शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

रब्बीसाठी कडवा कालव्याचे दुसरे आवर्तन सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:15 IST

सिन्नर : रब्बी पिकांसाठी कडवा धरणातून दुसरे आवर्तन सोडण्यात आले. सुमारे २५० क्यूसेक क्षमतेने कालव्याला ...

सिन्नर : रब्बी पिकांसाठी कडवा धरणातून दुसरे आवर्तन सोडण्यात आले. सुमारे २५० क्यूसेक क्षमतेने कालव्याला पाणी सोडण्यात आले. ते टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे. यामुळे सुमारे १ हजार ४०० हेक्टरवरील पिकांना फायदा होणार आहे. रब्बीच्या सिंचनासह पिण्यासाठी दोन तलाव भरण्यात येणार आहेत.

सहायक कार्यकारी अभियंता संतोष गायधनी यांच्या मार्गदर्शनाखाली आवर्तनाचे नियोजन आखण्यात आले आहे. कालव्याला वीस दिवस पाणी सोडण्यात येणार आहे. त्याचा गहू, हरभरा, फळबागा, मका आणि पिकांना लाभ होणार आहे. शेतकऱ्यांनी नियोजनाप्रमाणे सिंचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

रब्बीसाठी १७ दिवसांचे पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. एक हजार शेतकऱ्यांना आवर्तनाचा लाभ झाला. ४५० दलघफू पाणी पहिल्या आवर्तनात वापरले गेले. भूजल पातळी टिकून असल्याने मागणी मर्यादित राहिली. तथापि, पुढच्या आवर्तनाला मात्र शेतकऱ्यांकडून पाणी मागणी वाढेल असे चित्र लाभक्षेत्रात दिसून येत आहे.

इन्फो...

डोंगळे शोधमोहिमेला सुरुवात

शिंदे येथून डोंगळे शोधमोहिमेला लगेचच सुरुवात करण्यात आली. म्हाळसाकोरे व सिन्नर तालुक्याच्या हद्दीत दोन दिवसांत डोंगळे काढण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. चार शाखा अभियंत्यांसह सहा कर्मचाऱ्यांची दोन पथके तयार करण्यात आली आहेत. पाण्याची चोरी होऊ नये यासाठी कालव्यावर दिवस-रात्र गस्त घालण्यात येणार आहे.

इन्फो...

दोन बंधाऱ्यांत पाणी सोडणार

दुसऱ्या आवर्तनात ६० दलघफू पाणी सिंचनासाठी ठेवण्यात आले आहे. त्याद्वारे वडांगळी पाणी योजनेचा साठवण तलाव भरण्यात येईल. त्यामुळे योजनेतील समाविष्ट गावांना तीन महिने पाणीटंचाई जाणवणार नाही. पांगरी पाणी योजनेसाठीही डांबर नाला बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येणार आहे.

===Photopath===

100221\10nsk_4_10022021_13.jpg

===Caption===

कडवा धरणातून कालव्याद्वारे सोडण्यात आलेले पाणी. (संग्रहीत छायाचित्र)