शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सकस अन्नाच्या अभावाने बालकांच्या प्रतिकारशक्तीत घट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:15 IST

नाशिक : अर्भके आणि लहान बाळांची रोगप्रतिकारक शक्ती ही प्रारंभी कमीच असते. मात्र, आईच्या दुधाने तसेच अन्य पौष्टीक आहाराने ...

नाशिक : अर्भके आणि लहान बाळांची रोगप्रतिकारक शक्ती ही प्रारंभी कमीच असते. मात्र, आईच्या दुधाने तसेच अन्य पौष्टीक आहाराने त्यांच्या प्रतिकारशक्तीत चांगली वाढ होणे अपेक्षित असते. मात्र, बालकांना दिल्या जाणाऱ्या जेवणातील सकस अन्नाचा अभाव सध्याच्या काळात अनेक बालकांमध्ये प्रतिकारशक्ती कमी करण्यास आणि आजारी पडण्याच्या अधिकच्या प्रमाणास कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते.

त्यामुळेच बालके पूर्वीच्या तुलनेत अधिक आजारी पडण्याचे, वारंवार उपचार करून घेण्याची वेळ पालकांवर येते. बहुतांश बालकांची ही घटती प्रतिकारशक्ती पालकांच्या आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या चिंतेचा विषय ठरते. बालपणी ऋतू बदलला की मुले आजारी पडतात. पहिल्या ४ वर्षांतल्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. मुलांना जेव्हा जंतूसंसर्ग होतो, तेव्हा त्यांची प्रतिकारशक्ती हळूहळू वाढायला सुरुवात होते. त्यामुळे ४ ते ५ वर्षांनंतर मुलांचं आजारी पडणे कमी होणे अपेक्षित असते. मात्र, सध्याच्या काळात बालकांचे आजारी पडण्याचे प्रमाण, त्यांना सातत्याने वैद्यकीय उपचार करावे लागत असल्याचे दिसून येते. जन्मापासून बाळाला ६ महिने केवळ स्तनपानत देणे बंधनकारक आहे. सहा महिन्यांनंतर बाळाला भाताची पेज, वरणाचे पाणी, मुगाची मऊ खिचडी असा पोषक आहार देणे अपेक्षित असते. त्यातूनच त्यांची प्रतिकारशक्ती वाढते. सुबत्ता असलेल्या घरांतून सर्व प्रकारची पथ्ये पाळून तसेच मुलांच्या आहारात प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या घटकांचा समावेश असूनही अशा घरांतील बालके अधिक आजारी पडतात, हा अधिक चिंतेचा विषय आहे.

कोट

बालके आजारी पडण्यामागे बाहेरच्या अन्नातून होणारे इन्फेक्शन, सकस आहाराचा अभाव, शुद्ध पाण्याचा अभाव, जंक फूड, थंड पेय, कृत्रिम रंग घातलेले पदार्थ हे या आजारांना कारणीभूत ठरणारे प्रमुख घटक आहेत. तसेच बदलते वातावरण, अपूर्ण आहार आणि बालकांमध्ये चलनवलन, व्यायामाचा अभाव यामुळे जंतूसंसर्ग वाढण्याच्या तक्रारीदेखील वाढल्या आहेत.

डॉ. नितीन मेहकरकर, बालरोग तज्ज्ञ