शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कोरोनावर लिंबू, संत्री, मोसंबीचा उतारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:14 IST

नाशिक : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिक नाना उपाय करू लागले असून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी विविध फळांनाही मागणी वाढली आहे. ...

नाशिक : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिक नाना उपाय करू लागले असून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी विविध फळांनाही मागणी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत मोसंबी, संत्री व लिंंबाना मोठी मागणी आहे. मात्र उन्हाळा व वाढती मागणी लक्षात घेता या फळांचे दर महिनाभरापासून गगनाला भिडले आहेत. नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा विविध उपाययोजना राबवत असताना आता नाशिककरही प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध उपाय करू लागले आहेत. कोरोना महामारीत प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लिंब, संत्री, माेसंबी प्रभावी ठरत आहे. त्यामुळे या तिन्ही रसवर्गीय फळांच्या किमतीत कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बाजारात लिंबूचे भाव तर गगनाला भिडत असल्याचे चित्र आहे. ही फळे व विविध प्रकारच्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्वाचे प्रमाण अधिक असल्याने प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत होत आहे. त्यामुळे नागरिक आपल्या आहारात पालेभाज्या व फळांचा मोठ्या प्रमाणात वापर करू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मागणी वाढल्याने मोसंबी, संत्री व लिंबाचे दर गगनाला भिडले आहेत. काही महिन्यांपूर्वी तीस रुपये किलो या

दराने मिळणारे लिंबू आता १०० रुपयांवर पोहोचले आहेत. मोसंबीही ६० ते ७० रुपयांहून १२५ रुपयांवर गेली आहे. तर संत्र्यांची आवक कमी झाली असून दरही १२० ते १३० रुपयांवर आहेत.

प्रतिकिलो दर

महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल

लिंबू ३० - ५० - ७० - १००

मोसंबी ७० - ७० - १०० - १२०

संत्री ४० - ६० - १०० - १२०

इन्फो

३० टक्क्यांनी वाढले दर

नाशिक जिल्ह्यात नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात कोरोनाचा प्रकोप कमी होता. तसेच हिवाळा असल्याने लिबू, संत्री आणि मोसंबी या रसवर्गीय फाळांना फारसा उठाव होत नव्हता, जानेवारीतही हीच परिस्थिती कायम होती. मात्र, फेब्रुवारीच्या मध्यानंतर कोरोनाचा प्रकोप वाटला आता मार्च, एप्रिलमध्ये कडक उन्हाला सुरुवात झाल्याने लिंबू, संत्री, मोसंबी या फळांचे दर जवळपास ३० टक्क्यांनी वाढले आहेत. उत्पादन कमी व मागणीत वाढ झाल्याने फळांचे दर वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

इन्फो-

मोसंबी औरगाबाद, संत्री नागपूर तर लिंबाची विजापूर, पंढरपूरहून आवक होते.

नाशिक जिल्ह्यात परजिल्ह्यातून फळांची आवक मोठ्या प्रमाणात होते. जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठेत दाखल होणारी मोसंबी ही औरंगाबाद येथून तर संत्री ही नागपूर जिल्ह्यातून येते. जिल्ह्यात लिंबाची आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे. हे लिंबू कर्नाटक राज्यातील विजापूर, पंढरपूर येथून जिल्ह्यात येतात.

--

मी फळे खातो, तुम्हीही खा..,

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आहारामध्ये फळांचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे. संत्री, मोसंबी, लिंबू ही रसवर्गीय फळे ही उणीव भरून काढतात. त्यामुळे सर्वांनीच फळांचे सेवन करायला हवे, आमच्या कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून आहारात नियमात फळांचा समावेश करण्यात आला आहे.

राजेश जाधव- इंदिरानगर

---

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने प्रतिकार शक्ती वाढविणे गरजेचे बनले आहे. सर्व प्रकारची फळे खाल्ल्यास शरीराला आवश्यक जीवनसत्व मिळतात. त्यामुळे आहारात फळांचा समावेश करणे आवश्यक असल्याने गेल्या तीन ते चार महिन्यात आहारात फळांचा नियमित वापर सुरू केला आहे.

-विलास पवार, नाशिकरोड.

----

तज्ज्ञ म्हणातात...

विविध जीवनसत्व असलेली फळे सेवन केल्याने शररीताल रोग प्रतिकार शक्ती वाढते. मात्र केव‌‌ळ फळे आणि पोषक आहारामुळे कोरोनावर मात करता येत नाही .रोग प्रतिकार शक्ती कोरोना रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकणारी असली तरी सर्वांनीच प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त हो आहे.

--

फळ व पालेभाज्यांचा आहारात समावेश असणे अत्यत महत्वाचे आहे. फळे पालेभाज्यांमुळे शरीरराला आवश्यक जीवनसत्व मिळतात. त्यामुळे कोरोनाचा वाढता फैलाव पाहता प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्रत्येकाने फळांचा आहारात समावेश करावा. असा सल्लाही डॉक्टरांकडून दिला जात आहे.

===Photopath===

080421\08nsk_8_08042021_13.jpg~080421\08nsk_10_08042021_13.jpg

===Caption===

डमी सोबत जोडली आहे. ~डमी सोबत जोडली आहे.