शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

सकस अन्नाच्या अभावाने बालकांच्या प्रतिकारशक्तीत घट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:15 IST

नाशिक : अर्भके आणि लहान बाळांची रोगप्रतिकारक शक्ती ही प्रारंभी कमीच असते. मात्र, आईच्या दुधाने तसेच अन्य पौष्टीक आहाराने ...

नाशिक : अर्भके आणि लहान बाळांची रोगप्रतिकारक शक्ती ही प्रारंभी कमीच असते. मात्र, आईच्या दुधाने तसेच अन्य पौष्टीक आहाराने त्यांच्या प्रतिकारशक्तीत चांगली वाढ होणे अपेक्षित असते. मात्र, बालकांना दिल्या जाणाऱ्या जेवणातील सकस अन्नाचा अभाव सध्याच्या काळात अनेक बालकांमध्ये प्रतिकारशक्ती कमी करण्यास आणि आजारी पडण्याच्या अधिकच्या प्रमाणास कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते.

त्यामुळेच बालके पूर्वीच्या तुलनेत अधिक आजारी पडण्याचे, वारंवार उपचार करून घेण्याची वेळ पालकांवर येते. बहुतांश बालकांची ही घटती प्रतिकारशक्ती पालकांच्या आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या चिंतेचा विषय ठरते. बालपणी ऋतू बदलला की मुले आजारी पडतात. पहिल्या ४ वर्षांतल्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. मुलांना जेव्हा जंतूसंसर्ग होतो, तेव्हा त्यांची प्रतिकारशक्ती हळूहळू वाढायला सुरुवात होते. त्यामुळे ४ ते ५ वर्षांनंतर मुलांचं आजारी पडणे कमी होणे अपेक्षित असते. मात्र, सध्याच्या काळात बालकांचे आजारी पडण्याचे प्रमाण, त्यांना सातत्याने वैद्यकीय उपचार करावे लागत असल्याचे दिसून येते. जन्मापासून बाळाला ६ महिने केवळ स्तनपानत देणे बंधनकारक आहे. सहा महिन्यांनंतर बाळाला भाताची पेज, वरणाचे पाणी, मुगाची मऊ खिचडी असा पोषक आहार देणे अपेक्षित असते. त्यातूनच त्यांची प्रतिकारशक्ती वाढते. सुबत्ता असलेल्या घरांतून सर्व प्रकारची पथ्ये पाळून तसेच मुलांच्या आहारात प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या घटकांचा समावेश असूनही अशा घरांतील बालके अधिक आजारी पडतात, हा अधिक चिंतेचा विषय आहे.

कोट

बालके आजारी पडण्यामागे बाहेरच्या अन्नातून होणारे इन्फेक्शन, सकस आहाराचा अभाव, शुद्ध पाण्याचा अभाव, जंक फूड, थंड पेय, कृत्रिम रंग घातलेले पदार्थ हे या आजारांना कारणीभूत ठरणारे प्रमुख घटक आहेत. तसेच बदलते वातावरण, अपूर्ण आहार आणि बालकांमध्ये चलनवलन, व्यायामाचा अभाव यामुळे जंतूसंसर्ग वाढण्याच्या तक्रारीदेखील वाढल्या आहेत.

डॉ. नितीन मेहकरकर, बालरोग तज्ज्ञ