शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

लासलगाव बाह्य वळण रस्ता ठरले दिवास्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:10 IST

भूसंपादनाचे तीन टप्पे करण्यात आले होते. यातील पहिल्या टप्प्याचे भूसंपादन दहा वर्षांपूर्वी झाले. दुसऱ्या टप्प्याच्या भूसंपादनाला तीन ते चार ...

भूसंपादनाचे तीन टप्पे करण्यात आले होते. यातील पहिल्या टप्प्याचे भूसंपादन दहा वर्षांपूर्वी झाले. दुसऱ्या टप्प्याच्या भूसंपादनाला तीन ते चार वर्षांचा कालावधी उलटला तरी अजूनही त्या शेतकऱ्यांना पूर्ण भरपाई मिळालेली नाही. तिसरा टप्पा तिष्ठत पडला आहे. यानंतर मंजुरी मिळालेल्या शेकडो कि.मी.च्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊन शेतकऱ्यांना मोबदलादेखील अदा करण्यात आला आहे व काम पूर्णत्वाच्या दिशेने असून लवकरच वाहतुकीस खुला होईल. तर नाशिक-सुरत महामार्गाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे.

अलीकडेच मंजुरी मिळालेल्या नाशिक पुणे लोहमार्गाचेदेखील शासकीय सोपस्कार पूर्ण होऊन लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार असून त्यांना पाचपट मोबदला देण्याचे सूतोवाच पालकमंत्री भुजबळ यांनी केले आहे. मात्र दस्तुरखुद्द भुजबळ यांच्या मतदारसंघातील अवघ्या चार कि.मी.च्या बाह्य वळण रस्त्याचे काम गेल्या तेरा वर्षांतही पूर्ण न होऊ शकल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. अजूनही किती कालावधी लागेल याची शाश्वती नसल्याने लासलगाव बाह्य वळण रस्ता दिवास्वप्न ठरू पाहत आहे.

लासलगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ, म.रा.प. महामंडळाचे आगार, भाभाचे अनुसंशोधन केंद्र तसेच नाफेडचे कांदा खरेदी केंद्र व राज्य शासनाचेे ग्रामीण रुग्णालय आहे. त्यायोगे येथे मोठ्या प्रमाणावर वाहनांची व नागरिकांची वर्दळ असते. परंतु येथे असलेल्या रेल्वे फाटकामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन नेहमीच रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे येथे छोटे-मोठे अपघातदेखील झालेले आहेत. रहदारीच्या समस्येने हैराण झालेले लासलगावकर बाह्य वळण रस्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच लासलगावच्या व्यापार उदिमास हातभार लागणार असल्याने व्यावसायिकदेखील बाह्य वळण रस्त्याकडे डोळे लावून बसलेले आहेत.

भूसंपादनाअभावी बऱ्याच शेतकऱ्यांचे वाटप, व्यापार, अंतर्गत रस्ते, खरेदी-विक्री, जमिनी बिनशेती करणे आदी कामेही रखडलेली आहेत. तर संपादित होणाऱ्या जमिनीत गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने मोजणीचे दगड रोवून ठेवलेले आहेत. त्या शेतकऱ्यांना धड जमीनही कसता येत नाही आणि रस्ताही होत नाही. एकीकडे ही अवस्था तर दुसरीकडे खासदार भारती पवार यांच्या काही महिन्यांच्या प्रयत्नाने लासलगाव टाकळी भुयारी मार्ग पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी येथील लोकप्रतिनिधी, शेतकरी, व्यापारी व ग्रामस्थांनी वेळोवेळी भुजबळ यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. त्यांनीदेखील अधिकाऱ्यांना आदेश दिले. परंतु सुस्त यंत्रणेने कधी कोरोना, कधी निवडणूक कधी मोजणी, कधी मूल्यांकन तर कधी शासकीय मंजुरी अशी कारणे देत दुर्लक्ष केल्याने लासलगाव बाह्य वळण रस्त्याचे घोंगडे भिजत पडले असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.

040721\20210704_095836.jpg

फोटो कॅपशन

लासलगाव बाह्य वळण रस्त्याचे प्रलंबित असलेले काम