शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

अवयवदानाविषयी व्यापक जनजागृतीचा अभाव

By admin | Updated: August 12, 2016 23:08 IST

खर्चिक प्रक्रिया : याचक अधिक तर दात्यांची कमतरता

 भाग्यश्री मुळे नाशिकअवयवदानाच्या बाबतीत याचकांची मोठी प्रतीक्षा यादी व त्या तुलनेत दात्यांची संख्या कमी असे व्यस्त प्रमाण महाराष्ट्रासह नाशिकमध्येही पहायला मिळत असून आपल्या मृत्यूपश्चात नेत्र, त्वचा, किडनी, हृदय आदि अवयव दान करून वेदनामय जीवन जगणाऱ्या व्यक्तींना जीवदान देणारी अवयवदान मोहीम व्यापक होण्याची गरज दिसून येत आहे. रस्ते अपघात, घरगुती अपघात आदि विविध घटनांमुळे अपघात होऊन मेंदूमृत झालेल्या व्यक्तींच्या शरीरातील अवयवांचे गरजू रुग्णांमध्ये प्रत्यारोपण करण्याची ही प्रक्रिया खर्चिक असल्यानेही आर्थिक स्थिती भक्कम असणाऱ्यांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येत असल्याचेही समोर आले आहे. अवयवदानाविषयी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज असून ते दूर करण्याची नितांत गरज आहे. मृत्यूनंतर डोळे, त्वचा हे अवयव दान केले तर मृत व्यक्ती विद्रुप दिसते, पुढच्या जन्मी त्या व्यक्तीला ते अवयव देव देत नाही, अवयवदान व देहदान हे एकच आहे, अवयवदान हे मृत्यूनंतरच करता येते, जिवंतपणी अवयवदान केले तर आयुष्य कमी होते, दात्याला अपंगत्व येते, मेहनतीची कामे करता येत नाही अशा अनेक गैरसमजुती लोकांमध्ये असून त्यांचे निराकरण करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींकडून व्यापक जनजागृती करणे गरजेचे आहे. नाशिकमध्ये सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावेंसह ७ कार्यकर्ते, डॉ. भाऊसाहेब मोरे, आयएमए सारख्या संस्था अवयवदानाविषयी जनजागृतीचे काम करत असून प्रत्येकाने आजवर १५ ते २० जणांना अवयवदानासाठी तयार केले आहे. काही अपघात झाल्यास वा काही घटना घडल्यास व माझा मेंदू मृत झाल्यास माझे अवयव काढून घेऊन ते गरजूंना द्यावेत, अशा परवानगीचे कार्ड या व्यक्ती आपल्या खिशात बाळगत आहेत. याशिवाय या व्यक्तींची माहिती प्रत्यारोपणाची प्रक्रिया राबवणाऱ्या झेडटीसीसी या संस्थेलाही दिली जात आहे. आजच्या घडीला नाशिकसह महाराष्ट्रात हजारो रुग्ण किडनी, हृदय, त्वचा, डोळे आदि अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. ब्रेनडेड रुग्णांचे अवयव काढून घेण्यासाठी नॉन ट्रान्सप्लांट सेंटरची संख्या वाढणे गरजेचे आहे. ब्रेनडेड झालेल्या व्यक्तींबद्दलची माहिती शासनाला कळविण्याचे प्रमाण अत्यंत कमी असून या मोहिमेत अडथळा येत आहे.