शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कमी पर्जन्यमानाचा परिणाम : शेकडो कूपनलिका आटल्या; शेतीवर सावट, पाण्यासाठी जनावरांची तडफड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2016 22:48 IST

दिंडोरी तालुक्यात विहिरींनी गाठला तळ

भगवान गायकवाड ल्ल दिंडोरीगेल्या काही वर्षांपासून जमिनीतील पाण्याची पातळी घटत असताना तालुक्याच्या ज्या पश्चिम भागात धरणे आहेत तेथे अत्यल्प पाऊस झाल्याने यंदा सारीच धरणे अर्धी भरली. परिणामी आवर्तन न सुटल्याने यंदा अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेकडो कूपनलिका आटल्या असून, विहिरींनी तळ गाठला आहे.कधीही पाणीटंचाई न जाणवलेल्या विविध नद्यांलगतच्या गावांना यंदा नुसत्या टंचाईच्या झळा पोहोचत नाही तर यंदा टँकर मागविण्याची वेळ आली असून, टँकरमुक्त दिंडोरी तालुक्याला २२ गावांना टँकर मागणीची वेळ येणार आहे तर तब्बल ११३ गावे यंदा पाणीटंचाईच्या फेऱ्यात आली असून, त्यात अजून वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. इतर तालुक्यांची तहान भागविणाऱ्या दिंडोरी तालुक्याला यंदा प्रथमच तहानलेला राहण्याची वेळ आली आहे. दिंडोरी तालुक्यातील १५५ गाव पाड्यांना यापूर्वीच विविध योजनांमधून नळ पाणीपुरवठा राबविल्या गेल्या असून, गावोगावी शेकडो कूपनलिका हातपंप आहे. मात्र यंदा प्रथमच विविध कूपनलिकांचे पाणी आटले असून, हातपंप शोभेचे बाहुले झाले आहे तर फेब्रुवारीतच अनेक विहिरींनी गाठल्याने विविध गावांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पंचायत समितीतर्फे आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून तिमाही पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखडा बनविला असून, त्यात मार्चपर्यंत आठ गावांना टँकर देण्याची तर जूनपर्यंत पुन्हा दहा गावांना टँकर देण्याची वेळ येण्याचा अंदाज बांधला आहे. प्राथमिक टप्प्यात ज्या गावात पाणीटंचाई जाणवू लागली आहे तेथे आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत. विहिरींचे खोलीकरण, खासगी विहीर अधिग्रहण आदि कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. विविध गावातील नादुरुस्त पाणीपुरवठा योजना दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. विविध गावात कूपनलिका खोदण्यात येत आहे; मात्र अनेक कूपनलिका कोरड्या जात असल्याने मोठी अडचण झाली आहे. टंचाई आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात पाच गावे व एक वाडी येथे उपाययोजना करण्यात आल्या दुसऱ्या टप्प्यात ६५ गावे आठ पाडे येथे उपाययोजना करण्यात येत आहे तर तिसऱ्या टप्प्यात ३३ गावे व एकपाडे येथे उपाययोजना करण्यात येणार आहे. असे यंदा तब्बल एकूण १०३ गावे १० वाडी-पाडे यांना टंचाईच्या झळा पोहोचल्या असून, यात अजून गावे वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. उर्वरित गावांत मोठ्या प्रमाणात पाणीकपात करावी लागत आहे.कादवासह इतर नदीवर अवलंबून असणाऱ्या अनेक गावांना पाणीटंचाई दिंडोरी तालुक्यात सात धरणे असून, कादवा, उनंदा, कोलवण या प्रमुख नद्यांवर विविध गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे यंदा सारेच धरणे न भरल्याने या नद्यांना पाणी सोडले न गेल्याने साऱ्या नद्यांचे नदीपात्र कोरडे झाले आहे. त्यामुळे या गावांना प्रथमच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यात प्रामुख्याने चिंचखेड, कुर्णोली, खडकसुकेणे, लोखंडेवाडी, जोपूळ, मातेरेवाडी, पाडे, हातनोरे यांचा समावेश आहे.