शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

चाऱ्याअभावी पशुधन धोक्यात !

By admin | Updated: June 6, 2016 00:11 IST

चाऱ्याअभावी पशुधन धोक्यात !

खामखेडा : पावसाची खरी सुरु वात रोहिणी नक्षत्रापासून होते. रोहिणी नक्षत्र संपत आले तरी अजूनही पावसाची कुठलीही चिन्हे दिसत नसल्याने लांबलेल्या पावसामुळे आता शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर चाराटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे असलेला अल्प चारा संपला आहे. विकतचा चारा घेऊन जनावरे पोसणे मुश्कील झाले आहे. तेव्हा जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.गेल्या वर्षी खामखेडा परिसरात शेतकऱ्यांनी सुरुवातीला जेमतेम पावसावर रब्बी पिकांची पेरणी केली होती. नंतर पावसाने दीड महिना दांडी मारल्याने रब्बीची पाहिजे त्या प्रमाणात पिके आली नाही. ऐन पिकांच्या कापणीच्या वेळेस पावसाने धुमाकूळ घातल्याने चारा पावसाच्या पाण्याने भिजून मका, बाजरीचा कडबा खराब झाला होता. त्यामुळे चाऱ्याचे प्रमाण कमी झाले होते. शेतकऱ्याकडे साधारण मे महिन्यापर्यंत जनावरांना पुरेल एवढा चारा असतो. मे किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडल्यानंतर साधारण पंधरा दिवसांनंतर सर्वत्र हिरवा चारा जनावरांना चरण्यासाठी शिवारात उपलब्ध होत असतो. परंतु चालू वर्षी मे महिना संपून जून महिना सुरू होऊन पाच-सहा दिवस झाले तरी पावसाचा कोठेही अंदाज दिसत नाही. शेतकऱ्यांकडचा चारासाठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे.अनेक शेतकरी दुसरीकडे कोठे हिरवा चारा मिळतो का, याचा तपास करीत आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींना थोड्या फार प्रमाणात पाणी आहे अशा शेतकऱ्यांनी ज्वारीच्या कडब्याची पेरणी केली. त्या हिरव्या कडब्याचे चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. साधारण एक ओळीचा भाव चार-पाच हजार रुपये झाला आहे. या एका ओळीत एक ट्रॅक्टर ट्रॉंलीभर चारा येतो. काही तुरळक शेतकऱ्यांकडे उसाचा चारा आहे. या उसाच्या एका सरीचे भाव (याला ग्रामीण भागात बेले म्हणतात) एक हजार ते पंधराशे रुपये झाला आहे. एका उसाच्या सरीत साधारण एक बैलगाडीभर चारा येतो. त्यामुळे सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकऱ्याला आपले महागडे पशुधन जगविणे मुश्कील झाले आहे. हिरव्या चाऱ्याचा भाव गगनाला भिडला आहे. तेव्हा तीन-चार शेतकरी एकत्र येऊन ज्वारी किंवा उसाची खरेदी करून जनावरांसाठी चारा उपलब्ध करीत आहेत. आता सर्व पर्याय संपल्याने शासनाने जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. (वार्ताहर)