शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
3
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
4
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
5
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
6
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
7
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
8
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
9
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
10
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
11
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
12
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
13
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
14
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
15
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
16
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
17
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
18
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
19
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
20
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला

मालेगावला करणार हागणदारीमुक्त शहर

By admin | Updated: July 6, 2017 00:17 IST

संगीता धायगुडे : स्वच्छता कार्यशाळेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव कॅम्प : शहर व परिसरात सार्वजनिक मध्यवर्ती मोकळ्या भूखंडांवर केरकचरा टाकल्यास अथवा उघड्यावर शौचास बसणाऱ्या व्यक्तीस ५०० रुपये दंड करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल. ३१ जुलैपर्यंत मालेगाव शहर हागणदारीमुक्त करू, असे प्रतिपादन मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांनी केले.येथील आयएमएच्या सभागृहात मनपातर्फे मालेगाव शहर हागणदारीमुक्त व स्वच्छतेसंदर्भात आयोजित कार्यशाळेत धायगुडे बोलत होत्या. व्यासपीठावर महापौर रशीद शेख, पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने, नगरसेवक ज्योती भोसले, सुनील गायकवाड उपस्थित होते. यावेळी धायगुडे म्हणाल्या, एवढ्यावर थांबून चालणार नाही. मी पदभार सांभाळल्यानंतर प्रथम शहराची माहिती घेतली. मालेगाव हे बकाल वस्तीचे गाव आहे हे मला माहीत होते. येथे आल्यावर सर्व अधिकाऱ्यांच्या विभागवार बैठका घेऊन कामाच्या नियोजनाची तयारी केली. यामध्ये प्रत्येकांना जबाबदारी वाटून दिली आहे. या कामासाठी अधिकारी दिवसभर दहा-बारा तास काम करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत या सफाई अभियानात गुंतलेले आहे. मालेगाव शहर येत्या ३१ जुलैपर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा चंग आम्ही बांधला आहे. १५ जुलैपर्यंत आम्हाला अपेक्षित यश मिळेलच. तसेच शहरातून जाणाऱ्या मोसम नदीच्या दुरवस्थेबाबत अनेक तक्रारी आहेत. ही नदी आम्ही दोन दिवसात स्वच्छ करू. त्यासाठी दहा-पंधरा लाख रुपये खर्च करू; पण पुढे काय? काही दिवसात पुन्हा तिची तीच अवस्था होणार आहे. नदी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नागरिकांची आहे याचे भान ठेवावे. त्यामुळे केवळ मनपा प्रशासनावर अवलंबून न राहता नागरिकांनी स्वच्छतेबाबत जागृत रहावे. जी व्यक्ती स्वत:हून शहराच्या स्वच्छतेला मुद्दाम गालबोट लावेल त्यासाठी त्यावर कायदेशीर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.यावेळी नगरसेवक अ‍ॅड. ज्योती भोसले, सुनील गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. मनपाचे चारही प्रभागातील अधिकारी, कर्मचारी, एनजीओ, उपायुक्त प्रदीप पठारे, विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन उपायुक्त अंबादास गरकळ यांनी केले.६५ ठिकाणे शहरात हागणदारीयुक्त आहेत. तेथे उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आम्ही या ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी गुडमॉर्निंग पथक व अशासकीय सामाजिक संस्था (एनजीओ), विविध सामाजिक क्लब, संस्था यांच्या मदतीने नागरिकांचे समुपदेशन केले जात आहे. यामुळे चार ते पाच ठिकाणे सध्या हागणदारीमुक्त झाली आहेत.हागणदारी व स्वच्छता अभियानाला नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहकार्य करावे. गेल्या अनेक वर्षात शहराला बकाल स्वरूप आले आहे. अतिक्रमण, रस्ते, गटारी आदि मुख्य समस्यांचे निराकरण करायचे आहे. त्यासाठी पूर्ण तयारीसह नियोजन करावे लागणार आहे. शहरातील अस्वच्छता व हागणदारीचा आलेख चिंता करायला लावणारा आहे. अभियान यशस्वी करा, शहर स्वच्छ ठेवा जेणेकरून राज्य व केंद्राची आर्थिक मदत मालेगावला मिळू शकेल. शहराच्या विकासाला हातभार लागेल. - रशीद शेख, महापौर