शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

पालखेडचे पाणी आज सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:18 IST

नाशिक : येवला, मनमाड, निफाडसाठी पालखेड धरणातून आवर्तन सोडण्याची तयारी पाटबंधारे खात्याने पूर्ण केली असून, आवर्तन सोडण्यापूर्वी गुरुवारी करंजवण धरणातून पालखेडमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याची चोरी रोखण्यासाठी कालव्याच्या दुतर्फा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, भरारी पथकही त्यावर लक्ष ठेवून असणार आहे.

ठळक मुद्देपोलीस बंदोबस्तात होणार कार्यवाही : भरारी पथकाची नेमणूकपाणी चोरांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई.

नाशिक : येवला, मनमाड, निफाडसाठी पालखेड धरणातून आवर्तन सोडण्याची तयारी पाटबंधारे खात्याने पूर्ण केली असून, आवर्तन सोडण्यापूर्वी गुरुवारी करंजवण धरणातून पालखेडमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याची चोरी रोखण्यासाठी कालव्याच्या दुतर्फा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, भरारी पथकही त्यावर लक्ष ठेवून असणार आहे.मनमाड शहर, मनमाड रेल्वे, येवला शहर, साठवण बंधारा, ३८ गावे पाणीपुरवठा योजना याशिवाय निफाड तालुक्यातील बंधाऱ्यांसाठी दरवर्षी मे महिन्यात पालखेड धरणातून पाणी सोडण्यात येते. हे शेवटचे आवर्तन असून, त्याचे पाणी साधारणत: जुलैअखेरपर्यंत संबंधितांनी पुरवायचे आहे. त्यामुळे वाटेत या पाण्याची चोरी रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न गेल्या आठ दिवसांपासून महसूल, पाटबंधारे, वीज, पोलीस खाते संयुक्तपणे करीत असून, पालखेड डाव्या कालव्यात शेतकºयांनी जमिनीखाली टाकलेले डोंगळे नष्ट करण्याची माहीत हाती घेतली आहे. सुमारे दोन हजारांहून अधिक डोंगळे नष्ट करण्यात यश आल्याचा दावा पाटबंधारे खात्याने केला आहे. त्यामुळे साधारणत: शुक्रवारी सायंकाळी पालखेडमधून अगोदर कादवा नदीमार्गे निफाडसाठी पाणी सोडण्यात येणार असून, त्यानंतर पाणी गळती रोखण्यासाठी डाव्या कालव्याच्या माध्यमातून आवर्तन सोडण्यात येणार आहे. या काळात कालव्याच्या दुतर्फा असलेल्या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असून, रात्री फक्त सिंगल फेज पुरवठा सुरू ठेवण्यात येणार, तर सायंकाळी फक्त दोन तास थ्रीफेज पुरवठा केला जाणार आहे. पाणीचोरी रोखण्यासाठी प्रत्येकी पाच किलोमीटर अंतरावर भरारी पथके तैनात करण्यात आली आहे, याशिवाय भरारी पथक कार्यान्वित ठेवण्यात आले आहे. साधारणत: ७५० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार असून, आजवर या पाण्याची वाटेतच चोरी होण्याचे प्रकार घडले आहेत, त्यामुळे यंदा विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. पाणी चोरांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्याच्या सूचनाही पाटबंधारे विभागाला देण्यात आले आहेत.

दोन हजारांहून अधिक डोंगळे नष्ट करण्यात यश,वीजपुरवठा खंडित करण्यात येणार,७५० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार,पाणी चोरांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई.