शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

कोरोनावर लिंबू, संत्री, मोसंबीचा उतारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:14 IST

नाशिक : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिक नाना उपाय करू लागले असून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी विविध फळांनाही मागणी वाढली आहे. ...

नाशिक : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिक नाना उपाय करू लागले असून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी विविध फळांनाही मागणी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत मोसंबी, संत्री व लिंंबाना मोठी मागणी आहे. मात्र उन्हाळा व वाढती मागणी लक्षात घेता या फळांचे दर महिनाभरापासून गगनाला भिडले आहेत. नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा विविध उपाययोजना राबवत असताना आता नाशिककरही प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध उपाय करू लागले आहेत. कोरोना महामारीत प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लिंब, संत्री, माेसंबी प्रभावी ठरत आहे. त्यामुळे या तिन्ही रसवर्गीय फळांच्या किमतीत कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बाजारात लिंबूचे भाव तर गगनाला भिडत असल्याचे चित्र आहे. ही फळे व विविध प्रकारच्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्वाचे प्रमाण अधिक असल्याने प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत होत आहे. त्यामुळे नागरिक आपल्या आहारात पालेभाज्या व फळांचा मोठ्या प्रमाणात वापर करू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मागणी वाढल्याने मोसंबी, संत्री व लिंबाचे दर गगनाला भिडले आहेत. काही महिन्यांपूर्वी तीस रुपये किलो या

दराने मिळणारे लिंबू आता १०० रुपयांवर पोहोचले आहेत. मोसंबीही ६० ते ७० रुपयांहून १२५ रुपयांवर गेली आहे. तर संत्र्यांची आवक कमी झाली असून दरही १२० ते १३० रुपयांवर आहेत.

प्रतिकिलो दर

महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल

लिंबू ३० - ५० - ७० - १००

मोसंबी ७० - ७० - १०० - १२०

संत्री ४० - ६० - १०० - १२०

इन्फो

३० टक्क्यांनी वाढले दर

नाशिक जिल्ह्यात नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात कोरोनाचा प्रकोप कमी होता. तसेच हिवाळा असल्याने लिबू, संत्री आणि मोसंबी या रसवर्गीय फाळांना फारसा उठाव होत नव्हता, जानेवारीतही हीच परिस्थिती कायम होती. मात्र, फेब्रुवारीच्या मध्यानंतर कोरोनाचा प्रकोप वाटला आता मार्च, एप्रिलमध्ये कडक उन्हाला सुरुवात झाल्याने लिंबू, संत्री, मोसंबी या फळांचे दर जवळपास ३० टक्क्यांनी वाढले आहेत. उत्पादन कमी व मागणीत वाढ झाल्याने फळांचे दर वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

इन्फो-

मोसंबी औरगाबाद, संत्री नागपूर तर लिंबाची विजापूर, पंढरपूरहून आवक होते.

नाशिक जिल्ह्यात परजिल्ह्यातून फळांची आवक मोठ्या प्रमाणात होते. जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठेत दाखल होणारी मोसंबी ही औरंगाबाद येथून तर संत्री ही नागपूर जिल्ह्यातून येते. जिल्ह्यात लिंबाची आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे. हे लिंबू कर्नाटक राज्यातील विजापूर, पंढरपूर येथून जिल्ह्यात येतात.

--

मी फळे खातो, तुम्हीही खा..,

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आहारामध्ये फळांचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे. संत्री, मोसंबी, लिंबू ही रसवर्गीय फळे ही उणीव भरून काढतात. त्यामुळे सर्वांनीच फळांचे सेवन करायला हवे, आमच्या कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून आहारात नियमात फळांचा समावेश करण्यात आला आहे.

राजेश जाधव- इंदिरानगर

---

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने प्रतिकार शक्ती वाढविणे गरजेचे बनले आहे. सर्व प्रकारची फळे खाल्ल्यास शरीराला आवश्यक जीवनसत्व मिळतात. त्यामुळे आहारात फळांचा समावेश करणे आवश्यक असल्याने गेल्या तीन ते चार महिन्यात आहारात फळांचा नियमित वापर सुरू केला आहे.

-विलास पवार, नाशिकरोड.

----

तज्ज्ञ म्हणातात...

विविध जीवनसत्व असलेली फळे सेवन केल्याने शररीताल रोग प्रतिकार शक्ती वाढते. मात्र केव‌‌ळ फळे आणि पोषक आहारामुळे कोरोनावर मात करता येत नाही .रोग प्रतिकार शक्ती कोरोना रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकणारी असली तरी सर्वांनीच प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त हो आहे.

--

फळ व पालेभाज्यांचा आहारात समावेश असणे अत्यत महत्वाचे आहे. फळे पालेभाज्यांमुळे शरीरराला आवश्यक जीवनसत्व मिळतात. त्यामुळे कोरोनाचा वाढता फैलाव पाहता प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्रत्येकाने फळांचा आहारात समावेश करावा. असा सल्लाही डॉक्टरांकडून दिला जात आहे.

===Photopath===

080421\08nsk_8_08042021_13.jpg~080421\08nsk_10_08042021_13.jpg

===Caption===

डमी सोबत जोडली आहे. ~डमी सोबत जोडली आहे.