शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

स्थायीच्या राजीनाम्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कलह

By admin | Updated: July 14, 2016 00:59 IST

राजकारण : पुढील बुधवारी दोन नव्या सदस्यांची नियुक्ती

 नाशिक : महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदाचा वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या मनसेच्या सुरेखा भोसले आणि मेघा साळवे या दोन सदस्यांचे राजीनामे पक्षाने मंजूर केले असून, त्यावरून सध्या पक्षात जुंपली आहे. यशवंत निकुळे यांना मात्र अभय देण्यात आल्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, स्थायी समितीच्या या दोन रिक्त जागांसाठी येत्या बुधवारी (दि.२०) महासभेत नियुक्तप्रक्रिया राबवली जाणार आहे.महापालिकेच्या महत्त्वपूर्ण स्थायी समितीसाठी सर्वच पक्षात रस्सीखेच असते. त्यातच आता निवडणुकीऐवजी पक्षीय तौलनिक बळानुसार नियुक्तीची पद्धत असल्याने राजकीय पक्ष निर्धास्त झाले असून, दोन वर्षांसाठी सदस्यांचा कालावधी असताना आता या समितीवर प्रत्येकाला संधी मिळावी, यासाठी दरवर्षीच पक्षाच्या सदस्यांचे राजीनामे घेऊन अन्य सदस्यांना संधी दिली जाते. स्थायी समितीवर असलेल्या मनसेच्या सुरेखा भोसले, मेघा साळवे आणि यशवंत निकुळे या तीन सदस्यांचा वर्षभराचा कालावधी फेबु्रवारी महिन्यात संपल्यानंतर अन्य सदस्याला संधी देण्यासाठी त्यांचे राजीनामे पक्षाने घेऊन ठेवले मात्र सभापतिपदाची निवडणूक झाल्यानंतर हे राजीनामे स्वीकृत करण्याचे ठरले होते. परंतु आता पक्षाने राजीनामे मंजूर करू नये, यासाठी सर्वच सदस्य इच्छुक असताना पक्षाने सुरेखा भोसले आणि मेघा साळवे यांचे राजीनामे मंजूर केले असून त्यांच्या जागी पक्षाच्या अन्य सदस्यांना संधी मिळावी, यासाठी येत्या २० जुलै रोजी महासभेत नियुक्ती केली जाण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मनसेत अंतर्गत वाद निर्माण झाल्याचे वृत्त आहे. कारण, तीनपैकी दोन जणांचे राजीनामे घेण्यात आले असून कोणाचे राजीनामे मंजूर झाले हे संबंधितांना अद्याप ज्ञात नाही. महापौर कार्यालयाकडून मात्र भोसले आणि साळवे यांचे राजीनामे मंजूर करण्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)