शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोरज मुहूर्तावर निर्बंधामुळे लॉन्स मंगल कार्यालये संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:22 IST

नाशिक : कोरोनाच्या रुग्णसंखेत वाढ होत असल्यामुळे गोरज मुहूर्तावर सायंकाळी होणारे रद्द करण्याच्या अथवा किमान उपस्थिती करण्याच्या सूचना ...

नाशिक : कोरोनाच्या रुग्णसंखेत वाढ होत असल्यामुळे गोरज मुहूर्तावर सायंकाळी होणारे रद्द करण्याच्या अथवा किमान उपस्थिती करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्यानंतर शहरासह परिसरातील लॉन्स व मंगल कार्यालयांच्या या पूर्वी बूक केलेल्या तारखा रद्द होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे केटरर्स व्यवसायासह बँड पथके, फोटोग्राफर, इव्हेंट मॅनेजमेंट, डेकोरेटर्स आदी विविध व्यवसायातील हजारो कामगारांचे रोजगारही संकटात आले आहे.

कोरोनाचा धोका लक्षात घेऊन लॉन्स चालकांनी प्रशासनाला सहकार्याची भूमिका घेत गोरज मुुहूर्तावर पूर्वनियोजित विवाह सोहळे वेळेत करण्याचे आवाहन वधुवर पक्षांना केले आहे. त्याचप्रमाणे विवाह सोहळ्याना आमंंत्रितांना वेगवेगळ्या टप्प्याने मर्यादित संख्येत बोलाविण्याचा सल्लाही दिला जात आहे. तर काही आयोजकांना गोरज मुहूर्ताचे विवाह सोहळे दुपारच्या वेळेत करण्याचेही आवाहन केले जात आहे. मात्र असे असतानाही अनेक आयोजकांकडून यापूर्वीच बूक केलेल्या तारखा पुढे ढकलण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे लॉन्स चालकांसह विवाह सोहळ्यांवर आधारित विविध व्यावसायिकांसमोर संकट निर्माण झाले असून या क्षेत्रातील हजारो कामगारांच्या रोजगारांवर कुऱ्हाड कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.

इन्फो-

व्यावसायिकांना मार्चपासून २५० कोटींचे नुकसान

विवाह सोहळ्यावर लॉन्स व मंगल कार्यालयांसह केटरर्स, फोटोग्राफर, डेकोरेटर्स , इव्हेंट मॅनेजमेंट, बँड पथक, किराणा आदी विविध व्यवसाय अवलंबून आहेत. मात्र २८ मार्च २०२० पासून टाळेबंदीमुळे या व्यवसायाला मोठा फटका बसला असून या व्यावसायिकांना अकरा महिन्यात तब्बल २५० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

कोट-१

लॉन्स चालकांची प्रशासनाला सहकार्याची भूमिका असून शासनाच्या नियमानुसार नियोजित वेळेत व किमान पाहुण्याच्या उपस्थितीत विवाह सोहळे करण्याचे आवाहन वधुवर पक्षांना करण्यात येत आहे. अनेक कुटुंब यासाठी तयार होत असले तरी काहींचा तारखा पुढे ढकलण्याकडे अथवा रद्द करण्याकडे कल आहे. त्यामुळे लॉन्स व्यावसायिकांसमोर मोठ्या प्रमाणात संकटात उभे राहिले आहे.

-सुनील चोपडा, अध्यक्ष, लॉन्स व मंगल कार्यालय संघटना

कोट-२

मागील टाळेबंदीनतर व्यावसाय रुळावर येत असताना पुन्हा निर्बंध लागून केल्याने लॉन्स व मंगल कार्यालय चालकांचे व्यावसाय अडचणी आले आहेत. शासनाने रेल्वे, बस, मॉल, थिएटर सुरू केले आहेत. या ठिकाणी हजारो लोक एकत्र येत असताना नियमांचे व पालनही होत नाही. असे असताना केवळ विवाह सोहळ्यांवरच निर्बंध का? तुलनेत लॉन्स व मंगल कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा असल्याने फिजिकल डिस्टन्स व कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन होऊ शकते. त्यामुळे लॉन्स मंगल कार्यालयांमध्ये ५० टक्के क्षमतेने विवाह सोहळ्यांना परवानगी देण्याची गरज आहे.

-संदीप काकड, कार्याध्यक्ष, लॉन्स व मंगल कार्यालय संघटना

कोट-

लॉन्स व मंगल कार्यालय व्यावसायिकांची प्रशासनाला सहकार्याची भूमिका आहे. त्यासंदर्भात प्रशासनाला कल्पनाही दिली आहे. परंतु, प्रशासनाकडून वधुवर कुटुंबीयांना व आयोजकांवरही नियंत्रणाच्या दृष्टीने कार्यवाही होणे आवश्यक आहे. केवळ व्यावसायिकांना जबाबदार धरू नये. लॉन्स चालकांकडून वारंवार सूचना करूनही आयोजकांकडून नियमांचे पालन होत नसेल तर व्यावसायिकांवर कारवाई होऊ नये.

- समाधान जेजूरकर, सह सचिव लॉन्स व मंगल कार्यालय संघटना