शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

घरकुलप्रकरणी पालिकेला शेवटची संधी

By admin | Updated: May 8, 2017 01:58 IST

घरकुले बांधण्याच्या कामातील गैरव्यवहार महापालिकेने आठ आठवड्यांच्या आत आपले म्हणणे सादर करावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत घरकुले बांधण्याच्या कामातील गैरव्यवहार, कॅगचा ठपका आणि निधी खर्च होऊनही इष्टांक पूर्ण न करण्याच्या विषयावर महापालिकेने आठ आठवड्यांच्या आत आपले म्हणणे सादर करावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले असून, महापालिकेला ही अखेरची संधी असल्याचे नमूद केले आहे. निर्भय फाउंडेशनच्या वतीने उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेची सुनावणी शुक्रवारी करण्यात आली. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि प्रभारी शहर अभियंता उपस्थित होते. यापूर्वी पालिकेकडून आयुक्त अनुपस्थित न राहिल्याने उच्च न्यायालयाने आयुक्तांना हजर राहण्यास सांगितले होते. मात्र आयुक्त अभिषेक कृष्ण हे प्रशिक्षणासाठी मसुरी येथे गेल्याचे सांगण्यात आल्याने अतिरिक्त आयुक्त न्यायालयात उपस्थित होते. महापालिकेने नेहरू अभियानाअंतर्गत महापालिकेने सुरुवातीला सोळा हजारानंतर १२ हजार त्यानंतर नऊ हजार अशाप्रकारचे घरकुल बांधण्याचे इष्टांक घटवले आता पालिकेने सात हजार घरे पूर्ण झाल्याचा दावा केला. त्यातील सुमारे अडीच हजार घरे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली. मात्र अजूनही तितकी घरे लाभार्थींना मिळालेली नाही. चुंचाळे शिवारात घरकुले बांधताना मूळ निविदेत घरकुल बांधण्यासाठी जागेचे सपाटीकरण करताना सुमारे पाच कोटी रुपयांचा अतिरिक्तखर्च करण्यात आला. त्यावर कॅगने गंभीर ताशेरे ओढूनही महापालिकेने संबंधित अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे या प्रकाराची लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी याचिकाकर्ता मनोज पिंगळे यांनी केली आहे. सातपूर विभागात आनंदवल्ली येथे घरांचे बांधकाम सुरू नसताना ठेकेदाराला कोट्यवधी रुपयांचे देयक अदा करण्यात आले. तसेच आंनदवल्लीची घरे सामनगाव रोडवर स्थलांतरित करण्यात आल्याचे दाखविले या सर्व गोंधळाबाबत चौकशीसाठी याचिका दाखल आहे. हे सर्व आरोप गंभीर असून, त्याचे त्वरित उत्तर द्या, असे आदेश उच्च न्यायालयाने देऊनही पालिकेने त्याचे उत्तर दिलेले नव्हते. आता आठ आठवड्यांची मुदत पालिकेला देण्यात आली असून, या उत्तरांची प्रत याचिकाकर्त्यांना देण्यात यावी तसेच याचिकाकर्त्यांनी दिलेले उत्तर योग्य आहे किंवा नाही हे तपासून त्यांचे म्हणणे मांडावे, असेदेखील न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.