शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

घरकुलप्रकरणी पालिकेला शेवटची संधी

By admin | Updated: May 8, 2017 01:58 IST

घरकुले बांधण्याच्या कामातील गैरव्यवहार महापालिकेने आठ आठवड्यांच्या आत आपले म्हणणे सादर करावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत घरकुले बांधण्याच्या कामातील गैरव्यवहार, कॅगचा ठपका आणि निधी खर्च होऊनही इष्टांक पूर्ण न करण्याच्या विषयावर महापालिकेने आठ आठवड्यांच्या आत आपले म्हणणे सादर करावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले असून, महापालिकेला ही अखेरची संधी असल्याचे नमूद केले आहे. निर्भय फाउंडेशनच्या वतीने उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेची सुनावणी शुक्रवारी करण्यात आली. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि प्रभारी शहर अभियंता उपस्थित होते. यापूर्वी पालिकेकडून आयुक्त अनुपस्थित न राहिल्याने उच्च न्यायालयाने आयुक्तांना हजर राहण्यास सांगितले होते. मात्र आयुक्त अभिषेक कृष्ण हे प्रशिक्षणासाठी मसुरी येथे गेल्याचे सांगण्यात आल्याने अतिरिक्त आयुक्त न्यायालयात उपस्थित होते. महापालिकेने नेहरू अभियानाअंतर्गत महापालिकेने सुरुवातीला सोळा हजारानंतर १२ हजार त्यानंतर नऊ हजार अशाप्रकारचे घरकुल बांधण्याचे इष्टांक घटवले आता पालिकेने सात हजार घरे पूर्ण झाल्याचा दावा केला. त्यातील सुमारे अडीच हजार घरे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली. मात्र अजूनही तितकी घरे लाभार्थींना मिळालेली नाही. चुंचाळे शिवारात घरकुले बांधताना मूळ निविदेत घरकुल बांधण्यासाठी जागेचे सपाटीकरण करताना सुमारे पाच कोटी रुपयांचा अतिरिक्तखर्च करण्यात आला. त्यावर कॅगने गंभीर ताशेरे ओढूनही महापालिकेने संबंधित अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे या प्रकाराची लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी याचिकाकर्ता मनोज पिंगळे यांनी केली आहे. सातपूर विभागात आनंदवल्ली येथे घरांचे बांधकाम सुरू नसताना ठेकेदाराला कोट्यवधी रुपयांचे देयक अदा करण्यात आले. तसेच आंनदवल्लीची घरे सामनगाव रोडवर स्थलांतरित करण्यात आल्याचे दाखविले या सर्व गोंधळाबाबत चौकशीसाठी याचिका दाखल आहे. हे सर्व आरोप गंभीर असून, त्याचे त्वरित उत्तर द्या, असे आदेश उच्च न्यायालयाने देऊनही पालिकेने त्याचे उत्तर दिलेले नव्हते. आता आठ आठवड्यांची मुदत पालिकेला देण्यात आली असून, या उत्तरांची प्रत याचिकाकर्त्यांना देण्यात यावी तसेच याचिकाकर्त्यांनी दिलेले उत्तर योग्य आहे किंवा नाही हे तपासून त्यांचे म्हणणे मांडावे, असेदेखील न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.