शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
5
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
6
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
7
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
8
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
9
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
11
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
12
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
13
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
14
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
15
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
16
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
17
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
18
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
19
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
20
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!

पालखेडचे पाणी आज सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:18 IST

नाशिक : येवला, मनमाड, निफाडसाठी पालखेड धरणातून आवर्तन सोडण्याची तयारी पाटबंधारे खात्याने पूर्ण केली असून, आवर्तन सोडण्यापूर्वी गुरुवारी करंजवण धरणातून पालखेडमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याची चोरी रोखण्यासाठी कालव्याच्या दुतर्फा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, भरारी पथकही त्यावर लक्ष ठेवून असणार आहे.

ठळक मुद्देपोलीस बंदोबस्तात होणार कार्यवाही : भरारी पथकाची नेमणूकपाणी चोरांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई.

नाशिक : येवला, मनमाड, निफाडसाठी पालखेड धरणातून आवर्तन सोडण्याची तयारी पाटबंधारे खात्याने पूर्ण केली असून, आवर्तन सोडण्यापूर्वी गुरुवारी करंजवण धरणातून पालखेडमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याची चोरी रोखण्यासाठी कालव्याच्या दुतर्फा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, भरारी पथकही त्यावर लक्ष ठेवून असणार आहे.मनमाड शहर, मनमाड रेल्वे, येवला शहर, साठवण बंधारा, ३८ गावे पाणीपुरवठा योजना याशिवाय निफाड तालुक्यातील बंधाऱ्यांसाठी दरवर्षी मे महिन्यात पालखेड धरणातून पाणी सोडण्यात येते. हे शेवटचे आवर्तन असून, त्याचे पाणी साधारणत: जुलैअखेरपर्यंत संबंधितांनी पुरवायचे आहे. त्यामुळे वाटेत या पाण्याची चोरी रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न गेल्या आठ दिवसांपासून महसूल, पाटबंधारे, वीज, पोलीस खाते संयुक्तपणे करीत असून, पालखेड डाव्या कालव्यात शेतकºयांनी जमिनीखाली टाकलेले डोंगळे नष्ट करण्याची माहीत हाती घेतली आहे. सुमारे दोन हजारांहून अधिक डोंगळे नष्ट करण्यात यश आल्याचा दावा पाटबंधारे खात्याने केला आहे. त्यामुळे साधारणत: शुक्रवारी सायंकाळी पालखेडमधून अगोदर कादवा नदीमार्गे निफाडसाठी पाणी सोडण्यात येणार असून, त्यानंतर पाणी गळती रोखण्यासाठी डाव्या कालव्याच्या माध्यमातून आवर्तन सोडण्यात येणार आहे. या काळात कालव्याच्या दुतर्फा असलेल्या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असून, रात्री फक्त सिंगल फेज पुरवठा सुरू ठेवण्यात येणार, तर सायंकाळी फक्त दोन तास थ्रीफेज पुरवठा केला जाणार आहे. पाणीचोरी रोखण्यासाठी प्रत्येकी पाच किलोमीटर अंतरावर भरारी पथके तैनात करण्यात आली आहे, याशिवाय भरारी पथक कार्यान्वित ठेवण्यात आले आहे. साधारणत: ७५० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार असून, आजवर या पाण्याची वाटेतच चोरी होण्याचे प्रकार घडले आहेत, त्यामुळे यंदा विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. पाणी चोरांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्याच्या सूचनाही पाटबंधारे विभागाला देण्यात आले आहेत.

दोन हजारांहून अधिक डोंगळे नष्ट करण्यात यश,वीजपुरवठा खंडित करण्यात येणार,७५० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार,पाणी चोरांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई.