शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

कृषिमहोत्सव : हषवर्धन पाटील यांचे प्रतिपादन

By admin | Updated: January 24, 2016 22:43 IST

सहकारातून नैसर्गिक शेतीला गती

नाशिक : श्री स्वामी समर्थ अध्यात्म कें द्राने संस्कृती संस्कार जोपासण्याची परंपरा कायम ठेवली असून, आता अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आणि शेतीला पाठबळ देण्यासाठी सेवामार्गातील पुढाकार घेतल्याने कृषी विकास साधला जाऊन शेतकऱ्यांना आत्मिक बळ मिळेल. अल्प खर्चात चांगले उत्पन्न देणाऱ्या नैसर्गिक शेतीकडे शेतक ऱ्यांचा कल वाढलेला असल्याने सहकार क्षेत्रातून शेतीचे मार्गदर्शन उपलब्ध झाल्यास नैसर्गिक शेतीला गती मिळेल, असे प्रतिपादन माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर श्री स्वामी समर्थ कृषी विक ास व संशोधन चारिटेबल ट्रस्ट व शासनातर्फे आयोजित पाच दिवसीय जागतिक कृषिमहोत्सवात रविवारी (दि. २४) नैसर्गिक शेती या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. व्यासपीठावर अण्णासाहेब मोरे, नैसर्गिक शेती अभ्यासक जितेंद्र कुटमुतिया विलास सनेर उपस्थित होते.अविरत निसर्गाच्या सानिध्यात समाजाला अन्नधान्य देणारा शेतकरी निसर्गाचा खरा उपासक आहे. मात्र तरीही त्याला नैसर्गिक शेतीविषयी संपूर्ण माहिती नाही. त्यामुळे निसर्ग शेतीची शेतकऱ्यांना प्राथमिक माहिती देण्याची गरज असून, पंचमहाभुतांवर आधारित शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्याची गरज असल्याचे कर्नाटकचे नैसर्गिक शेतीतज्ज्ञ सुरेश देसाई यांनी सांगितले. गुजरातचे नैसगिक शेतीतज्ज्ञ नरेश सावे म्हणाले, रासायनिक सेंद्रीय आणि नैसर्गिक शेती असे शेतीचे तीन प्रकार असून, सध्या रासायनिक शेतीवर भर दिला जातो. त्यामुळे मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत. तुलनेत नैसर्गिक शेती ऊन, वारा, पाणी, जमीन या घटकांवर आधारित असून, या पद्धतीत शेती संपूर्णत: निसर्गावर अवलंबून असल्याने पीक चांगले येते आणि हे उत्पादन आयोग्यालाही पोषक असते. तत्पूर्वी अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते नैसर्गिक कृषी पुरस्कार कुरेशी शेख व ओमप्रकाश कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी शेती अभ्यासक, शेतकरी, श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे सेवेकरी आणि नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)