शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

कुंभमेळा : त्र्यंबकेश्वरच्या अहल्या धरणाची अवस्था बिकट

By admin | Updated: April 18, 2015 23:43 IST

घाट बांधले,पाण्याचे काय?

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात शाहीपर्वणीच्या दिवशी स्नानासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये अहल्या नदीवर घाट बांधण्यात येत असले तरी, स्नानासाठी पाणी कोठून आणणार, असा सवाल स्थानिक नागरिकांनीच केला आहे. त्र्यंबकेश्वर शहराची पाण्याची तहान भागविण्यासाठी अहल्या धरण बांधण्यात आले असून, त्यानंतर दुर्लक्षित झालेल्या धरणाची साठवण क्षमताही कमी झालेली आहे. सिंहस्थात पाऊस न झाल्यास स्नान कसे होणार, अशी विचारणा केली जात आहे. त्र्यंबकेश्वर येथे तीन ठिकाणी भाविकांच्या स्नानासाठी घाट बांधले जात असून, त्यातील एक मोठा घाट अहल्या नदीवर बांधण्यात आला आहे. ज्या ठिंकाणी घाट आहे, त्याला लागूनच अहल्या धरण आहे. त्र्यंबक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अहल्या धरणाचे बांधकाम केल्यानंतर या धरणाकडे आजवर दुर्लक्षच झाले असून, डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या धरणाची निम्म्याहून अधिक जागा गाळाने घेतल्याने त्याची साठवण क्षमताही संपली आहे. धरणातून पाणी सोडण्यासाठी बसविण्यात आलेले दरवाजेही मोडकळीस आल्याने पाण्याची गळती होत आहे. धरणाला संरक्षण भिंत नसल्याने त्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे. मद्यपी व टवाळखोरांकडून धरणाच्या पाण्यात घाण टाकली जात असल्याने धरणाचे व पर्यायाने अहल्या नदीचे पावित्र्यही भंग पावले आहे. असे असताना धरणाला लागून घाट बांधण्यापेक्षा या धरणाचीच देखभाल-दुरुस्ती करून त्याची साठवण क्षमता वाढवली, तर त्या पाण्याचा कायमस्वरूपी उपयोग होऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यातही धरणानजीक बांधण्यात आलेला घाट हा स्नानासाठी असल्याने धरणात पाणी आले, तरच या घाटाचा उपयोग होऊ शकतो. जर पाऊस पडला नाही तर काय? असा प्रश्नही त्या अनुषंगाने विचारला जात आहे. सध्या या धरणाने तळ गाठला असून, मृत साठा तेवढा शिल्लक राहिला आहे. (प्रतिनिधी)