शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

वृद्धाजवळील दोन लाखांची रोकड लंपास

By admin | Updated: July 5, 2017 01:25 IST

नाशिकरोड : पायी जाणाऱ्या इसमाच्या हातातील दोन लाखांची रोकड असलेली पिशवी भामट्यांनी चोरून नेली.

नाशिकरोड : बिटको महाविद्यालय येथील बॅँक आॅफ महाराष्ट्र येथून पायी जाणाऱ्या वयोवृद्ध इसमाच्या हातातील दोन लाखांची रोकड असलेली कापडी पिशवी मोटारसायकलवर आलेल्या दोघा भामट्यांनी ओढून चोरून नेली. शिखरेवाडीतील हरीओम सोसायटीत राहणारे महेंद्र यशवंत बानोडकर (६५) हे सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास कामानिमित्त बिटको महाविद्यालय येथील बॅँक आॅफ महाराष्ट्र येथून रस्त्याने पायी जात होते. पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोघा भामट्या युवकांपैकी पाठीमागे बसलेल्या युवकाने त्यांच्या हातातील हिसकावून नेली. आधार-सीमकार्ड लिंक; गोडसे यांची मागणीनाशिक : गुन्हे शोधण्यासाठी आणि नियंत्रणासाठी आधार आणि मोबाइल सीमकार्ड परस्परांशी लिंक करण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान समितीकडे केली. देशाच्या डिजिटल धोरणांबाबत २९ जूनला माहिती तंत्रज्ञान विभागाची बैठक झाली. बैठकीस समितीचे अध्यक्ष अनुराग ठाकूर, लालकृष्ण अडवानी, करूणाकरन, रावसाहेब दानवे, विनय सहस्त्रबुद्धे, रामदास तडस आदी खासदार उपस्थित होते. उद्योजक शिबिरातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शननाशिक : भारत सरकारच्या राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अहमदाबाद येथील भारतीय उद्योजक विकास संस्था आणि मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र यांनी संयुक्तरीत्या मातोश्री महाविद्यालयातील स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित केलेल्या तीनदिवसीय उद्योजक जागरूकता शिबिराला सुरुवात झाली आहे. कत्तलखाना स्थलांतराची मागणीनाशिक : जुन्या नाशकातील महात्मा फुले मंडईतील कत्तलखाना वडाळा परिसरात स्थलांतरित करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याकडे केली आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी सोमवारी (दि.३) आयुक्तांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यात महात्मा फुले मंडईतील अनेक वर्षांपासून असलेला कत्तलखाना अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी वडाळा परिसरातील जागेचाही प्रस्ताव त्यांनी सुचविला. सुरक्षारक्षकाची नोंदणी करण्याच्या सूचनानाशिक : अनोंदीत सुरक्षारक्षक व त्यांना तैनात करणाऱ्या कारखान्यांच्या मालकांची जिल्हा सुरक्षारक्षक मंडळात नोंदणी करण्याच्या सूचना कामगार उपआयुक्तकार्यालयाने केली असून, जे नोंदणी करणार नाहीत अशांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात राज्याच्या कामगारमंत्र्यांकडे राज्य सुरक्षारक्षक सल्लागार समितीची बैठक घेण्यात येऊन त्यात अनोंदीत सुरक्षारक्षक व त्यांना तैनात करणारे आस्थापना व कारखाने यांच्या मुख्य मालकांची नोंदणी मंडळात करावी, असे ठरविण्यात आले.