शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जिल्हा बँकेला ठोकले कुलूप

By admin | Updated: February 3, 2017 00:35 IST

कर्मचाऱ्यांना कोंडले : रक्कम मिळत नसल्याने ग्रामस्थांचा संताप

नगरसूल : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत दररोज फेऱ्या घालूनही खात्यात असणारी हक्काच्या कमाईची रक्कम मिळत नसल्याने येथील संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना कोंडून शाखेला कुलूप ठोकले. नोटाबंदीचा परिणाम प्रामुख्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली असून, शेतकऱ्याची जिव्हाळ्याची जिल्हा बँक व सहकारी पतसंस्थेत नोटाबंदीच्या निर्णयानंतर आजपर्यंत नगरसूल जिल्हा बँकेत दोन हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे दिले नाहीत. महिन्यात साधारण सात ते आठ वेळा पैसे येतात तेही दिवसाला लाख दोन लाख. त्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी रांगा लावून असतात. त्यामध्ये काही शेतकऱ्यांना पैसे मिळतात तर काहींना पैसे संपल्यामुळे रिकाम्या हाती परतावे लागते, अशी परिस्थिती नेहमीची झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अखेर बँकेला कुलूप लावून कर्मचाऱ्यांना कोंडले. शेतमालाचे चेक महिना-दीड महिना होऊनही खात्यात जमा होत नाहीत. माल विक्रीनंतर व्यापारी त्यांच्या सोईने तारखा टाकतात. त्या तारखेनंतर बँकेत चेक भरायचा आणि चेक भरल्यानंतर महिन्याने चौकशी केली तरी चेक जमा झालेला नसतो. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. शेतमाल विक्रीनंतर तब्बल दोन महिन्याने शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होतात. याबाबत रिझर्व्ह बँकेने चौकशी करावी, अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी विकासो माजी अध्यक्ष सुभाष निकम, माधव बागुल, दत्तू धनवटे, प्रकाश वाघ, दत्तू नागरे, अर्जुन मुंढे, विठ्ठल सानप, वामन बारे, विनायक निकम, श्रावण पवार, विजय गायकवाड यांच्यासह २०० शेतकरी उपस्थित होते. चलन तुटवड्यामुळे दैनंदिन व्यवहारावर परिणाम झाला असून, बाजारपेठ ओस पडल्या आहेत. शेतकरी त्रस्त झाला आहे. शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना आठवड्याला पगार करावा लागतो. पण आठवड्यापासून बँकेचे उंबरठे झिजवूनदेखील पैसे मिळत नाही. बँकेने तर बँकेबाहेर पैसे नसल्याचा फलक लावला आहे. पैसे उपलब्ध नसल्याने व्यवहार बंदचा फलक पाहून लोक माघारी जातात आता मजुरांना काय सांगायचे हा प्रश्न शेतकऱ्याना पडला आहे. मजूर म्हणतात बाजार करण्यासाठी तर द्या, बाकीचे नंतर द्या. नोटाबंदीमुळे जनतेला मोठा त्रास होत असून, त्याचा परिणाम बाजार पेठातील किराणा दुकान, कापड दुकान, हार्डवेअर, जनरल स्टोअर, हॉटेलसह अनेक दुकानदार फक्त बसून आहेत. (वार्ताहर)