शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खुल्या पुरोगामी विचारांचा अभ्यासक गमावला

By admin | Updated: April 16, 2015 00:44 IST

रावसाहेब कसबे : शोकसभेत पुरोगामी संघटनांनी वाहिली श्रद्धांजली

नाशिक : डॉ. यशवंत सुमंतच्या जाण्याने समविचारी मित्र हरपला असून, हे अंत:करणासाठी अत्यंत वेदनादायी आहे. मितभाषी व मृदू स्वभावाचा आणि खुल्या पुरोगामी विचारांचा अभ्यासक राज्यातील पुरोगामी चळवळीने गमावला, अशा शब्दामध्ये ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी आदरांजली वाहिली.ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत व परिवर्तनवादी लेखक डॉ. यशवंत सुमंत यांचे नुकतेच निधन झाले. शहरातील पुरोगामी संघटनांच्या वतीने सीबीएसवरील हुतात्मा स्मारकात सुमंत यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सुमंत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कसबे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ते म्हणाले, यशवंत यांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीची कधी न भरून निघणारी हानी झाली आहे. एक खुल्या विचारांचा मित्र व साध्या सोप्या भाषेत परिवर्तनवादी तत्त्वज्ञान सांगणारा अभ्यासक म्हणून त्यांना विसरणे अवघड आहे. १९८० पर्यंत पुरोगामी विचारांच्या साचलेल्या डबक्यांना छेद देऊन या राज्यात वैचारिक प्रवाहाला गती देण्याचे अत्यंत महत्त्वाचे योगदान यशवंत यांनी चळवळीसाठी दिले आहे. महात्मा गांधी यांच्याप्रमाणेच यशवंत यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मार्क्स यांचेही आकर्षण होते. त्यामुळेच त्यांना सगळ्यात ‘तरुण’ विचारवंत असे म्हटले जात होते. या जगामध्ये केवळ अध्यात्म आणि विज्ञान या दोनच गोष्टी चिरंतन आहे, अशा साध्या सोप्या भाषेत यशवंत तत्त्वज्ञान समजावून देत होता. त्यांच्या लेखणी व वाणीने या राज्यात पुरोगामी विचारांचा झरा नेहमीच खळखळता ठेवला. यावेळी व्यासपीठावर प्रा. सुरेश जोंधळे, स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर, छाया देव, राजू देसले, मंगला गोसावी, मुकुंद दीक्षित, डॉ. प्रदीप जायभावे, कृष्णा चांदगुडे, सचिन मालेगावकर यांच्यासह पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.