शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

किसान क्रांती मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक

By admin | Updated: May 13, 2017 00:25 IST

नाशिक : शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी किसान क्रांती मोर्चातील शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे केंद्र व राज्य सरकारने सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने त्याकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी किसान क्रांती मोर्चातील शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक दिली. शासनाने गांभीर्याने प्रश्न न सोडविल्यास एक जूनपासून शेतकरी संपावर जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला.  जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार यांच्या नेतृत्वाखाली दुपारी शहरातील बी. डी. भालेकर येथून शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलिसांनी अडवला. अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे पीक कर्ज, वाढत्या आत्महत्या या साऱ्या विषयांशी संलग्न फलक हातात घेतलेल्या शेतकऱ्यांकडून सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.  शासनाने या मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा एक जूनपासून शेतकरी संपावर जातील, असा इशाराही देण्यात आला. या मोर्चात बाळासाहेब गुजर, बाळासाहेब पुंड, सुभाष जाधव, अनिल सोनवणे, दशरथ सांगळे, नामदेव डांगळे, प्रमोद गायकवाड, बाळासाहेब निंबाळकर, लहानू मेमाने, शशिकांत आवारे, शशिकला अडसरे, रामदास वाढवणे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. जिल्हा बॅँकेचे अधिग्रहण करावेशिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांचीच भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, ज्या शेतकऱ्यांचे जिल्हा बॅँकेत खाते आहेत त्यांच्या खात्यावरील रक्कम राष्ट्रीयीकृत बॅँकांमध्ये वर्ग करण्यात यावे, राष्ट्रीयीकृत बॅँकेत जिल्हा बॅँकेचे अधिग्रहण करण्यात यावे, शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बॅँकांनी कर्जपुरवठा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी, बाजार समित्यांकडून शेतकऱ्यांना विकलेल्या मालाचे पैसे त्वरित दिले जावेत, ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, अखंडित वीजपुरवठा करावा, खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.