शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
5
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
6
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
7
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
8
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
9
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
10
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

गंगापूर धरणातून मराठवाड्यासाठी शेवटचे आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 00:30 IST

नाशिक : मे महिन्यात पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता जिल्ह्णातील धरणांमध्ये जेमतेम १८ टक्के जलसाठा असतानाही गंगापूर धरण समूहातून मराठवाडा व नगर जिल्ह्यासाठी नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरणातून शेवटचे आवर्तन सोडण्यास जिल्हा प्रशासनाने हिरवाकंदील दर्शविला असून, शेकडो किलोमीटर नदीमार्गे जाणाऱ्या या पाण्याची वाटेत चोरी होऊ नये म्हणून नदीच्या दुतर्फा वीजपुरवठा खंडित करण्याच्या त्याचबरोबर चोरी करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देनगरलाही पाणी देणार : चोरी रोखण्यासाठी गावे अंधारात

नाशिक : मे महिन्यात पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता जिल्ह्णातील धरणांमध्ये जेमतेम १८ टक्के जलसाठा असतानाही गंगापूर धरण समूहातून मराठवाडा व नगर जिल्ह्यासाठी नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरणातून शेवटचे आवर्तन सोडण्यास जिल्हा प्रशासनाने हिरवाकंदील दर्शविला असून, शेकडो किलोमीटर नदीमार्गे जाणाऱ्या या पाण्याची वाटेत चोरी होऊ नये म्हणून नदीच्या दुतर्फा वीजपुरवठा खंडित करण्याच्या त्याचबरोबर चोरी करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.सदरचे पाणी औरंगाबाद जिल्ह्णातील वैजापूर आणि अहमदनगर जिल्ह्णातील कोपरगाव, शिर्डी, राहाता या नगरपालिकांची तहान भागविणार आहे. त्यासाठी गंगापूर व दारणा समूहातील (गंगापूर, मुकणे, दारणा, वालदेवी) या धरणातून २ हजार १०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सोमवारी सायंकाळी उशिरा गोदावरी व दारणा नदीमार्गे हे पाणी पुढे झेपावले. या पाण्याचा लाभ नाशिक शहरासह भगूर, कॅन्टोन्मेंट, सिन्नर एमआयडीसी, सायखेडा, चांदोरी, निफाड तालुक्यांसाठी होणार आहे. तसेच नांदूरमधमेश्वरमधून हे पाणी पुढे डाव्या व उजव्या कॅनॉलव्दारे वैजापूर, कोपरगाव, शिर्डी, राहात्याला पोहोचेल.याशिवाय सटाणा शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असून, निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केळझर धरणातून सटाणा शहरासाठी १०० दलघफू पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. केळझर धरणातून आरम नदीमार्गे हे पाणी सोडण्यात येणार आहे. गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाचालू वर्षातील हे शेवटचे आवर्तन असल्याने ते संबंधित गावापर्यंत पोहोचावे, वाटेत या पाण्याची चोरी होऊ नये याची पुरेपूर काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाने पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत. त्यासाठी आगामी पंधरा दिवस पाण्याच्या वहन मार्गावर रोज २२ तास वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. तसेच अवैध पाणी उपसा करणाºयांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.