शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

मालेगावला करणार हागणदारीमुक्त शहर

By admin | Updated: July 6, 2017 00:17 IST

संगीता धायगुडे : स्वच्छता कार्यशाळेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव कॅम्प : शहर व परिसरात सार्वजनिक मध्यवर्ती मोकळ्या भूखंडांवर केरकचरा टाकल्यास अथवा उघड्यावर शौचास बसणाऱ्या व्यक्तीस ५०० रुपये दंड करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल. ३१ जुलैपर्यंत मालेगाव शहर हागणदारीमुक्त करू, असे प्रतिपादन मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांनी केले.येथील आयएमएच्या सभागृहात मनपातर्फे मालेगाव शहर हागणदारीमुक्त व स्वच्छतेसंदर्भात आयोजित कार्यशाळेत धायगुडे बोलत होत्या. व्यासपीठावर महापौर रशीद शेख, पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने, नगरसेवक ज्योती भोसले, सुनील गायकवाड उपस्थित होते. यावेळी धायगुडे म्हणाल्या, एवढ्यावर थांबून चालणार नाही. मी पदभार सांभाळल्यानंतर प्रथम शहराची माहिती घेतली. मालेगाव हे बकाल वस्तीचे गाव आहे हे मला माहीत होते. येथे आल्यावर सर्व अधिकाऱ्यांच्या विभागवार बैठका घेऊन कामाच्या नियोजनाची तयारी केली. यामध्ये प्रत्येकांना जबाबदारी वाटून दिली आहे. या कामासाठी अधिकारी दिवसभर दहा-बारा तास काम करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत या सफाई अभियानात गुंतलेले आहे. मालेगाव शहर येत्या ३१ जुलैपर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा चंग आम्ही बांधला आहे. १५ जुलैपर्यंत आम्हाला अपेक्षित यश मिळेलच. तसेच शहरातून जाणाऱ्या मोसम नदीच्या दुरवस्थेबाबत अनेक तक्रारी आहेत. ही नदी आम्ही दोन दिवसात स्वच्छ करू. त्यासाठी दहा-पंधरा लाख रुपये खर्च करू; पण पुढे काय? काही दिवसात पुन्हा तिची तीच अवस्था होणार आहे. नदी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नागरिकांची आहे याचे भान ठेवावे. त्यामुळे केवळ मनपा प्रशासनावर अवलंबून न राहता नागरिकांनी स्वच्छतेबाबत जागृत रहावे. जी व्यक्ती स्वत:हून शहराच्या स्वच्छतेला मुद्दाम गालबोट लावेल त्यासाठी त्यावर कायदेशीर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.यावेळी नगरसेवक अ‍ॅड. ज्योती भोसले, सुनील गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. मनपाचे चारही प्रभागातील अधिकारी, कर्मचारी, एनजीओ, उपायुक्त प्रदीप पठारे, विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन उपायुक्त अंबादास गरकळ यांनी केले.६५ ठिकाणे शहरात हागणदारीयुक्त आहेत. तेथे उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आम्ही या ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी गुडमॉर्निंग पथक व अशासकीय सामाजिक संस्था (एनजीओ), विविध सामाजिक क्लब, संस्था यांच्या मदतीने नागरिकांचे समुपदेशन केले जात आहे. यामुळे चार ते पाच ठिकाणे सध्या हागणदारीमुक्त झाली आहेत.हागणदारी व स्वच्छता अभियानाला नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहकार्य करावे. गेल्या अनेक वर्षात शहराला बकाल स्वरूप आले आहे. अतिक्रमण, रस्ते, गटारी आदि मुख्य समस्यांचे निराकरण करायचे आहे. त्यासाठी पूर्ण तयारीसह नियोजन करावे लागणार आहे. शहरातील अस्वच्छता व हागणदारीचा आलेख चिंता करायला लावणारा आहे. अभियान यशस्वी करा, शहर स्वच्छ ठेवा जेणेकरून राज्य व केंद्राची आर्थिक मदत मालेगावला मिळू शकेल. शहराच्या विकासाला हातभार लागेल. - रशीद शेख, महापौर