शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सकस अन्नाच्या अभावाने बालकांच्या प्रतिकारशक्तीत घट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:15 IST

नाशिक : अर्भके आणि लहान बाळांची रोगप्रतिकारक शक्ती ही प्रारंभी कमीच असते. मात्र, आईच्या दुधाने तसेच अन्य पौष्टीक आहाराने ...

नाशिक : अर्भके आणि लहान बाळांची रोगप्रतिकारक शक्ती ही प्रारंभी कमीच असते. मात्र, आईच्या दुधाने तसेच अन्य पौष्टीक आहाराने त्यांच्या प्रतिकारशक्तीत चांगली वाढ होणे अपेक्षित असते. मात्र, बालकांना दिल्या जाणाऱ्या जेवणातील सकस अन्नाचा अभाव सध्याच्या काळात अनेक बालकांमध्ये प्रतिकारशक्ती कमी करण्यास आणि आजारी पडण्याच्या अधिकच्या प्रमाणास कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते.

त्यामुळेच बालके पूर्वीच्या तुलनेत अधिक आजारी पडण्याचे, वारंवार उपचार करून घेण्याची वेळ पालकांवर येते. बहुतांश बालकांची ही घटती प्रतिकारशक्ती पालकांच्या आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या चिंतेचा विषय ठरते. बालपणी ऋतू बदलला की मुले आजारी पडतात. पहिल्या ४ वर्षांतल्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. मुलांना जेव्हा जंतूसंसर्ग होतो, तेव्हा त्यांची प्रतिकारशक्ती हळूहळू वाढायला सुरुवात होते. त्यामुळे ४ ते ५ वर्षांनंतर मुलांचं आजारी पडणे कमी होणे अपेक्षित असते. मात्र, सध्याच्या काळात बालकांचे आजारी पडण्याचे प्रमाण, त्यांना सातत्याने वैद्यकीय उपचार करावे लागत असल्याचे दिसून येते. जन्मापासून बाळाला ६ महिने केवळ स्तनपानत देणे बंधनकारक आहे. सहा महिन्यांनंतर बाळाला भाताची पेज, वरणाचे पाणी, मुगाची मऊ खिचडी असा पोषक आहार देणे अपेक्षित असते. त्यातूनच त्यांची प्रतिकारशक्ती वाढते. सुबत्ता असलेल्या घरांतून सर्व प्रकारची पथ्ये पाळून तसेच मुलांच्या आहारात प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या घटकांचा समावेश असूनही अशा घरांतील बालके अधिक आजारी पडतात, हा अधिक चिंतेचा विषय आहे.

कोट

बालके आजारी पडण्यामागे बाहेरच्या अन्नातून होणारे इन्फेक्शन, सकस आहाराचा अभाव, शुद्ध पाण्याचा अभाव, जंक फूड, थंड पेय, कृत्रिम रंग घातलेले पदार्थ हे या आजारांना कारणीभूत ठरणारे प्रमुख घटक आहेत. तसेच बदलते वातावरण, अपूर्ण आहार आणि बालकांमध्ये चलनवलन, व्यायामाचा अभाव यामुळे जंतूसंसर्ग वाढण्याच्या तक्रारीदेखील वाढल्या आहेत.

डॉ. नितीन मेहकरकर, बालरोग तज्ज्ञ