शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव बाह्य वळण रस्ता ठरले दिवास्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:10 IST

भूसंपादनाचे तीन टप्पे करण्यात आले होते. यातील पहिल्या टप्प्याचे भूसंपादन दहा वर्षांपूर्वी झाले. दुसऱ्या टप्प्याच्या भूसंपादनाला तीन ते चार ...

भूसंपादनाचे तीन टप्पे करण्यात आले होते. यातील पहिल्या टप्प्याचे भूसंपादन दहा वर्षांपूर्वी झाले. दुसऱ्या टप्प्याच्या भूसंपादनाला तीन ते चार वर्षांचा कालावधी उलटला तरी अजूनही त्या शेतकऱ्यांना पूर्ण भरपाई मिळालेली नाही. तिसरा टप्पा तिष्ठत पडला आहे. यानंतर मंजुरी मिळालेल्या शेकडो कि.मी.च्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊन शेतकऱ्यांना मोबदलादेखील अदा करण्यात आला आहे व काम पूर्णत्वाच्या दिशेने असून लवकरच वाहतुकीस खुला होईल. तर नाशिक-सुरत महामार्गाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे.

अलीकडेच मंजुरी मिळालेल्या नाशिक पुणे लोहमार्गाचेदेखील शासकीय सोपस्कार पूर्ण होऊन लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार असून त्यांना पाचपट मोबदला देण्याचे सूतोवाच पालकमंत्री भुजबळ यांनी केले आहे. मात्र दस्तुरखुद्द भुजबळ यांच्या मतदारसंघातील अवघ्या चार कि.मी.च्या बाह्य वळण रस्त्याचे काम गेल्या तेरा वर्षांतही पूर्ण न होऊ शकल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. अजूनही किती कालावधी लागेल याची शाश्वती नसल्याने लासलगाव बाह्य वळण रस्ता दिवास्वप्न ठरू पाहत आहे.

लासलगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ, म.रा.प. महामंडळाचे आगार, भाभाचे अनुसंशोधन केंद्र तसेच नाफेडचे कांदा खरेदी केंद्र व राज्य शासनाचेे ग्रामीण रुग्णालय आहे. त्यायोगे येथे मोठ्या प्रमाणावर वाहनांची व नागरिकांची वर्दळ असते. परंतु येथे असलेल्या रेल्वे फाटकामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन नेहमीच रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे येथे छोटे-मोठे अपघातदेखील झालेले आहेत. रहदारीच्या समस्येने हैराण झालेले लासलगावकर बाह्य वळण रस्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच लासलगावच्या व्यापार उदिमास हातभार लागणार असल्याने व्यावसायिकदेखील बाह्य वळण रस्त्याकडे डोळे लावून बसलेले आहेत.

भूसंपादनाअभावी बऱ्याच शेतकऱ्यांचे वाटप, व्यापार, अंतर्गत रस्ते, खरेदी-विक्री, जमिनी बिनशेती करणे आदी कामेही रखडलेली आहेत. तर संपादित होणाऱ्या जमिनीत गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने मोजणीचे दगड रोवून ठेवलेले आहेत. त्या शेतकऱ्यांना धड जमीनही कसता येत नाही आणि रस्ताही होत नाही. एकीकडे ही अवस्था तर दुसरीकडे खासदार भारती पवार यांच्या काही महिन्यांच्या प्रयत्नाने लासलगाव टाकळी भुयारी मार्ग पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी येथील लोकप्रतिनिधी, शेतकरी, व्यापारी व ग्रामस्थांनी वेळोवेळी भुजबळ यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. त्यांनीदेखील अधिकाऱ्यांना आदेश दिले. परंतु सुस्त यंत्रणेने कधी कोरोना, कधी निवडणूक कधी मोजणी, कधी मूल्यांकन तर कधी शासकीय मंजुरी अशी कारणे देत दुर्लक्ष केल्याने लासलगाव बाह्य वळण रस्त्याचे घोंगडे भिजत पडले असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.

040721\20210704_095836.jpg

फोटो कॅपशन

लासलगाव बाह्य वळण रस्त्याचे प्रलंबित असलेले काम