शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

विमानाने १२ बाधितांचे लॅण्डिंग; रेल्वेतील चौघे कोरोना ट्रॅकवर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:21 IST

लाेमत न्यूज नेटवर्क नाशिक : कोविड-१९ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्याच्या सीमारेषेवर प्रवाशांची तपासणी ...

लाेमत न्यूज नेटवर्क

नाशिक : कोविड-१९ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्याच्या सीमारेषेवर प्रवाशांची तपासणी आणि नियंत्रण सुरू केले आहे. ओझर येथील विमानतळ तसेच रेल्वेस्थानक या ठिकाणी जिल्ह्यात प्रविष्ट होणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. राजस्थान, गोवा, गुजरात तसेच दिल्ली येथून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिलेल्या आहेत तसेच नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.

ओझर विमानतळ येथून गेल्या २५ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत सुमारे ८०० प्रवासी नाशिकला उतरले आहेत. त्यापैकी ५२९ प्रवाशांकडे कोरोना निगेटिव्हचे प्रमाणपत्र होते, तर उर्वरित प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट केल्यानंतर वेगवेगळ्या दिवशी एकूण १२ प्रवासी काेरोनाबाधित आढळले. नाशिकरोड-इगतपुरी रेल्वेस्थानकावर एकूण चार बाधित आढळून आले.

--इन्फो--

गुजरात सीमारेषेवर बसप्रवाशांची तपासणी

गोवा, गुजरात, राजस्थान आणि दिल्ली येथून नाशिक जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नाशिकला गुजरातची सीमारेषा जवळची असल्याने तेथून येणाऱ्या एस.टी. प्रवाशांची तपासणी चेक पाॉइंटवर केली जात असल्याची माहिती महामंडळाने दिली.

--इन्फो--

दिवाळीनंतर रुग्णांच्या संख्येत वाढ

नाशिक जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येत असताना दिवाळीनंतर मात्र त्यामध्ये वाढ होऊ लागली आहे. दिवाळीपूर्वी रुग्ण कमी झालेले असताना दिवाळीनंतर दैनंदिन रुग्णवाढ होत असल्याचे दिसते. आता दैनंदिन ३०० ते ४०० रुग्ण आढळत असल्याने शहरातील रुग्णवाढीचा वेग चिंता वाढविणारी आहे.