शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पालखेडचे पाणी आज सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:18 IST

नाशिक : येवला, मनमाड, निफाडसाठी पालखेड धरणातून आवर्तन सोडण्याची तयारी पाटबंधारे खात्याने पूर्ण केली असून, आवर्तन सोडण्यापूर्वी गुरुवारी करंजवण धरणातून पालखेडमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याची चोरी रोखण्यासाठी कालव्याच्या दुतर्फा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, भरारी पथकही त्यावर लक्ष ठेवून असणार आहे.

ठळक मुद्देपोलीस बंदोबस्तात होणार कार्यवाही : भरारी पथकाची नेमणूकपाणी चोरांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई.

नाशिक : येवला, मनमाड, निफाडसाठी पालखेड धरणातून आवर्तन सोडण्याची तयारी पाटबंधारे खात्याने पूर्ण केली असून, आवर्तन सोडण्यापूर्वी गुरुवारी करंजवण धरणातून पालखेडमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याची चोरी रोखण्यासाठी कालव्याच्या दुतर्फा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, भरारी पथकही त्यावर लक्ष ठेवून असणार आहे.मनमाड शहर, मनमाड रेल्वे, येवला शहर, साठवण बंधारा, ३८ गावे पाणीपुरवठा योजना याशिवाय निफाड तालुक्यातील बंधाऱ्यांसाठी दरवर्षी मे महिन्यात पालखेड धरणातून पाणी सोडण्यात येते. हे शेवटचे आवर्तन असून, त्याचे पाणी साधारणत: जुलैअखेरपर्यंत संबंधितांनी पुरवायचे आहे. त्यामुळे वाटेत या पाण्याची चोरी रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न गेल्या आठ दिवसांपासून महसूल, पाटबंधारे, वीज, पोलीस खाते संयुक्तपणे करीत असून, पालखेड डाव्या कालव्यात शेतकºयांनी जमिनीखाली टाकलेले डोंगळे नष्ट करण्याची माहीत हाती घेतली आहे. सुमारे दोन हजारांहून अधिक डोंगळे नष्ट करण्यात यश आल्याचा दावा पाटबंधारे खात्याने केला आहे. त्यामुळे साधारणत: शुक्रवारी सायंकाळी पालखेडमधून अगोदर कादवा नदीमार्गे निफाडसाठी पाणी सोडण्यात येणार असून, त्यानंतर पाणी गळती रोखण्यासाठी डाव्या कालव्याच्या माध्यमातून आवर्तन सोडण्यात येणार आहे. या काळात कालव्याच्या दुतर्फा असलेल्या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असून, रात्री फक्त सिंगल फेज पुरवठा सुरू ठेवण्यात येणार, तर सायंकाळी फक्त दोन तास थ्रीफेज पुरवठा केला जाणार आहे. पाणीचोरी रोखण्यासाठी प्रत्येकी पाच किलोमीटर अंतरावर भरारी पथके तैनात करण्यात आली आहे, याशिवाय भरारी पथक कार्यान्वित ठेवण्यात आले आहे. साधारणत: ७५० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार असून, आजवर या पाण्याची वाटेतच चोरी होण्याचे प्रकार घडले आहेत, त्यामुळे यंदा विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. पाणी चोरांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्याच्या सूचनाही पाटबंधारे विभागाला देण्यात आले आहेत.

दोन हजारांहून अधिक डोंगळे नष्ट करण्यात यश,वीजपुरवठा खंडित करण्यात येणार,७५० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार,पाणी चोरांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई.