शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

कमी पर्जन्यमानाचा परिणाम : शेकडो कूपनलिका आटल्या; शेतीवर सावट, पाण्यासाठी जनावरांची तडफड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2016 22:48 IST

दिंडोरी तालुक्यात विहिरींनी गाठला तळ

भगवान गायकवाड ल्ल दिंडोरीगेल्या काही वर्षांपासून जमिनीतील पाण्याची पातळी घटत असताना तालुक्याच्या ज्या पश्चिम भागात धरणे आहेत तेथे अत्यल्प पाऊस झाल्याने यंदा सारीच धरणे अर्धी भरली. परिणामी आवर्तन न सुटल्याने यंदा अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेकडो कूपनलिका आटल्या असून, विहिरींनी तळ गाठला आहे.कधीही पाणीटंचाई न जाणवलेल्या विविध नद्यांलगतच्या गावांना यंदा नुसत्या टंचाईच्या झळा पोहोचत नाही तर यंदा टँकर मागविण्याची वेळ आली असून, टँकरमुक्त दिंडोरी तालुक्याला २२ गावांना टँकर मागणीची वेळ येणार आहे तर तब्बल ११३ गावे यंदा पाणीटंचाईच्या फेऱ्यात आली असून, त्यात अजून वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. इतर तालुक्यांची तहान भागविणाऱ्या दिंडोरी तालुक्याला यंदा प्रथमच तहानलेला राहण्याची वेळ आली आहे. दिंडोरी तालुक्यातील १५५ गाव पाड्यांना यापूर्वीच विविध योजनांमधून नळ पाणीपुरवठा राबविल्या गेल्या असून, गावोगावी शेकडो कूपनलिका हातपंप आहे. मात्र यंदा प्रथमच विविध कूपनलिकांचे पाणी आटले असून, हातपंप शोभेचे बाहुले झाले आहे तर फेब्रुवारीतच अनेक विहिरींनी गाठल्याने विविध गावांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पंचायत समितीतर्फे आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून तिमाही पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखडा बनविला असून, त्यात मार्चपर्यंत आठ गावांना टँकर देण्याची तर जूनपर्यंत पुन्हा दहा गावांना टँकर देण्याची वेळ येण्याचा अंदाज बांधला आहे. प्राथमिक टप्प्यात ज्या गावात पाणीटंचाई जाणवू लागली आहे तेथे आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत. विहिरींचे खोलीकरण, खासगी विहीर अधिग्रहण आदि कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. विविध गावातील नादुरुस्त पाणीपुरवठा योजना दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. विविध गावात कूपनलिका खोदण्यात येत आहे; मात्र अनेक कूपनलिका कोरड्या जात असल्याने मोठी अडचण झाली आहे. टंचाई आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात पाच गावे व एक वाडी येथे उपाययोजना करण्यात आल्या दुसऱ्या टप्प्यात ६५ गावे आठ पाडे येथे उपाययोजना करण्यात येत आहे तर तिसऱ्या टप्प्यात ३३ गावे व एकपाडे येथे उपाययोजना करण्यात येणार आहे. असे यंदा तब्बल एकूण १०३ गावे १० वाडी-पाडे यांना टंचाईच्या झळा पोहोचल्या असून, यात अजून गावे वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. उर्वरित गावांत मोठ्या प्रमाणात पाणीकपात करावी लागत आहे.कादवासह इतर नदीवर अवलंबून असणाऱ्या अनेक गावांना पाणीटंचाई दिंडोरी तालुक्यात सात धरणे असून, कादवा, उनंदा, कोलवण या प्रमुख नद्यांवर विविध गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे यंदा सारेच धरणे न भरल्याने या नद्यांना पाणी सोडले न गेल्याने साऱ्या नद्यांचे नदीपात्र कोरडे झाले आहे. त्यामुळे या गावांना प्रथमच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यात प्रामुख्याने चिंचखेड, कुर्णोली, खडकसुकेणे, लोखंडेवाडी, जोपूळ, मातेरेवाडी, पाडे, हातनोरे यांचा समावेश आहे.