या भागाच्या विकासाला अधिक गती मिळू शकेल, शेती, पाणी, बेरोजगारी, शिक्षण आदि प्रश्न जलद गतीने सोडविण्यास मदत होईल. या भागाला पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळून दहा वर्षाची प्रतीक्षा यंदा संपेल असा आशावाद कार्यकर्ते व मतदारांमध्ये निर्माण झाला आहे. मात्र विधानसभा निवडणूक निकालानंतर वरिष्ठ पातळीवर भाजपा सेनेतील ताणल्या गेलेल्या संबंधांमुळे ही आशा कितपत खरी होते याविषयी संंभ्रमाचे वातावरण आहे.