शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

खुल्या पुरोगामी विचारांचा अभ्यासक गमावला

By admin | Updated: April 16, 2015 00:44 IST

रावसाहेब कसबे : शोकसभेत पुरोगामी संघटनांनी वाहिली श्रद्धांजली

नाशिक : डॉ. यशवंत सुमंतच्या जाण्याने समविचारी मित्र हरपला असून, हे अंत:करणासाठी अत्यंत वेदनादायी आहे. मितभाषी व मृदू स्वभावाचा आणि खुल्या पुरोगामी विचारांचा अभ्यासक राज्यातील पुरोगामी चळवळीने गमावला, अशा शब्दामध्ये ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी आदरांजली वाहिली.ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत व परिवर्तनवादी लेखक डॉ. यशवंत सुमंत यांचे नुकतेच निधन झाले. शहरातील पुरोगामी संघटनांच्या वतीने सीबीएसवरील हुतात्मा स्मारकात सुमंत यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सुमंत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कसबे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ते म्हणाले, यशवंत यांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीची कधी न भरून निघणारी हानी झाली आहे. एक खुल्या विचारांचा मित्र व साध्या सोप्या भाषेत परिवर्तनवादी तत्त्वज्ञान सांगणारा अभ्यासक म्हणून त्यांना विसरणे अवघड आहे. १९८० पर्यंत पुरोगामी विचारांच्या साचलेल्या डबक्यांना छेद देऊन या राज्यात वैचारिक प्रवाहाला गती देण्याचे अत्यंत महत्त्वाचे योगदान यशवंत यांनी चळवळीसाठी दिले आहे. महात्मा गांधी यांच्याप्रमाणेच यशवंत यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मार्क्स यांचेही आकर्षण होते. त्यामुळेच त्यांना सगळ्यात ‘तरुण’ विचारवंत असे म्हटले जात होते. या जगामध्ये केवळ अध्यात्म आणि विज्ञान या दोनच गोष्टी चिरंतन आहे, अशा साध्या सोप्या भाषेत यशवंत तत्त्वज्ञान समजावून देत होता. त्यांच्या लेखणी व वाणीने या राज्यात पुरोगामी विचारांचा झरा नेहमीच खळखळता ठेवला. यावेळी व्यासपीठावर प्रा. सुरेश जोंधळे, स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर, छाया देव, राजू देसले, मंगला गोसावी, मुकुंद दीक्षित, डॉ. प्रदीप जायभावे, कृष्णा चांदगुडे, सचिन मालेगावकर यांच्यासह पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.