शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळा : त्र्यंबकेश्वरच्या अहल्या धरणाची अवस्था बिकट

By admin | Updated: April 18, 2015 23:43 IST

घाट बांधले,पाण्याचे काय?

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात शाहीपर्वणीच्या दिवशी स्नानासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये अहल्या नदीवर घाट बांधण्यात येत असले तरी, स्नानासाठी पाणी कोठून आणणार, असा सवाल स्थानिक नागरिकांनीच केला आहे. त्र्यंबकेश्वर शहराची पाण्याची तहान भागविण्यासाठी अहल्या धरण बांधण्यात आले असून, त्यानंतर दुर्लक्षित झालेल्या धरणाची साठवण क्षमताही कमी झालेली आहे. सिंहस्थात पाऊस न झाल्यास स्नान कसे होणार, अशी विचारणा केली जात आहे. त्र्यंबकेश्वर येथे तीन ठिकाणी भाविकांच्या स्नानासाठी घाट बांधले जात असून, त्यातील एक मोठा घाट अहल्या नदीवर बांधण्यात आला आहे. ज्या ठिंकाणी घाट आहे, त्याला लागूनच अहल्या धरण आहे. त्र्यंबक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अहल्या धरणाचे बांधकाम केल्यानंतर या धरणाकडे आजवर दुर्लक्षच झाले असून, डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या धरणाची निम्म्याहून अधिक जागा गाळाने घेतल्याने त्याची साठवण क्षमताही संपली आहे. धरणातून पाणी सोडण्यासाठी बसविण्यात आलेले दरवाजेही मोडकळीस आल्याने पाण्याची गळती होत आहे. धरणाला संरक्षण भिंत नसल्याने त्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे. मद्यपी व टवाळखोरांकडून धरणाच्या पाण्यात घाण टाकली जात असल्याने धरणाचे व पर्यायाने अहल्या नदीचे पावित्र्यही भंग पावले आहे. असे असताना धरणाला लागून घाट बांधण्यापेक्षा या धरणाचीच देखभाल-दुरुस्ती करून त्याची साठवण क्षमता वाढवली, तर त्या पाण्याचा कायमस्वरूपी उपयोग होऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यातही धरणानजीक बांधण्यात आलेला घाट हा स्नानासाठी असल्याने धरणात पाणी आले, तरच या घाटाचा उपयोग होऊ शकतो. जर पाऊस पडला नाही तर काय? असा प्रश्नही त्या अनुषंगाने विचारला जात आहे. सध्या या धरणाने तळ गाठला असून, मृत साठा तेवढा शिल्लक राहिला आहे. (प्रतिनिधी)