शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

कुंभमेळा : त्र्यंबकेश्वरच्या अहल्या धरणाची अवस्था बिकट

By admin | Updated: April 18, 2015 23:43 IST

घाट बांधले,पाण्याचे काय?

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात शाहीपर्वणीच्या दिवशी स्नानासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये अहल्या नदीवर घाट बांधण्यात येत असले तरी, स्नानासाठी पाणी कोठून आणणार, असा सवाल स्थानिक नागरिकांनीच केला आहे. त्र्यंबकेश्वर शहराची पाण्याची तहान भागविण्यासाठी अहल्या धरण बांधण्यात आले असून, त्यानंतर दुर्लक्षित झालेल्या धरणाची साठवण क्षमताही कमी झालेली आहे. सिंहस्थात पाऊस न झाल्यास स्नान कसे होणार, अशी विचारणा केली जात आहे. त्र्यंबकेश्वर येथे तीन ठिकाणी भाविकांच्या स्नानासाठी घाट बांधले जात असून, त्यातील एक मोठा घाट अहल्या नदीवर बांधण्यात आला आहे. ज्या ठिंकाणी घाट आहे, त्याला लागूनच अहल्या धरण आहे. त्र्यंबक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अहल्या धरणाचे बांधकाम केल्यानंतर या धरणाकडे आजवर दुर्लक्षच झाले असून, डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या धरणाची निम्म्याहून अधिक जागा गाळाने घेतल्याने त्याची साठवण क्षमताही संपली आहे. धरणातून पाणी सोडण्यासाठी बसविण्यात आलेले दरवाजेही मोडकळीस आल्याने पाण्याची गळती होत आहे. धरणाला संरक्षण भिंत नसल्याने त्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे. मद्यपी व टवाळखोरांकडून धरणाच्या पाण्यात घाण टाकली जात असल्याने धरणाचे व पर्यायाने अहल्या नदीचे पावित्र्यही भंग पावले आहे. असे असताना धरणाला लागून घाट बांधण्यापेक्षा या धरणाचीच देखभाल-दुरुस्ती करून त्याची साठवण क्षमता वाढवली, तर त्या पाण्याचा कायमस्वरूपी उपयोग होऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यातही धरणानजीक बांधण्यात आलेला घाट हा स्नानासाठी असल्याने धरणात पाणी आले, तरच या घाटाचा उपयोग होऊ शकतो. जर पाऊस पडला नाही तर काय? असा प्रश्नही त्या अनुषंगाने विचारला जात आहे. सध्या या धरणाने तळ गाठला असून, मृत साठा तेवढा शिल्लक राहिला आहे. (प्रतिनिधी)